ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

मुंबई:-अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या राज्य कार्यकारिणीची मुंबईत बैठक संपन्न.

पत्रकार आशितोष चव्हाण:-7378619519

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

पत्रकार आशितोष चव्हाण

देशात जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे, जनगणनेसाठी देशव्यापी आंदोलनाची गरज -माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ.

जो पर्यंत ओबीसींची आकडेवारी कळणार नाही तो पर्यंत ओबीसी आपल्या हक्कापासून वंचित राहतील – छगन भुजबळ.

फुले – शाहू आंबेडकरांच्या विचाराने एकजूट व्हा.

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या राज्य कार्यकारिणीची मुंबईत बैठक संपन्न.

मुंबई, दि. १० मे-

देशात जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे, जनगणनेसाठी देशव्यापी आंदोलनाची गरज आहे. जो पर्यंत ओबीसींची आकडेवारी कळणार नाही तो पर्यंत ओबीसी आपल्या हक्कापासून वंचित राहतील यासाठी जनगणना झालीच पाहिजे अशी आग्रही मागणी राज्याचे माजी उमुख्यमंत्री व समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांनी आज केली. आज अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची राज्य कार्यकारीणीची बैठक मुंबईत पार पडली यावेळी ते बोलत होते.

आज झालेल्या या अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या कार्यकारिणीच्या बैठकीला माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यासह, प्रा.हरी नरके माजी आमदार पंकज भुजबळ माजी खासदार समीर भुजबळ, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे कार्याध्यक्ष बापु भुजबळ, उपाध्यक्ष दिलीप खैरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ओबीसी सेलचे अध्यक्ष ईश्वर बाळबुधे, मुंबई अध्यक्ष सदानंद मंडलिक, प्रा.दिवाकर गमे,ॲड. सुभाष राऊत,बाळासाहेब कर्डक,मकरंद सावे,मंजिरी घाडगे, प्रा.कविताताई म्हेत्रे, प्रा. काविताताई कर्डक ,वैष्णवी सातव,अंबादास गारुडकर , प्रा नागेश गवळी,प्रा.अरविंद गाभने,उमेश बोरगावकर, प्रीतेश गवळी, समाधान जेजुरकर, तसेच राज्यभरातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, सर्वच पक्षात जसे फुले – शाहू – आंबेडकर यांच्या विचारांचे लोक आहेत तसेच सर्वच पक्षात या विचारांचे विरोधक सुद्धा आहेत मात्र आपण समता परिषदेच्या माध्यमातून फुले-शाहू-आंबेडकर यांचे विचार जनतेत पसरविणे हे चालूच ठेवले पाहिजे. समता परिषदेचे अजेंडा हा गरिबांचा, मागासवर्गीयांचा आणि दलितांच्या उधारासाठी आहे. त्यामुळे समता परिषद ही मागासवर्गीय, वंचित, दलीत घटकासाठी नेहमी लढत आली आणि इथून पुढे देखील लढत राहील.

यावेळी श्री भुजबळ म्हणाले की, आज राजकीय परिस्थिती बदललेली पाहायला मिळते मात्र अश्या परिस्थिती मध्ये देशात पवार साहेब सोडले तर कोणताच नेता फुले शाहू आंबेडरांच्या वाटेने जाताना आढळत नाही. राजकारणात फक्त डोकी मोजली जातात त्यातला विचार मोजला जात नाही मात्र पवार साहेब आजही आपले विचार सोडत नाही हे सर्वात महत्वाचे आहे. माझ्या राजकीय वाटचालीत देखील मी ओबीसींच्या न्याय हक्कासाठी लढा दिला आणि तो शेवटपर्यंत देत राहील.

समता परिषदेची व्याप्ती आपण वाढवली पाहिजे. प्रत्येक घरात हे फुले शाहू आंबेडकरांचे विचार गेलेच पाहिजे. त्यासाठी प्रत्येकाने एकजुटीने काम करायला हवे. तुम्ही एकसंध राहिलात तर आणि तरच ओबीसी घटकाला फायदा होईल, विखुरलेल्या ओबीसी घटकाच्या वाट्याला काहीच येणार नाही. असे प्रखर मत देखील छगन भुजबळ यांनी व्यक्त केले

यावेळी प्रा. हरी नरके यांनी लिहिलेल्या “महात्मा फुले: पर्यायी समाजव्यवस्थेचे शिल्पकार” आणि “ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले” (हिंदी) या दोन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button