सातारा:-सामान्य जनतेसाठी कार्यरत – आर. वाय. शिंदे
पत्रकार अजित जगताप सातारा:-9922241299

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार अजित जगताप सातारा
सामान्य जनतेसाठी कार्यरत – आर. वाय. शिंदे
सातारा
माणसाच्या आयुष्यामध्ये जिद्द असेल तर त्या माणसाला यशस्वी होण्यासाठी अनेक मार्ग सापडतात. त्या मार्गावर वाटचाल करताना सहकार्य लाभते. त्यामुळे शून्यातूनही विश्व निर्माण करण्याची ताकद निर्माण होते. याचे जलंत उदाहरण म्हणजे सातारा जिल्हा परिषद मध्ये कार्यरत असणारे आमचे परमस्नेही जलसंधारण विभागाचे उपविभागीय अधिकारी आर वाय तथा राजू शिंदे होय. आज जिल्हा परिषद सेवेतून सेवानिवृत्त होत आहे. खरं म्हणजे त्यांच्या स्वभावाकडे पाहता सेवानिवृत्ती हा शासकीय शब्द असला तरी कायमस्वरूपी सेवा करण्यामध्ये ते धन्यता मानतील. यावर सर्वांचा विश्वास आहे. दुष्काळी फलटण तालुक्यातील जिंती या गावांमध्ये सर्वसामान्य गरीब व शेतमजूर कष्टकरी, शोषित समाजामध्ये जन्म घेतलेले आर वाय शिंदे म्हणजे प्रतिकूल परिस्थिती वर मात करून जिद्दीने जगणारे व्यक्तिमत्व होय. आज जे काय त्यांच्याकडे संयम, सामाजिक जाणीव आणि इतरांना मदत करण्यासाठी धावून जाणारी वृत्ती आहे. हे सर्व विशेष गुण हे त्यांना गरिबीतून मिळालेली देणगी आहे. आई- वडील हे ऊन वारा पाऊस न पाहता कष्ट करून उपजीविका करत होते. त्यावेळी बालपणातील राजू हा शिक्षणासाठी धडपड करत होता. कधी वही नाही. कधी दप्तर नाही. कधी पुस्तकं नाही. तर कधी शाळेचा गणवेश नाही. अशा नाहीरे वर्गातूनच बुद्धिमत्तेची खाण सापडते. तशा पद्धतीने त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. एवढेच नव्हे तर कराड येथील शासकीय तंत्रनिकेतन मधून पदविका मिळवल्यानंतर खऱ्या अर्थाने त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली.
सातारा जिल्हा परिषदेच्या सेवेत असताना थंड हवेचे ठिकाण महाबळेश्वर या ठिकाणी अभियंता म्हणून काम करत असताना त्यांना नैसर्गिक देणगी लाभली. ती म्हणजे काम करत असताना डोकं थंड व शांत ठेवणे त्यानंतर भविष्यात त्यांना अतिवृष्टीच्या पाटण, जावळी व कोरेगाव ,सातारा या ठिकाणी सातारा जिल्हा परिषद सेवेत काम करण्याची संधी मिळाली. या ठिकाणी काम करत असताना विविध भौगोलिक परिस्थिती व राजकीय परिस्थितीचा त्यांनी बारकाईने अभ्यास करून आपल्या कामाची पद्धत ही लोक अभिमुख केली. लोकांना लोकांसाठी लोकविकास हवा असेल तर आपणही लोकांसाठी लोकांसारखेच वागले पाहिजे. अशी मनाशी खूण गाठ बांधून त्यांनी ग्रामीण भागात विकास कामे केली. अनेकांना सहकार्य केले. आपण ज्या वाड्या वस्तीतून शहरापर्यंत मार्गक्रमण केलेले आहे. त्या वाड्या वस्तीला जोडणाऱ्या दळणवळणासाठी त्यांनी प्राधान्य देणे व लवकरात लवकर रस्ते , साकव पुल बांधण्याचे काम प्रामाणिकपणाने केले. गुणवत्ता राखली तरच खऱ्या अर्थाने विकास कामे टिकतात. याचे त्यांना बाळकडू मिळाले. त्याचबरोबर अनेक राजकीय नेत्यांचा सुद्धा त्यांना पाठिंबा मिळाला.
