सातारा:-काँग्रेस संपवण्यास निघालेल्यांना जनतेने संपवले – रणजीतसिंह देशमुख
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा:-9922241299

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
काँग्रेस संपवण्यास निघालेल्यांना जनतेने संपवले – रणजीतसिंह देशमुख
सातारा दि: देशाच्या स्वतंत्र लढ्यामध्ये प्राणाची बाजी लावून लढणारे योद्धा म्हणजे काँग्रेस कार्यकर्ता आहे. या काँग्रेस पक्षाने अनेक संकट पाहिले आहेत. त्यातून पुन्हा बाहेर पडून राष्ट्रीय काँग्रेस पक्ष वाढवलेला आहे. ही काँग्रेस संपवण्यास निघालेल्या जनतेने संपवले आहे. अशी खरमरीत टीका राष्ट्रीय काँग्रेसचे कार्यकारणी सदस्य व युवा नेते रणजीतसिंह देशमुख यांनी सातारा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केली आहे.
माढा लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, चार महिन्यापूर्वी मी महाविकास आघाडी मध्ये फूट पडेल असे सांगितले होते. ते खरे ठरले. आता काँग्रेस महाविकास आघाडी मधून बाहेर पडेल व काँग्रेस मधून काही कार्यकर्ते बाहेर पडतील. असे त्यांनी भाष्य केले आहे. त्या भाषेचा समाचार घेताना रणजीतसिंह देशमुख यांनी सांगितले की, हवामान खात्याचे भावी मंत्री असलेल्या नेत्यासोबत माढाचे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर हिंडत आहेत . त्यांच्या मुळे नवीन हवामान खात्याचा अंदाज ते व्यक्त करीत आहे.तो अंदाज फोल ठरणार आहे. त्यांची भाजप मधील खासदारकीची मुदत संपल्याने त्यांना भास निर्माण होत आहे.त्यांना पुन्हा एकदा अपघाताने भाजपची उमेदवारी मिळून खासदार होण्याचे स्वप्न पडू लागलेले आहे.
या स्वप्नातून उठून खा . रणजीतसिंह नाईक निंबाळकर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाबद्दल वक्तव्य केले आहे. ते निषेधार्थ आहे. वास्तविक व्यक्तीगत टीका करण्याचा कोणताही उद्देश नाही. परंतु फलटणच्या नाईट निंबाळकर कुटुंबियातील आदरणीय दिवंगत हिंदुराव नाईक निंबाळकर व आताचे माढाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे दोघेही राष्ट्रीय काँग्रेसच्या मुशीत तयार झालेले कार्यकर्ते आहेत. त्यांना काँग्रेसने ओळख करून दिली एवढेच नव्हे तर क्रांतिकारी सातारा जिल्ह्याच्या राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पद दिलेले होते .असे असताना त्यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेले आहेत. त्यामुळे घराचे वास मोजण्यापेक्षा त्यांनी आत्मचिंतन करावे. सोनवडी ता .फलटण येथील घटनेने सातारा जिल्ह्याचे नाव रसातळाला गेलेले आहे.
त्यांची फलटण ही जन्म व कर्मभूमी आहे. अशा या भूमीमध्ये एका आदिवासी महिलेवर अत्याचार होऊन त्याची खबर बातमी त्यांना झाली नाही. हे दुर्देवी घटना आहे. भाजप मधून पुन्हा उमेदवारी मिळणार नाही. म्हणून ते बेताल वक्तव्य करत आहेत. याची भाजपही नोंद घेणार आहे. सध्या अनेकांना भाजप मोठा झाल्याचा भास होतो पण, वस्तूस्थिती तशी नाही. मूळ भाजप शोधण्यासाठी आता महाराष्ट्रात दुर्बिण घ्यावी लागणार आहे. कारण सब भूमी गोपालची म्हणजेच भारतीय जनता पक्ष नवीन ओळख झालेली आहे. असे श्री देशमुख यांनी सांगितले.
सध्या भाजपचे गुणगान गाण्यापेक्षा सर्वाधिक जास्त भीती राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची वाटू लागल्यामुळे सोशल मीडिया व इतर प्रसारमाध्यमांमधून फक्त राष्ट्रीय काँग्रेसवर टीका टिपणी चालू आहे. सत्तर वर्षांमध्ये काँग्रेसने काय केले? याचे त्यांनी आत्मचिंतन करावे. सत्तर वर्षांपूर्वी कोण होते? आणि आता कोण आहेत? हा खरं म्हणजे लोकशाहीचा विजय आहे. ज्या दिवशी काँग्रेस संपेल त्या दिवशी या देशांमध्ये हुकूमशाही निर्माण होईल आणि हुकूमशाहीच्या फटक्याने रणजीतसिंह नाईक निंबाळकर सारखेही घायळ होतील. ती वेळ काँग्रेस कधी येऊन देणार नाही असेही राष्ट्रीय काँग्रेसचे युवा नेते रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले. या छोटेखाली पत्रकार परिषदेला राष्ट्रीय काँग्रेसचे माण- खटाव विधानसभा अध्यक्ष डॉ. महेश गुरव, नरेश देसाई , इम्रान बागवान व मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते.
चौकट – माढा लोकसभा मतदारसंघात भाजप खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचा तीन लाख मताधिक्याने पराभव होईल असे ही राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे केंद्रीय सदस्य रणजीत सिंह देशमुख यांनी सांगितले.