मायणी:-वनसंवर्धनासाठी वनविभागाकडून गावोगावी बैठकांचा जोर मात्र मायणीमंडल उदासीन.
ज्येष्ठ पत्रकार प्रा दिलीप पुस्तके महाराष्ट्र राज्य संघटक:-9890318605

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार प्रा दिलीप पुस्तके महाराष्ट्र राज्य संघटक
वनसंवर्धनासाठी वनविभागाकडून गावोगावी बैठकांचा जोर मात्र मायणीमंडल उदासीन.
वन्यजीव संरक्षण व संवर्धनासाठी वनविभागाकडून गावोगावी बैठका जनजागृती सुरू आहे मात्र मायणी परिमंडळातील अनेक गावातून बैठका होत असल्या तरी ग्रामस्थ मात्र उदासीन असल्याचे दिसून येत आहे.
रात्रगस्त ,अवैद्य शिकार, वन्यजीव संरक्षण व संवर्धना साठी लोकसहभाग पर्यटन वाढीसाठी होणारे प्रयत्न पर्यावरण स्थळाविषयी मार्गदर्शन पुस्तके, जंगलाचे संरक्षण व संवर्धन जल- मृदा संवर्धन ,गॅबियन बंधारे ,माती बंधारे पानवठे निर्मिती ,पशुहानी नुकसान भरपाई हे वनविभागाचे धोरण आहे तरीदेखील मायणी पक्षी आश्रय स्थानांमध्ये वनविभागाच्या अधिकाऱ्याकडून या गोष्टी मात्र होत नसल्याचे दिसून येत आहे .याबाबत वनविभागाचे अधिकारी यांना माहिती विचारली असता ते उत्तर देण्यास टाळाटाळ करत असल्याचे दिसून येत आहे .
तसेच शासकीय योजना तलाठी कृषी सहाय्यक वनविभाग घटनास्थळी पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाईची प्रक्रिया वेळेवर होत नसल्याची माहिती शिवसेना विभागप्रमुख विशाल चव्हाण यांनी दिली. वास्तविक नियमित व मासिक, साप्ताहिक बैठका घेणे गरजेचे असले तरी मायणी वनाधिकाऱ्याकडून बैठका नियमित बैठका होत नसल्याचे निदर्शनास येत आहे .वनविभाग कर्मचारी सामाजिक कार्यकर्ते पर्यावरण मित्र यांच्यात समन्वय नसल्याने वनविभागाचे उद्दिष्ट पूर्ण होईल असे वाटत नसल्याचे मायणी ग्रामस्थांच्यातून दबक्या आवाजात चर्चा सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे.