खटाव तालुक्यातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत.
ज्येष्ठ पत्रकार प्रा दिलीप पुस्तके सातारा:-9890318605
ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार प्रा दिलीप पुस्तके सातारा
खटाव तालुक्यातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत. मायणी प्रतिनिधी—खटाव तालुक्यातील विशेषतः मायणी परिसरातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत असून सध्या पाऊस नसल्याने त्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे दरवर्षी उन्हाळ्यात एक दोन मान्सून पूर्व पाऊस होतो या पावसावर बळीराजा पेरणीपूर्व मशागत करतो परंतु यंदा एकही पाऊस न झाल्याने संपूर्ण पेरणीपूर्व मशागती खोळंबलेल्या आहेत तसेच सध्या इतका क उन्हाळा आहे की हा उन्हाळा वरदान नसून शाप ठरू लागला आहे या उन्हाळ्यात जनावरे चारा खात नसल्याने त्यांचा दुधावर गंभीर परिणाम झाला आहे तसेच उन्हाळी पिके ऊस भुईमूग कापूस ही पिके जागेवर जळू लागले आहेत विहिरीतील पाण्याने तळ गाठला असून विहिरी पूर्णपणे आटलया आहेत याबाबत येथील शेतकरी किसनराव मोरे यांनी सांगितले की यंदाचा उन्हाळा इतका कडकआहे की आमच्या आयुष्यात असा उन्हाळाआम्ही पाहिला नव्हता या उन्हाळ्यामुळे जगजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे सामान्य जन हैराण झाले आहेत पाण्याशिवाय पशुपक्षी तडफडू लागले आहेत सध्या रोज सायंकाळी आकाशात ढग गोळा होतात वारा सुटतो व पाऊस निघून जातो सध्या मान्सून लांबला तर या खटाव तालुक्यात दुष्काळाची गडद छाया पसरू शकते असेही त्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले