सातारा:- “ये तो होना ही था” – ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप
संपादक प्रल्हाद चव्हाण :-7447520147

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ये तो होना ही था,,,,,, अजित जगताप
सातारा दि: महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये धक्का तंत्र अवलंबून सत्तेच्या म्हशीला गोधडी चिटकावी अशा पद्धतीने अनेकजण चिटकू लागलेले आहेत. ही काळाची महिमा आहे .याला कोणीही अपवाद नाही अखेर ये तो हो ना ही था… याच्यावर आता शिक्का बसला आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काही ठराविक नेतेगण मंडळी यांनी आपली राजकीय ताकद व वारस निर्माण केले होते. त्यामध्ये शंकरराव चव्हाण, वसंत दादा पाटील, राजारामबापू पाटील, आदिक ,हिरे, विखे पाटील असे अनेकांची नावे घेतली जातील. परंतु, सध्या राजकारण वेगळ्या वळणावर आलेले आहे. एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करून भीती दाखवणे आणि त्या भीतीपोटी सत्तेत सामील करून घेणे .हा नवा पांडा सर्वसामान्य जनतेला रुचलेला नाही. बारामतीच्या राजकारणामध्ये भीष्माचार्य असलेले जेष्ठ नेते शरदचंद्र पवार साहेब यांचे पुतणे ही ओळख असलेल्या अजित दादा पवार यांनी पहाटेचा शपथविधी केला. त्यानंतर त्यांनी आत्मक्लेष केले. त्याला अजूनही लोक विसरले नसतानाच पुन्हा लोकांनाच आत्मक्लेश करण्यास भाग पाडले आहे. शेवटी लोकशाहीमध्ये आपण लोकांचा आदर राखणे. लोकशाहीमध्ये व्यक्तिस्वातंत्र्याला ही महत्त्व आहे. त्यानुसार राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी व्यक्तिगत घेतलेले निर्णय हे त्यांच्या समर्थकांसाठी आनंदाची बाब आहे. परंतु सर्वसामान्य माणसांनी भाजप विरोधात जे मतदान केले. त्याच भाजप सोबत आता कोणतीही कुचराई न करता अजितदादा पवार यांनी राज्याच्या सत्तेमध्ये सहभागी झाले आहेत.
वास्तविक पाहता महाराष्ट्राच्या राजकारणात महाविकास आघाडी निर्माण झाली. त्याला कोणतीही वैचारिक बांधिलकी व वैचारिक बैठक नव्हती. त्यामुळे एकमेकांच्या सोयीनुसार रिलेशनशिप ठेवूनच ही महाविकास आघाडी झाली. त्याचबरोबर भाजप व शिंदे गटाने सुद्धा सवत रडकी झाली तरी चालेल? अशा पद्धतीने कार्य काम केलेले आहे .आता हा नाटकाचा दुसरा अंक बाहेर पडलेला आहे .
अजित पवार यांच्यासोबत तीस आमदार आहेत. अशी जी आकडेवारी मांडली जाते. त्यामध्ये फारसं तथ्य नाही. कारण, राष्ट्रवादी काँग्रेस ५४ शिवसेना ५६ भारतीय जनता पक्ष १०५ राष्ट्रीय काँग्रेस४४ व इतरांची संख्या पाहता आमदारांच्या फोडाफोडी मध्ये नेत्यांचा हात असल्याचे बोलले जात आहे. विशेषता या वयात पवार साहेबांना अस्वस्थ करणारा पुतण्या अजित पवार म्हणजे फ्लॅशबॅक ठरू लागलेले आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीत राज ठाकरे हे शिवसेनेतून बाहेर पडून त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना उभी केली तसेच पद्धतीने आता अजित दादा पवार नवीन पक्ष स्थापन करून आपल्या स्वतःभोवती पश्चिम महाराष्ट्रातील पक्ष अशी मर्यादा घालतील. असे एकूण दिसत आहेत राजकारणामध्ये तत्व, नीतिमत्ता पायदळी तुडवण्याचेराजकीय पुण्य काम सर्वच महान नेत्यांनी केलेले आहे. त्यामुळे कुणाला नाव ठेवावे? असं काही नाही.
मतदार सुज्ञ आहेत. त्यांनी सुद्धा मतदान करताना आमचं भागवा? तुम्ही कुठेही जा? असाही संदेश दिलेला आहे. हे विसरून चालणार नाही. सध्या अजितदादा पवाराच्या बंड्यामुळे ओ.बी.सी. नेते छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, संजय बनसोड, धनंजय मुंडे, आदिती तटकरे, अनिल पाटील, दिलीप वळसे पाटील, धमराज आत्रम इतरांना सत्तेत चांगली संधी मिळालेली आहे. परंतु त्यांच्या पाठीशी असणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांचा हिरमुस झालेला आहे. भाजप मधील मंत्री पदाच्या शर्यतीत असलेल्यांना तुर्त बाजूला ठेवले आहे . गरज सरो वैद्य मरो असेच घडले आहे.त्यामुळे त्यांचे समजूत काढताना या नेत्यांना सुद्धा फारच कष्ट घ्यावे लागणार नाही. कारण, कार्यकर्त्याची अपेक्षा काय आहे? त्याची पूर्तता कशी केली जाते? हे सर्व नेत्यांना ठाऊक आहे. त्यामुळे आता मतदारांनाच मतदान करताना काळजीपूर्वक जाहीरनामा न वाचता व्यक्तीच्या मनातील घालमेल ओळखूनच मतदान करावे. अन्यथा पश्चातापाची वेळ येणार नाही. याची काळजी घ्यावी. तुर्त एवढेच सांगणे आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात एकेकाळी फुले- शाहू- आंबेडकरांच्या विचारांचा प्रभाव होता. तो प्रभाव कमी झाला असतानाच ज्यांनी फुले — आंबेडकरांचे नाव घेऊन सत्ता भोगली. आता पुन्हा तीच मंडळी सत्तेत आल्यामुळे सर्वसामान्य धर्मनिरपेक्ष व समतेचा नारा देणाऱ्या कार्यकर्त्याची अस्वस्थता बेचैन करत आहे. कारण, जे काय घडले आहे. त्याच्या पाठीमागे यापैकी एकच कारण असू शकते. ते म्हणजे सत्तेचा हाव किंवा ईडी हे आता स्पष्ट झाले आहे.
____________पत्रकार अजित जगताप, सातारा वेळ – दुपारी तीन वाजता.