कराड:-कराडमध्ये पतसंस्थेच्या अडून मामा- भाचे करतात खाजगी सावकारी , शेतकऱ्याचा गंभीर आरोप.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
कराडमध्ये पतसंस्थेच्या अडून मामा- भाचे करतात खाजगी सावकारी , शेतकऱ्याचा गंभीर आरोप.
कराड दि: सर्वसामान्य माणसाला प्रगतीसाठी सहकार खात्याने खाजगी बँका, सावकारी व पतसंस्थेला अटी व शर्ती लावून परवाना देण्यात आलेला आहे. त्यामुळे अनेकांच्या प्रगतीला हातभार लागला असला तरी सध्या सहकार खात्यामध्ये अपप्रवृत्ती वाढलेली आहे. यावर निर्बंध घालण्यासाठी रेठरे बुद्रुक ता. कराड येथील गरीब शेतकरी संपत साळुंखे यांनी अनेक निवेदन दिलेले आहे. परंतु, कारवाई होत नसल्याने आता त्यांनी सामुदायिक आत्महत्या करण्यासाठी परवानगी मागितल्याने खळबळ माजली आहे.
याबाबत माहिती अशी की रेठरे बुद्रुक ता. कराड या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बागायत शेती असून या भागात शेतीच्या दुरुस्तीसाठी शेतकरी संपत साळुंखे यांनी पतसंस्थेच्या कागदपत्र व जामीनदाराची वाट न पाहता तातडीने आपल्या जमिनीचे सपाटीकरण व इतर कामासाठी खाजगी इसमा कडून दहा टक्के व्याजाने कर्ज उचलले होते. या कर्जाची काही अंश परत फेडी करण्यात आली होती. परंतु सावकारीसाठी सोकावलेल्या एका मामा भाच्याने या गरीब शेतकऱ्याचा फायदा घेऊन त्यांच्या जमिनीच्या कागदपत्राचा वापर केला देवाच्या नावाने असलेल्या एका पतसंस्थेकडे कर्ज प्रकरण केले व ते त्वरित मंजूर करून या कर्जाची रक्कम मामा भाच्याने हडप केल्याची तक्रार शेतकरी संपत साळुंखे यांनी शासकीय दरबारी केली होती.
याबाबत याबाबत अनेकदा त्यांनी हेलपाटे मारले. विनंती केल्या. परंतु, त्यांना कागदी घोडे नाचवून काही अधिकाऱ्याने हतबलता दाखवली. त्यामुळे गरीब व कष्टकरी शेतकरी यांच्या उपजीविकेच्या प्रश्न निर्माण झालेला आहे. भविष्यात सामुदायिक आत्महत्या करून जीवन संपवण्यासाठी शासनाने परवानगी द्यावी. अशी त्यांनी मागणी केलेली आहे. दरम्यान ,त्यांच्या घर व शेत जमिनीचा लिलाव करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती समजली असून शेतकरी संघटनेमध्ये संतापाची लाट उसळलेली आहे. खाजगी सावकारीच्या माध्यमातून पतसंस्थेला हाताशी धरून असा प्रकार म्हणजे मोगलाई लागलेली आहे की काय? असा प्रतिप्रश्न शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी केला आहे .
या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाल्यास त्याला संबंधित मामा- भाचे जबाबदार राहतील .असे स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान याबाबत दुसरी बाजू समजण्यासाठी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.
फोटो -शेतकरी संपत साळुंखे