सातारा:-न्याय मिळत नसल्याचे माहित असूनही काही पुरोगामी व दलित कार्यकर्त्यांचे आंदोलने.
पत्रकार अजित जगताप सातारा:-9922241299

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार अजित जगताप सातारा
न्याय मिळत नसल्याचे माहित असूनही काही पुरोगामी व दलित कार्यकर्त्यांचे आंदोलने.
सातारा दि: महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्धिमत्तेच्या जोरावर व स्वाभिमानी बाणा राखून भीम क्रांती केली. या क्रांतीला त्याकाळी सुद्धा बुद्धिवादी व समतेचा विचाराने वागणाऱ्या लोकांकडून प्रतिसाद मिळाला. त्यामुळे अनेक प्रश्न निकाली काढण्यात यश मिळाले. परंतु, दुर्दैवाने आज मोर्चा आंदोलने व निदर्शने करूनही दलितांची सत्य बाजू असतानाही न्याय मिळत नसल्याची खंत पुरोगामी दलित चळवळीतील कार्यकर्ते खाजगीत करू लागलेले आहेत.
याबाबत माहिती अशी की, मराठवाडा येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्या लढ्यात पोचिराम कांबळे ,अंबादास साबणे असे असंख्य तरुण शहीद झाले होते. तेव्हापासून ते अगदी घाटकोपर येथील माता रमाबाई नगर येथील गोळीबार, खैरलांजी येथील भोतमांगे कुटुंबे वर झालेला अन्याय तसेच आता नांदेड येथील अक्षय भालेराव याची निर्गुण हत्या. या बाबीकडे पाहिले असता पुरोगामी व दलित चळवळीतील कार्यकर्त्याचा आवाज अलीकडच्या काळात शीण झाल्याचे दिसून आले आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया म्हणजे मोठ्या हत्तीचे अवयव वाटून घेऊन तयार झालेला पक्ष. अशी अवस्था असल्याची चर्चा बांधव करीत आहेत. राष्ट्रीय अध्यक्ष होण्याची घाई झालेल्या डझनभर नेत्याच्या मागे अनेक कार्यकर्ते असतात. वैचारिक बांधिलकी व समाजाच्या प्रगतीपेक्षा ज्यांना वाहनावर स्टिकर व विजिटिंग कार्ड आणि लेटर पॅड छापण्यासाठी पक्षाची आवश्यकता असते. पक्ष नेते सुद्धा अशा रेडिमेड कार्यकर्त्यांना पद देऊन आपली उठा बस होण्याची व्यवस्था करते .त्यामुळे मूलभूत प्रश्न बाजूला पडलेले आहेत.
दलित व पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यावर अन्याय झाल्यानंतर आवाज उठवण्यामध्ये जे नेते पुढे असतात .त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल कोणी शंका घेत नाही. परंतु, त्यांच्यासोबत असणारी मंडळी हे इतर पक्षाच्या नेत्यांच्यासाठी चटई सादरी अंथरणारे व मोठ्या कार्यक्रमाचे वेळी खुर्च्या लावणारे, हारतुरे व शाल आणून देणारे लाचार कार्यकर्ते असतात. त्यामुळे त्यांच्या निष्ठेबद्दल आपलेच कार्यकर्ते शंका उपस्थित करतात. हे एक प्रकारे लोकशाहीची लक्षणे आहेत. पण आता सध्या जे काय राजकारण चाललेले आहे. त्यात बदल करणे आवश्यक आहे . एकीकडे दलित चळवळीतील काही कार्यकर्ते जातीयवादी शक्तीचा हात बळकट करीत आहेत.दुसऱ्या बाजूला जातीयवादी शक्तीला मताधिक्य जरी मिळाली नाही तरी त्यांचा उमेदवार निवडून देण्यासाठी आर्थिक व्यवहार करायचे. अशा अनेक बाजूने दलित चळवळ बदनाम होत आहे. त्यातूनच मग अशी हत्याकांड झाल्यानंतर सप्ताह साजरा म्हणून निदर्शने व आंदोलन केली जातात. नंतर मात्र निवडणुकीत इतर पक्षाचा ध्वज हाती घेऊन कार्यकर्ते व नेते मिरवतात. हे आता कुठेतरी थांबले पाहिजे.
जे कार्यकर्ते प्रामाणिकपणाने २४ तास पक्षासाठी अथवा समाजासाठी काम करत आहे. त्यांच्यासाठीच आता समाजाने रस्त्यावर उतरावे. ही सांगण्याची वेळ आली आहे. आज अक्षय भालेराव सारख्या तरुणाची डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती केली म्हणून हत्या होते. दुसऱ्या बाजूला त्यांच्या कुटुंबीयांना आधार देण्याचे काम रिपब्लिकन पक्षाचे रिपब्लिकन पक्षाचे नेते करत आहेत. मात्र इतर ज्या पक्षाशी आपले आघाडी व युती आहे. त्या पक्षातील खासदार व आमदारांनी एक शब्द काढलेला नाही. यातून त्यांच्या जातीवादी मानसिकतेलाच बळ देत आहे. याचा आता नव्या पिढीने विचार करणे गरजेचे आहे. अन्यथा पुन्हा एकदा पोचिराम कांबळे, एखादा अक्षय भालेराव झाल्यानंतर पुन्हा निदर्शने पुन्हा निराशा असा ऊन पावसाचा खेळ थांबवावा.अशी अपेक्षा दलित पॅंथर चळवळीतील काम करणारे जेष्ठ कार्यकर्ते शहाजी मोहिते, कुणाल गडांकुश, भीमराव केंगार, प्रेमानंद जगताप, सिद्धार्थ कांबळे, अजित नलावडे, अमोल गंगावणे यांच्या सारख्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. त्याला चळवळीशी बांधिलकी जपणाऱ्या अनेकांनी दुजारा दिला आहे.
फोटो – अन्याय झाल्यावर आंदोलन करून निवेदन देताना कार्यकर्ते,,, (प्रतिनिधिक स्वरूपात)