श्रीरामपूर:-विश्वरत्न, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या महपरिनिर्वाण दिनी त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!
पत्रकार विनायक मोहन श्रीरामपूर तालुका जनसंपर्क प्रतिनिधी

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार विनायक मोहन श्रीरामपूर तालुका जनसंपर्क प्रतिनिधी
RPS STAR NEWS
विश्वरत्न, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या महपरिनिर्वाण दिनी त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!
माळेवाडी-श्रीरामपूर प्रतिनीधी
६ डिसेंबर १९५६ रोजी घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निधन झाले होते. याच्या दुसऱ्या दिवशी ७ डिसेंबर रोजी मुंबईतील चैत्यभूमी येथे त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंतिमसंस्कार करण्यात आले. निधनापूर्वी त्यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी लक्षावधी अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला होता, त्यांना बौद्ध लोक ‘बोधिसत्त्व’ मानतात.
बाबासाहेब आंबेडकर हे बौद्ध गुरू होते, यामुळे त्यांच्या पुण्यतिथीसाठी ‘महापरिनिर्वाण’ हा बौद्ध संकल्पनेतील शब्द वापरण्यात आला आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त १ डिसेंबर पासून मुंबईतील त्यांचे समाधीस्थळ असलेल्या चैत्यभूमी येथे भारतभरातून लक्षावधी लोक येतात. चैत्यभूमी येथे २५ लाखाहून अधिक भीमानुयायी जमा होतात व चैत्यभूमी स्तूपात ठेवलेल्या आंबेडकरांच्या अस्थीकलश व प्रतिमेस अभिवादन करतात व बाबासाहेबांचे दर्शन घेतात.
या दिवशी भारत तसेच जगभरातील आंबेडकरवादी व्यक्ती आंबेडकरांची प्रतिमा व मुर्ती समोर ठेवून त्याच्या स्मृतीस अभिवादन करतात. स्थानिक बौद्ध विहारे (बौद्ध मंदिरे), स्वतःच्या घरी, सार्वजनिक स्थळी, शाळा-महाविद्यालये, शासकिय कार्यालये इ. या ठिकाणी या दिवशी त्यांना अभिवादन करतात. राजकीय नेते व इतर मंडळी बाबासाहेबांच्या सार्वजनिक ठिकाणच्या आंबेडकर स्मृतीस्थळांना वंदन करतात त्याचप्रमाणे ग्रामपंचायत माळेवाडी वतिने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त सरपंच, उपसरपंच, सदस्य, कर्मचारी, ग्रामस्थ यांनी अभिवादन केले.