वैवाहिक जीवनामध्येही त्यांना मोलाची साथ मिळाली .खऱ्या अर्थाने जावली तालुक्यामध्ये त्याची निवड झाल्यानंतर त्यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध पाहण्यास मिळाले. पत्रकार, अधिकारी व राजकारणी हे खऱ्या अर्थाने त्रिदेव आहेत. प्रत्येकाची पाठ एकमेकांना चिटकलेले असते. त्यामुळे आपल्या पाठीकडे कुणाचे लक्ष नसले तरी नैतिकतेचे लक्ष तिघांकडे असते. त्यामुळे काम करत असताना अनेक मर्यादा व बंधने पाळली जातात. प्रचलित धोरणानुसार वागले नाही तर प्रवाहाच्या बाहेर फेकले जाते. याचाही अनेकदा अनुभव अधिकारी, राज्यकर्ते व पत्रकारांना घ्यावाच लागतो. त्या अर्थाने पाहिले तर श्री शिंदे यांच्या अधिकारी पदापेक्षा त्यांच्यातील मैत्री मला खूप भावली आहे.
आज सेवानिवृत्ती निमित्त त्यांच्या अनेक आठवणी आहेत. यदा कदाचित ते राजकारणात आले तर या आठवणींचा फायदा त्यांना निश्चितच मिळेल कारण आर्ट ऑफ लिविंग श्री श्री रविशंकर जी गुरुवर्य यांच्या सानिध्यात ते आलेले आहेत. त्यामुळे अध्यात्मिक रित्या त्यांना खूप मोठे साथ मिळालेले आहे . शासकीय सेवेमध्ये वयोमानानुसार सेवानिवृत्ती स्वीकारली जाते आणि खऱ्या अर्थाने आयुष्यातील दुसरी इनिंग सुरू होते. तसं पाहिलं तर आर. वाय. शिंदे यांना देखणेपणाची नैसर्गिक देणगी लाभलेले आहे. आजही त्यांच्याकडे पाहिले तर ३५ ते ४० वयाचा तरुण असं त्यांचे स्वरूप आहे .अजून किमान २० ते ३० वर्षे ते समाजसेवक करू शकतात. याची खात्री पटलेली आहे. निर्व्यसनी पणा असला तरी मैत्री जोडण्याचे त्यांना खूप आवडीचे व्यसन आहे.
आज त्यांच्या यशासाठी अनेकांचे अदृश्य हात असले तरी खऱ्या अर्थाने त्यांना मोलाची साथ मिळाली ते त्यांच्या धर्मपत्नी मीना, चिरंजीव ओमकार ,अनिरुद्ध व सून पूनम, रसिका त्याचबरोबर त्यांच्या असंख्य मित्रांनी त्यांना साथ दिली आहे. सातारा जिल्हा परिषद अभियंता संघटनेचे साधे सदस्य ते राज्य अध्यक्ष अशी चढती कमान करत असताना त्यांनी नैसर्गिक संकटाच्या वेळेला अभियंत्यांच्या वेतनातून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी एक कोटी रुपये देऊन एक आदर्श निर्माण केला होता. यापुढे भविष्यात त्यांच्या हातून खूप मोठी सेवा समाजाची घडणार आहे. आज त्यांच्या सेवानिवृत्ती निमित्त होणारा सोहळा म्हणजे मानवतावादी दृष्टिकोन ठेवून अधिकार वाणीने काम करणारे अधिकारी हे त्यांचे रूप पाहताना मनस्वी आनंद होत आहे. त्यांच्या या कार्यासोबतच त्यांचे सहकारी मित्र अभियंता सुनील पोरे, धनंजय पाटील, संजय गायकवाड, बाळकृष्ण शिवदास, नाना वैद्य, विकास चव्हाण, आमले अशा अनेक सहकाऱ्यांची आठवण होते. आज पुन्हा एकदा काही सहकाऱ्यांची भेट होणार आहे. हा आनंदाचा सोहळा आहे. पुन्हा एकदा आर. वाय. शिंदे यांना सेवानिवृत्ती निमित्त शुभेच्छा व त्यांना राजकीय दृष्ट्या संधी मिळावी. यासाठी त्यांचे स्वागत करीत आहे.
आपला
पत्रकार अजित जगताप ,वडूज खटाव जिल्हा सातारा ९९२२२४१२९९
फोटो – आर वाय शिंदे फोटो