खटाव:-कान कात्रे येथील हा तलाव कोरडा पडला असून हा तलाव पडळ गावाची तहान भागवू शकत – कारखान्याच्या पडळ गावाला दुष्काळाचे गंभीर सावट.
ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके महाराष्ट्र राज्य संघटक:-9890318605

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके महाराष्ट्र राज्य संघटक
कारखान्याच्या पडळ गावाला दुष्काळाचे गंभीर सावट.
मायणी प्रतिनिधी_खटाव माण ऍग्रो प्रोसेसिंग लिमिटेड पडळ या गावाला पावसाळ्याच्या मध्यवर्ती मध्ये दुष्काळाचे गंभीर सावट जाणू लागले आहे. त्यामुळे पुढच्या महिन्यात टँकर सुरू करावे लागतात की काय अशी गंभीर स्थिती निर्माण झाली आहे या गावाला आतापर्यंत 91 मिलिमीटर पाऊस झाला असून झालेल्या पावसावर येथील शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील कडधान्ये, घेवडा ,बाजरी, इत्यादी पिकांची पेरणी केली परंतु पावसाने ओढ दिल्याने पिके जागेवरच जळू लागली आहे. तसेच जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न गंभीर होत चालला असून विहिरीतील पाण्याने तळ गाठल्याने अनेक शेतकऱ्यांनी लावलेला ऊस पाणी न मिळाल्याने जनावरासाठी सोडून दिला आहे. हे गाव राजकीय दृष्ट्या संवेदनशील असूनही व या गावात घरटी पुढारी असूनही या प्रश्नाकडे कोणीही लक्ष देत नाही. दुसरे महत्त्वाचे कारण असे की या गावाला पूर्वी 1985 च्या दरम्यान खातवळसह बारा गावच्या योजनेचे पिण्याचे पाणी येत होते. परंतु कालांतराने या योजनेत दोष दिसू लागल्याने व लाईट बिल भरण्याची क्षमता नसल्याने ही योजना दहा वर्षांपूर्वीच काल बाह्य ठरली आहे सध्या कान कात्रे तलाव हा उद्भव धरून पिण्याच्या पाण्याच्या योजनेचे काम सुरू आहे. परंतु ऐन पावसाळ्यात हा तलावच कोरडा पडल्याने हा तलाव पडळकर यांची तहान भागवू शकत नाही यासाठी राष्ट्रीय पेयजल योजनेत 24 बाय सात या गावाचा समावेश करून मायणी तलाव हा उद्भव धरून सदरची योजना सुरू केल्यास पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटेल सध्याची योजना ही तात्पुरती मलमपट्टी आहे. सध्या ग्रामस्थ मिळेल तिथून मिळेल त्या ठिकाणाहून आपल्या दैनंदिन जीवनासाठी पाणी आणून तहान भागवत आहेत. अशी परिस्थिती पुढील महिन्यात राहिली तर पुढच्याच महिन्यात टँकर सुरू करावे लागतील असे मत येथील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश हंगे यांनी बोलताना व्यक्त केली.