खटाव:-पावसाअभावी मायणी परिसरातील पेरण्या खोळंबल्या; शेतकरी चिंताग्रस्त.
पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके सातारा:-9890318605

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार प्रा दिलीप पुस्तके सातारा
पावसाअभावी मायणी परिसरातील पेरण्या खोळंबल्या; शेतकरी चिंताग्रस्त.
मायणी प्रतिनिधी–कायम दुष्काळाच्या छायेत राहणाऱ्या खटाव तालुक्यात विशेषता मायणी परिसरात यंदा मान्सूनपूर्व कसलाही पाऊस न झाल्याने पेरणी पूर्व मशागती होऊ न शकल्याने खरीप हंगामातील पेरण्या खोळंबल्या आहेत त्यामुळे बळीराजा चिंतातुर झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की खरीप हंगामाच्या पावसावर रब्बी हंगामी तो परंतु यंदा मात्र कडक उन्हाळ्यामुळे कसलाही मान्सूनपूर्व पाऊस झाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी नांगरट केलेली शेती तशीच पडून आहे या हंगामात उडीद मुग, चवळी, काळा घेवडा , वाघा घेवडा, सोयाबीन, मका ही आर्थिक बळ देणारी पिके घेतात परंतु दिनांक आठ रोजी एक तास पाऊस झाल्यानंतर पुन्हा पाऊस न झाल्यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. नेहमी उन्हाळ्यात एक-दोन वादळी वाऱ्यासह पाऊस होतात या पावसावर बळीराजा आपली मेहनत करतो आणि मृग नक्षत्रात पेरणी करून तो आषाढी वारीला जातो सध्याआषाढी वारी सुरू झालेली आहे परंतु पावसाची रिमझिम मात्र कसलीही नाही कडक उन्हामुळे जमिनीमध्ये कसलाही ओलावा नाही यंदा पेर होतो की नाही याची चिंता बळीराजाला लागली.