कृषी व व्यापारताज्या घडामोडीमहाराष्ट्र

खटाव:-सोळा गावच्या पाणी प्रश्न बाबत दि: ३१ मे रोजी होणाऱ्या बैठकीला रिपब्लिकन पक्षाचा जाहीर पाठिंबा

पत्रकार अजित जगताप सातारा:-9922241299

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

पत्रकार अजित जगताप सातारा

सोळा गावच्या पाणी प्रश्न बाबत दि: ३१ मे रोजी होणाऱ्या बैठकीला रिपब्लिकन पक्षाचा जाहीर पाठिंबा

वडूज दि: सध्या पाण्याच्या प्रश्नाबाबत सर्वच राजकीय पक्ष आपल्या नेत्याचे गुणगान गात आहेत. आमच्यामुळेच परिसरात पाणी आले आहे. असे समर्थक सोशल मीडियावर व्यक्त होतात .परंतु ,खटाव तालुक्यातील औंध व सोळा गावांना पाणी उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांनी श्रमातून पिकवलेली शेती धोक्यात आलेली आहे. याबाबत विचार विनिमय करण्यासाठी शेतकरी व ग्रामस्थांच्या वतीने बुधवार दिनांक ३१ मे रोजी नागाचे कुमठे येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर, कुमठे ता. खटाव या ठिकाणी सर्व पक्षीय बैठक आयोजित केलेले आहे. या बैठकीला रिपब्लिकन पक्षाच्या(आठवले गट) वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आलेला आहे .
खटाव तालुक्यातील राजकीय दृष्ट्या जागृत असलेल्या औंध, वरूड, नागाचे कुमठे, गोसाव्याची वाडी, गोपूज वाकडवाडी, पळशी, खरशिंगे कारंडेवाडी गणेश वाडी, त्रिमली लांडेवाडी, खबालवाडी नांदोशी जायगाव, अंभे री गाव वाडेवस्तींचा समावेश असून या भागांमध्ये असून शेतीला पाणी देण्याची कुठली योजना केली नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेती असली तरी पाण्याअभावी शेती करता येत नाही. तीन पिढ्या फक्त वाट बघण्यामध्ये गेल्या. परंतु, आताची पिढी जागरूक असून अन्याय सहन करू नये यासाठी तयार झालेली आहे .त्याचाच भाग म्हणून मंगळवार दिनांक ३१ मे रोजी सर्वपक्षीय बैठक आयोजित केल्याची माहिती संतोष मांडवे यांनी दिली. या बैठकीसाठी रिपब्लिकन पक्षाचे युवा नेते गणेश भोसले, सुनिल भालेराव, कामगार नेते बापूराव वाघमारे यांना निमंत्रित करण्यात आले आहे. त्यांच्यासमोर प्रविण बुचडे, युवराज रणदिवे, शिवाजी रणदिवे, जिजाबा सूर्यवंशी, शंकर पवार, अण्णा कंठे, जीवन तिडके, अक्षय पवार, प्रकाश कदम, युवराज घाडगे व शेतकरी वर्ग उपस्थित राहणार आहेत.
राजकीय विचार बाजूला ठेवून फक्त पाण्यासाठीच सर्वांनी एकत्र यावे. प्रत्येकाच्या बांधापर्यंत पाणी मिळावे हीच तीव्र भावना ग्रामस्थांची झालेली आहे. सध्या तीव्र उन्हाळा असून जे काही पीक आहेत. ते करपून चाललेले आहेत. तसेच भविष्यात पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण होणार आहे. या सर्व प्रश्नांबाबत रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करून सरकारला जागे करण्याची भूमिका घ्यावी लागेल. त्यासाठी रिपब्लिकन पक्ष व मित्रपक्ष सहभागी व्हावे. असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे गणेश भोसले यांनी केले आहे.
_____________________________________
फोटो _रिपब्लिकन युवा नेते गणेश भोसले
वाळून चाललेली पिके,,, (छाया- अजित जगताप,सातारा)

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button