ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

सातारा:-आली रे आली आता भाजपची फुटीची बारी आली?

पत्रकार अजित जगताप सातारा:-9922241299

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

पत्रकार अजित जगताप सातारा

आली रे आली आता भाजपची फुटीची बारी आली?

महाराष्ट्राच्या राजकारणाला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. तसेच सामाजिक चेहरा सुद्धा आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाचा आदर्श देशभर घेतला जात होता. सध्याच्या राजकारणाबद्दल फारसं चांगलं बोलले जात नाही. त्याचे कारण गुणात्मक दृष्ट्या न पाहता संख्यात्मक पाहिले जात आहे. त्यामुळे फुटीचा शाप सुरू झाला असून आली रे आली आता भाजपची फुटीची बारी आली? अशी आता बारीक आवाजात विरोधकांची कुजबुज सुरू झालेली आहे.
आत्तापर्यंत महाराष्ट्राच्या मातीत १९७८ साली ज्येष्ठ नेते शरद चंद्र पवार साहेब यांनी स्वतंत्र सैनिक व काँग्रेस नेते वसंतदादा पाटील यांचे सरकार पाडून त्या ठिकाणी पुरोगामी लोकशाही आघाडीचा प्रयोग सुरू केला. तेव्हापासून पाठीत खंजीर खुपसले. हा शब्द प्रयोग राजकारणामध्ये ग्रामीण पातळीपर्यंत पोहोचवण्यात आला होता. त्यानंतर बऱ्याच कालावधीनंतर उप मुखयमंत्री हे पद निर्माण करून काँग्रस पक्षाचे दलित नेते नासिकराव तिरपुडे यांनी या पदावर कार्यरत केले होते. पण त्यामध्ये पक्षपातळीवर अंतर्गत हेवेदावे होते. हे विसरून चालणार नाही. १९ ८९ साली रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षात फूट पाडून त्यांना समाज कल्याण मंत्री केले व रिपब्लिकन ऐक्य होऊ दिले नाही. हा इतिहास अजूनही कोणी विसरलेले नाही. त्यानंतरचा कालावधी पाहता नागपूरच्या अधिवेशनामध्ये शिवसेनेचे १८आमदार फोडून शिवसेनेच्या वाघाला डिवचले होते. त्यानंतर काँग्रेस पक्षातही अशीच फूट पाडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निर्मिती झाली होती. ही निर्मिती सत्तेसाठी होती का सोनिया गांधीचे विदेशी मुद्द्यावर? हे आता स्पष्ट होऊ लागले आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्येही फूट पाडून महत्वकांक्षी असलेल्या अजित पवार यांनी भाजप सोबत जाण्याचा सोईस्कर निर्णय घेतला. आता या सर्व घडामोडी मध्ये भाजपमध्ये सर्वकाही अलबेल आहे. असं वरवर वाटत असले तरी अंतर्गत हेवेदावे, वादविवाद हे जरी मीडियासमोर आणले जात नसले तरी अनेक नेत्यांची मुस्काटदाबी होत आहे.ही स्पष्टपणे जाणवू लागलेली आहे .त्यामुळे आली रे आली आता भाजपची बारी आली? अशी कुजबूज सुरू झालीआहे . त्याबद्दल फारसं गांभीर्याने कोणी घेणार नाही पण जिथे जाळ आहे तिथे धूर निघतो. कालांतराने त्याचा वनवा भडकतो. ही बाब सुद्धा विसरता येणार नाही.
तसं भाजपचा इतिहास पाहिला तर भारतीय जनसंघाची स्थापना १९५१ साली श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी केली होती. १९६७ साली भारतीय जनसंघाने स्थानिक प्रादेशिक पक्षाशी आघाडी करून मध्य प्रदेश ,बिहार, उत्तर प्रदेश मध्ये सरकार निर्माण केले होते. तोच प्रयोग देशभर १९७७ साली जनता पार्टी या नावाने करून पंतप्रधानपदी मोरारजी देसाई यांना बसवलं होतं. त्यावेळेला भारतीय लोक दल, काँग्रेस, सोशलिस्ट पार्टी, रिपब्लिकन घटक पक्ष मधील नेते यांचा समावेश करण्यात आला होता. याच जनसंघ व जनता पार्टीतून भारतीय जनता पक्षाची १९८० झाली निर्मिती झाली. या निर्मिती मधूनच दि:६ एप्रिल १९८० साली भाजपची स्थापना झाली. या वेळेला ज्येष्ठ नेते जयप्रकाश नारायण, दीनदयाळ उपाध्याय, महात्मा गांधी यांची तसबीर लावण्यात आली होती.
आज महाराष्ट्राचा विचार केला तर भाजपला बहुमतासाठी कमळ चिन्ह घेऊन १४५ हा जादुई आकडा पार करता आलेला नाही. ही शल्य त्यांना कायम बोचत राहिलेली आहे. आज महाराष्ट्राच्या विधिमंडळातील आमदारांचे संख्याबळ पाहता भाजप १०५ शिवसेना ५६ राष्ट्रवादी ५३ काँग्रेस ४४ बहुजन विकास आघाडीतील प्रहार जनशक्ती, एम .आय. एम. समाजवादी, प्रत्येकी २ व मनसे मार्क्सवादी कम्युनिटी पक्ष जन स्वराज्य शक्ती क्रांतिकारी शेतकरी व शेतकरी कामगार पक्ष राष्ट्रीय समाज पक्ष स्वाभिमानी यांचे प्रत्येकी १ आमदार आणि अपक्ष२८ आमदार आहेत.
