सातारा:-आ.शिंदे व आ.पाटील यांच्या लक्षवेधीने फलटण प्रकरणातील समाजाला मिळणार न्याय.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा:-9922241299

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
आ.शिंदे व आ.पाटील यांच्या लक्षवेधीने फलटण प्रकरणातील समाजाला मिळणार न्याय.
सातारा दि: गेल्या महिन्यामध्ये फलटण येथील सोनवडी या गावातील कोळसा खाणी मध्ये आदिवासी महिलेवर अत्याचार झाला होता .सदरची घटना सामाजिक कार्यकर्ते विवेक पंडित यांच्या माध्यमातून उघड झाली. त्यानंतर यावर मोठा गदारोळ झाला. परंतु, सातारा जिल्ह्याचे सुपुत्र व विधानपरिषद सदस्य आमदार शशिकांत शिंदे, पत्रकार व आ. कपिल पाटील यांनी याबाबत लक्षवेधी मांडली होती. त्याला गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक दृष्टिकोनातून उत्तर दिले आहे. त्यामुळे आदिवासी समाजाला न्याय मिळण्याचे द्वार खुले झालेले आहे.
याबाबत माहिती अशी की, सातारा जिल्ह्यातील आरक्षित मतदार संघ असलेल्या फलटण तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार दीपक चव्हाण हे प्रतिनिधित्व करतात. त्यांना विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचा वरदहस्त आहे .त्याच फलटण तालुक्यामध्ये सोनवडी गावात कोळसा खाणीत काम करणाऱ्या आदिवासी महिलेवर अन्याय झाला. सदरची घटना दि १९ जून रोजी घडल्यानंतर ही बाब उघडकीस येण्यास विलंब झाला. माजी आमदार व श्रमजीवी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विवेक पंडित व त्यांची कन्या ॲड.शुभदा पंडित यांनी याबाबत पाठपुरावा करून आवाज उठवल्यामुळे किमान फलटण तालुक्यात पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल झाली. या तक्रारीनंतर मुख्य आरोपी बाळू शेख याला अटक केली. परंतु, अद्यापही चार आरोपी फरार आहेत. त्यांची ओळख परेड सुरू असून ते लवकरच पोलीस ताब्यात घेतील असे आश्वासन उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहात दिले. मुळातच महाराष्ट्रात बंद बिगारी पद्धतीची प्रथा झाली असली तरी या आदिवासी भागातील कामगारांची कुठेही नोंद नाही .त्यांना स्वतःचे घर व रोजगार नसल्यामुळे त्यांची स्थलांतरित होण्याचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे पाहून या आदिवासी भागातील लोकांना घरासाठी जमीन व घरकुल देणे यासाठी काही निकष बाजूला ठेवून प्रयत्न करावा. तसेच कामगार विभागामार्फत अशा मजुरांची नोंद ठेवावी. अशी मागणी आमदार शशिकांत शिंदे व आमदार कपिल पाटील यांनी केली होती.
सदरच्या घटनेमुळे सातारा जिल्हा पुन्हा एकदा चर्चेत आला असला तरी या घटनेनंतर सोन वडी येथील कोळसा खाणीत काम करणाऱ्या ३४ वेठ बिगार आदिवासी लोकांची सोडवणूक करण्यात आलेली आहे. त्यापैकी अकरा लोकांना विविध दाखले देऊन त्यांच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा झाला. इतर २३ लोकांचा प्रश्न लवकर सुटावा. यासाठी प्रयत्न सुरू झालेला आहे. अत्याचारित महिलेची १६४ खाली म्हणणे पोलिसांनी नोंदवले आहे.
विशेष म्हणजे आपल्या देशाच्या राष्ट्रपती या आदिवासी असून सुद्धा अशा घटना घडत असल्याची बाब गंभीर असल्याचेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. स्थलांतरित मजुरांसाठी विशेष योजना राबवून रोजगार शिक्षण व नवीन योजना जाहीर करण्याचे त्यांनी स्पष्ट केलेआहे .आमदार कपिल पाटील यांनी सभागृहात स्पष्ट केले की, आदिवासी समाजाच्या विकासासाठी संख्येच्या प्रमाणात निधी उपलब्ध व्हावा. कारण, यापूर्वी ८०० कोटी रुपये आदिवासी विकास निधी माघारी गेल्याचेही त्यांनी सभागृहाला सांगितले.
