फलटण:-प्रा.हरी नरके विचारांनी चिरंतन राहतील : बेडकिहाळ.
संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
प्रा.हरी नरके विचारांनी चिरंतन राहतील : बेडकिहाळ.
मलटण:-
महात्मा फुले यांच्या विचारांचे खरे वारसदार प्रा.हरी नरके होते त्यांनी आपल्या साहित्यातून आणि आपल्या जगभर दिलेल्या भाषणातून महात्मा फुले यांचे सत्यशोधक विचार रुजवले आणि मांडले .महात्मा फुलेंच्या याचे समग्र वाड्मय महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्रकाशित करण्यात प्रा.नरके यांचा मोलाचा वाटा आहे. सत्यशोधकी विचार मांडताना ते निर्भीडपणे आपले विचार मांडत ते शरीराने आपल्यातून गेले असले तरी विचारांनी ते चिरंतन राहतील असे मत जेष्ठ विचारवंत फलटण साहित्य परिषदेचे अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ यांनी महात्मा फुले चौक फलटण येथे महात्मा फुले जयंती उत्सव समिती आयोजित प्रा हरी नरके यांच्या श्रद्धांजली शोक सभेत व्यक्त केले.
प्रा नरके यांनी खऱ्या अर्थाने सत्यशोधक विचार रुजवले महात्मा फुले यांचे साहित्य यावर सखोल संशोधन करून त्यांनी अनेक पुस्तके लिहिली ती सत्य सांगणारी आहेत. ती आपण जरूर वाचावीत असे मत सचिन मोरे यांनी व्यक्त केले यावेळी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते तुकाराम गायकवाड , फलटण तालुका अध्यात्मिक आघाडी च्या वतीने ह भ प केशवराव जाधव , आमिर भाई शेख ,गोविंद भुजबळ , अमोल रासकर विकास नाळे फलटण तालुका कलाकार मंडळ यांच्या वतीने लक्ष्मण निकाळजे यांनी मनोगत व्यक्त केली.
या वेळी प्रा रमेश आढाव दादासाहेब चोरमले शक्ती भोसले समीर तांबोळी हरीश काकडे बापूराव शिंदे ,विजय शिंदे ,रणजित भुजबळ , विकास शिंदे ,प्रा विशाल शिंदे बाळासाहेब अडसूळ दत्ता नाळे , विकास नाळे वैभव नाळे सुभाष अभंग दीपक शिंदे प्रमोद नाळे अमोल शिंदे संकेत शेवते संदीप नेवसे बंडू शिंदे रोहन शिंदे प्रा.अमोल आढाव प्रविण फरांदे स्वप्नील शिंदे कुलदीप घनवट किरण राऊत इत्यादी उवस्थित होते प्रास्ताविक प्रा सतिश जंगम यांनी केले.