सातारा येथे गिरणी कामगार व वारसदारांची दिंडी जिल्हाधिकारी दरबारी…
पत्रकार सागर पिसाळ खटाव:-7875411591

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक :: प्रल्हाद चव्हाण (82088717483)
सातारा येथे गिरणी कामगार व वारसदारांची दिंडी जिल्हाधिकारी दरबारी…
(सातारा) :: मुंबई घडवण्यात सिंहाचा वाटा असणारे 1 लाख 75 हजार गिरणी कामगार अजून ही मुंबई मध्ये घराच्या प्रतीक्षेत आहेत. वेळोवेळी सरकार बदलले पण गिरणी कामगारांच्या प्रश्न अद्यापही कोणीही सोडविला नाही.
त्याचबरोबर जे काही 10 ते 15 हजार गिरणी कामगारांना या 20 वर्षात घर मिळाले त्यांना तब्बल 10 ते 11 लाख भरावे लागत आहेत.
अश्यातच जे अतिक्रमण करून व परप्रांतीय मुंबई त स्थायिक झालेत त्यांच्यासाठी 2 लाख 50 हजारात घर हा विरोधाभास का?
गिरणी कामगाराना मुंबई येथे हक्काची 2.5 लाखात घरे, वारसांना गिरणी वास्तुसंग्रहालय येथे नोकरी, सारख्या अन्य विविध मागण्यांसाठी #गिरणी कामगारांच्या वारी शासनाच्या दारी या tagline ने आज स्वराज्याची राजधानी सातारा येथे सातारा, सांगली ,कोल्हापूर जिल्ह्यातील गिरणी कामगार उपस्थित होते यावेळी गिरणी कामगार स्वराज्य संस्थेचे अध्यक्ष तेजसजी कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोवई नाका सातारा येथे श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून रास्ता रोको करण्यात आला.
तसेच शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेवुन मा.जिल्हाधिकारी यांना याबाबत निवेदन दिले
या मेळाव्याचे नियोजन श्री विठ्ठल चव्हाण यांनी केले यावेळी सोबत संस्थेचे अर्जुन भादवनकर, सागर पिसाळ, दिलीप सावंत,विशाल कुंभार,अभिजित शेलार आदी उपस्थित होते….
प्रतिनिधी = सागर पिसाळ (7875411591)