खटाव:-पुसेसावळी जि.प. गटांतर्गत वाड्या वस्त्यांना मूलभूत सुविधा पुरविणार- विक्रमबाबा कदम. चोराडे ता.खटाव येथे नवीन डी.पी.चा लोकार्पण सोहळा संपन्न
पत्रकार प्रमोद देवाडिगा ( महाराष्ट्र राज्याध्यक्ष ):-9623714741

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार प्रमोद देवाडिगा ( महाराष्ट्र राज्याध्यक्ष )
पुसेसावळी जि.प. गटांतर्गत वाड्या वस्त्यांना मूलभूत सुविधा पुरविणार- विक्रमबाबा कदम.
चोराडे ता.खटाव येथे नवीन डी.पी.चा लोकार्पण सोहळा संपन्न
पुसेसावळी : पुसेसावळी जिल्हा परिषद गट अंतर्गत समाविष्ट असणाऱ्या सर्व वाड्या वस्त्यांना पिण्याच्या- शेती पाण्याची सोय, स्ट्रीट लाईट,आरोग्य, शिक्षण, रोजगाराच्या संधी आदी मूलभूत सुविधा पूरविणार असल्याची ग्वाही पुसेसावळी जि.प.गटाचे युवा नेतृत्व वर्धन ऍग्रो कारखान्याचे कार्यकारी संचालक विक्रमबाबा कदम यांनी दिली,
ते चोराडे (ता.खटाव) येथील नांगरे मळा
व कुरणवस्ती येथे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या वतीने 18 लक्ष रुपये किमतीच्या बसविण्यात आलेल्या दोन नवीन डीपीच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्रीकांत पिसाळ, भैरवनाथ सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन धनश्री साळुंखे,व्हा.चेअरमन सुलोचना पिसाळ, संचालक उमेश पिसाळ, नंदकुमार पिसाळ, माजी चेअरमन हणमंत पिसाळ,गोविंदशेठ पिसाळ,माजी सोसायटी संचालक विलास पिसाळ नांगरे,भाऊसो पिसाळ, बाळासो पिसाळ आदिची मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
कदम पुढे म्हणाले,भाजपा जिल्हाध्यक्ष आ.जयकुमार गोरे व कराड उत्तर भाजपाचे नेते धैर्यशील कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सातत्याने पाठपुरावा करून नांगरेमळा व कुरणवस्ती येथे नवीन डीपी साठी 18 लाख रुपये निधी मंजूर केला. आपल्या विभागातील नागरिकांच्या वैयक्तिक गाठीभेटी घेऊन त्यांचे प्रश्न जाणून घेऊन ते सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे पुसेसावळी जि.प.गटातील कोणते गाव वाडी-वस्ती विकासापासून वंचित राहणार नाही यासाठी शासन दरबारी पाठपुरावा सुरू असून आपल्याला निधीची कोणतीही कमी भासणार नाही.
यावेळी बोलताना चोराडे गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत आप्पा पिसाळ म्हणाले आ.जयकुमार गोरे, भाजपा नेते धैर्यशील कदम यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेतृत्व विक्रमबाबा कदम यांनी सर्वांना बरोबर घेऊन विकासाचे जे पर्व पुसेसावळी जि.प.गटात निर्माण केले आहे त्यामुळे या विभागातील जनता भविष्यात निश्चितच त्यांना पाठबळ देईल असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे.
यावेळी सुनील पिसाळ, चंद्रकांत पिसाळ, चंद्रकांत अवघडे,नवनाथ पिसाळ,रवींद्र पिसाळ,संतोष माळी,अशोक पिसाळ, शामराव पिसाळ, भीमराव मोरे,बजरंग पिसाळ, श्रीकांत पिसाळ पत्रकार,अशोक पाटील,अनिल पिसाळ,प्रशांत पिसाळ, रामभाऊ पिसाळ,दत्तात्रय पिसाळ, दत्तात्रय निकम,रघुनाथ पिसाळ,संतोष माळी, नाथा पवार, मंगेश पिसाळ,महेश पिसाळ, अण्णा साळुंखे,सुभाष पिसाळ, शुभम पिसाळ,सागर पिसाळ,रामचंद्र पिसाळ, भगवान पिसाळ यांचेसह गावातील ग्रामस्थ व महिला मोठ्या
संख्येने उपस्थित होते.