महायुतीकडे १६२ व महाआघाडीकडे १०५ असे संख्याबळ आहे. तसं पाहिलं तर सेना-भाजप युतीने काँग्रेस- राष्ट्रवादीला चांगलेच प्रत्युत्तर दिले होते. पण त्यानंतर आमदारांची फोडाफोडी व इतर पक्षातील नेत्यांना सामावून घेऊन आपले आकडेवारी वाढवण्यासाठी राजकीय पक्षांनी सब घोडे बारा टक्के हे समजून घेतले .तसं पाहता२०१४ साली भाजप १२२ होते. शिवसेना ६३ होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ४१ होती व अपक्ष ७ होते. पण त्यानंतर काहींनी पक्ष बदलले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे १४ आमदार होते. आता १आमदार उरलेला आहे. त्यांनी सुद्धा भाजपमध्ये न जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. वास्तविक पाहता भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातील नेते प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, आण्णासाहेब डांगे, एकनाथ खडसे हे लोकप्रिय चेहरे होते .आता खऱ्या अर्थाने देवेंद्र फडणवीस हे भाजपचे चाणक्य चेहरा झालेले आहेत. त्यांना आपलंसं केले आहे. त्यामुळे भाजप वाढवताना ज्यांनी संघर्ष केला ते भाजपपासून हळूहळू दूर होत गेलेले आहेत. आज विधिमंडळामध्ये २४ महिला आमदार आहेत. त्यापैकी भाजपकडे १२ महिला आमदार आहेत. पण, त्यांना मंत्रिमंडळात संधी न मिळाल्यामुळे त्यांच्यामध्ये नाराजी पसरली असून या नाराजीला हळुवार फुंकर घातली गेली तर यातील काही महिला भाजप सोडू शकतात? तशाच पद्धतीने भाजप साठी आक्रमक लढा देणारे भाजपचे नेते किरीट सोमय्या, आशिष शेलार, प्रदिप रावळ, गणेश नाईक, संजय जोशी,विनोद तावडे, पंकजा मुंडे, माधव भंडारी, डॉ दिलीप येळगावकर,चित्रा वाघ, प्रीतम मुंडे, तसेच मराठवाडा विदर्भ व नागपूर येथील व पश्चिम महाराष्ट्रातील काही भाजप वरिष्ठ नेते नाराज झालेले आहेत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिंदू महासभा ,जनसंघ अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अशा हिंदुत्ववादी संघटनेचा पुरस्कार करणाऱ्या संघटनेत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना फारसा राजकारणात वाव राहिलेला नाही. त्यामुळे त्यांना आता काँग्रेसमुक्त तोंडी बोलणं केलं असलं तरी सध्या भाजपमध्येच निष्ठावंत भाजप कार्यकर्ता मुक्त कार्यकर्त्यांना सत्तेत वाटा मिळू लागले आहे . हे आता खटकत आहे .
राजकारणामध्ये काही होऊ शकते. काही घडू शकते. दिल्लीमध्ये बसलेल्या नरेंद्र मोदी व अमित शहा यांना देश हिताच्या चेहऱ्यामध्ये आपलं साम्राज्य निर्माण करण्याचे मुखवटे तयार केलेले आहेत. हेच मुखवटे भारतीय जनता पक्षामध्ये फूट पाडण्यासाठी पुढे आले तर आश्चर्य वाटणार नाही. त्यामुळे ग्रामीण शैली सांगायचे झाले तर शिवसेना, काँग्रेस, रिपब्लिकन पक्ष, राष्ट्रवादी, मनसे यांच्यातील बंडाळी पाहून झालेली आहे. आता आली रे आली भाजपची बारी आली? असं म्हणण्यासाठी आता काही काळ वाट पाहावी लागेल की निष्ठावंत निष्ठा कायम ठेवतील. हे पाहणे राजकीय दृष्ट्या नवलाईचे ठरणार आहे. तुर्त एवढेच,, आणि हो,,,, कावळ्याच्या शापाने ढोर मरत नाही. पण, कावळ्याचे पुण्य ही पदरात पडत नाही. हे मात्र खरे होऊ शकते का? याची वाट पहावी लागणार आहे.

____________________________________
चौकट _____________

भाजप कार्यकर्ता हा कट्टर हिंदुत्ववादी आहे. त्यामध्ये आता इतर पक्षातून आलेल्या आमदारांनी सुद्धा री ओढली आहे. अडीच वर्षाच्या कार्यकाळात सत्ता नसतानाही भाजपचा एकही आमदार फुटलेला नाही. हे विसरता येणार नाही .पण, भविष्यात इतर पक्षातून आलेले आमदार भाजप सोबत राहतील का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्यामध्ये किती सत्य किती असत्य? हे मात्र समजू शकले नाही.
———————————————
जेष्ठ पत्रकार:::अजित जगताप,सातारा मो.नंबर ९९२२२४१२९९

फोटो –

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button