रायगड जिल्ह्यात सव्वा लाख कातकरी आदिवासी होते. कातकरी समाज मोठ्या संख्येने असून एकच मुलगी कातकरी समाजाची दहावी पास झालेली आहे. हा मतदारसंघ राखीव होऊ शकतो परंतु ,सर्वच राजकीय पक्षांनी या मतदारसंघाची फोडाफोड केल्यामुळे आदिवासींचे प्रतिनिधित्व मिळत नाही. हे सुद्धा त्यांनी स्पष्ट केले. आमदार शशिकांत शिंदे यांनी सांगितले की,१९ तारखेला घटना घडल्यानंतर एक महिना झाला तरी अद्याप आरोपी फरार आहेत. मुख्य आरोपी अटक केली असली तरी इतर आरोपींचा शोध घेण्यामध्ये नेमकं काय घडले? तसेच कातकरी समाजाच्या विकासासाठी निकष जरा बाजूला करून कामगार विभाग महसूल विभाग यांनी वीट भट्टी कोळसा भट्टी व इतर भट्टीवर काम करणाऱ्या कामगारांची नोंदणी करावी. अशी मागणी केली आहे.
गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमध्ये सामील असूनही सांगितले की, सोन वडी तालुका फलटण येथील घटनेमध्ये आरोपी कातकरी समाजातील महिलांवर अत्याचार करत होता त्यांच्या लहान पोरांना डांबून ठेवायचा व आठवड्याला फक्त पाचशे रुपये द्यायचा. ही बाब सुद्धा त्यांनी सभागृहाला सांगितली. विवेक पंडित, ॲड.शुभदा पंडित यांच्यामुळेच हे प्रकरण उघडकीस आले आहे. याबाबत सामाजिक कार्याची जाणीव असलेल्या व विधानपरिषद सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सूचना केली की ,अशा घटना घडतच असतात. त्यामध्ये एफ. आय. आर. दाखल करताना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करताना एफ आय एफ आय आर लिहून घेणारे पोलीस काही प्रश्न विचारताना अंधार होता का? आरोपीला ओळखले का? असे विचारतात. त्यावेळी नाही हा शब्द येतो. त्यामुळे यापुढे एफ. आय. आर. दाखल करताना आधुनिक तंत्रज्ञान व आवाज तसेच इतर मार्गाचा उपयोग करूनच दाखल केल्यास आरोपीला शिक्षा होऊ शकते. त्याबाबत सरकार काय करणार ?अशी उपयुक्त सूचना केल्यानंतर उपमुख्यमंत्री यांनी तशा पद्धतीनेच यापुढे एफ. आय. आर .दाखल करण्यासाठी तांत्रिक व कायदेशीर पुरावे ग्राह्य धरले जातील. यासाठी प्रशिक्षण अकॅडमी मध्ये माहिती दिली जाईल. कामगार विभाग व पोलीस दल यांच्याशी समन्वय साधून यापुढे सर्व कामगारांची नोंदणी व त्यांना नागरी सुविधा व्यवस्था देण्यात येईल. असेही स्पष्ट केले.
दरम्यान, सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात घडणाऱ्या घटनेबाबत विधान परिषदेमध्ये आवाज उठवल्याबद्दल आ. शशिकांत शिंदे आ. कपिल पाटील तसेच विधान परिषदेचे सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे अनेक सामाजिक संघटनेने मनापासून आभार मानलेले आहेत. विशेष म्हणजे फलटण हा मागासर्गीयांसाठी राखीव मतदार संघ असून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व चर्मकार समाजातील राष्ट्र वादी काँग्रेस पक्षाचे आ. दीपक चव्हाण हे करत आहेत .परंतु त्यांनी याबाबत मौन धारण केल्यामुळे त्यांच्याबद्दल आम्हाला काही म्हणायचे नाही. कारण, त्यांनी खूप मर्यादा घालून घेतल्या आहेत ते फक्त आमदारांना मिळणारे वेतन व इतर भत्ते यासाठीच उपयुक्त ठरू लागलेले आहेत. त्यामुळे त्यांना दोष देण्यामध्ये काही अर्थ नाही. त्यांनी आवाज उठवू नये म्हणून त्यांना दोन वेळा राष्ट्र वादी काँग्रेस पक्षाने आमदार केले आहे.अशा शब्दांमध्ये अनेक फलटण मधील सामाजिक कार्यात पुढाकार घेतलेल्या लोकांनी आपलं मत व्यक्त केले आहे.
————–+——————————————–
फोटो- महाराष्ट्र विधान परिषद मध्ये सोनवडी ता फलटण येथील प्रश्न उपस्थित करताना आमदार शशिकांत शिंदे