वाई:-(कळंबे)-जुने गावठाण हद्दीतील घर व जागा मिळकतीचे सिटी सर्वे/प्रापर्टी कार्ड होणे कामी भुमी अभिलेख कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी यांचे उपस्थितीत नकाशा वाचन व प्रत्यक्ष मिळकतीवर जावुन स्थळपाहणी.
पत्रकार आशितोष चव्हाण

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार आशितोष चव्हाण
RPS STAR NEWS
वाई:-(कळंबे)-जुने गावठाण हद्दीतील घर व जागा मिळकतीचे सिटी सर्वे/प्रापर्टी कार्ड होणे कामी भुमी अभिलेख कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी यांचे उपस्थितीत नकाशा वाचन व प्रत्यक्ष मिळकतीवर जावुन स्थळपाहणी.
कळंभे ता वाई जि.सातारा येथिल जुने गावठाण हद्दीतील घर व जागा मिळकतीचे सिटी सर्वे/प्रापर्टी कार्ड होणे कामी भुमी अभिलेख कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी यांचे उपस्थितीत दिनांक-१/८/२०२४ रोजी नकाशा वाचन व प्रत्यक्ष मिळकतीवर जावुन स्थळपाहणी केली आहे.
तसेच सिटी सर्वे/प्रापर्टी कार्ड बाबत नागरीकांच्या असणा-या समस्या,संभ्रम, अडचणी,वादातील जागा याविषयी ग्रामपंचायत कळंभे ची *ग्रामसभा शनिवार दिनांक- ३/८/२०२४ रोजी शहिद शशिकांत शिवथरे सांस्कृतिक भवन कळंभे* येथे संपन्न झाली.
सदरील ग्रामसभेमध्ये खुल्या जागांचे मोजमाप सिटी उताय्रावर येणे कामी व समाईक जागा विषयी तसेच अन्य योजना विषयी माहिती व मार्गदर्शन करणेत आले.
त्याचप्रमाणे ग्रामपंचायत कळंभे सर्वाधिक शासकीय योजना गावांमध्ये राबवत असुनही काही मिळकत धारक घरपट्टी व पाणीपट्टी वसुल वेळेवर देत नाहीत त्यांचेवर कारवाई करणेबाबत चर्चा करण्यात आली आहे.त्याचप्रमाणे *चालु आर्थिक वर्षामध्ये सष्टेंबर २०२४ अखेरपर्यंत १०० टक्के वसुल करण्याचे उद्दिष्ट* ठेवले आहे.त्यासाठी *जे खातेदार सप्टेंबर अखेरपर्यंत घरपट्टी व पाणीपट्टी भरतील त्यांना घरपट्टी चे करात ५ टक्के सवलत* देणेत येणार आहे आणि *सप्टेंबर २०२४ अखेर पर्यत घरपट्टी व पाणीपट्टी भरणाय्रा मिळकत धारकांना लकी ड्रॉ पद्धतीने/चिट्टी काढुन पहिल्या तीन क्रमांक निघतील त्या मिळकत धारकांना आकर्षक पैठणी,भेटवस्तु,गृह उपयोगी वस्तु दिली जाणार आहे.याची नोंद* तमाम महिला व ग्रामस्थांनी घ्यावी आणि आपले ग्रामपंचायत करांचा भरणा करावा व ग्रामपंचायतीस सहकार्य करण्याचे आवाहन सरपंच सौ निलम शिवथरे व इतर पदाधिकारी यांनी केले आहे.
त्याचप्रमाणे जि.प.शाळा परीसर सुशोभीकरण, गावांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, सार्वजनिक व खाजगी ठिकाणी होणारे गैरप्रकार रोखणे,गावांमध्ये डाँल्बी बंदी असताना देखील मोठ्या आवाजात वाजवणे.त्यासाठी जनजागृती व प्रतिबंधित फलक लावणे.सुरक्षेच्या दृष्टीकोनातून तसेच गावातील अन्य बेकायदेशीर वाहतुक,होणारे गैरप्रकार सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यावर बेकायदा वाहन पार्किंग करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणे यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सीसीटीव्ही बसवणे आवश्यक आहे.इत्यादी इतर सर्व विषयांवर ग्रामसभेत चर्चा करण्यात आली व नागरिकांच्या योग्य सुचनांनुसार निर्णय घेणेत आला.
ग्रामसभेला सदरील प्रसंगी सरपंच सौ निलम शिवथरे,आदर्श सरपंच सौ ज्योती गायकवाड, माजी सरपंच सौ सारीका गायकवाड, उपसरपंच श्री आबाजी सुतार, भावी उपसरपंच सौ शकुंतला चव्हाण, माजी उपसरपंच श्री प्रकाश बाबर,ग्रा.प.सदस्य श्री.संभाजी गायकवाड व ग्रामस्थ उपस्थित होते.