सातारा:-साताऱ्यात महाविकास आघाडीच्या रणनीतीची रंगीत तालीम सुरू.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
साताऱ्यात महाविकास आघाडीच्या रणनीतीची रंगीत तालीम सुरू.
सातारा दि: संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या सातारा लोकसभा मतदार संघामध्ये महाविकास आघाडी मधील प्रमुख पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ही जागा निश्चित झालेली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील रणनीती व प्रचार यंत्रणा बाबत चर्चा सुरू झालेली आहे. त्याची चुणूक राष्ट्रवादी भवन मध्ये पाहण्यास मिळाली.
सातारा जिल्हा हा काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला होता. या बालेकिल्लाला सुरुंग लावण्याचे काम राजकीय महत्वकांक्षा असलेल्या अनेकांनी केलेला आहे .आज खऱ्या अर्थाने मतदारांची सत्वपरीक्षा आहे .ज्या उद्देशाने मतदारांनी मतदान केले होते. त्याला हरताळ फासून अलीकडच्या राजकारणामध्ये युगपुरुषांच्या विचार तसेच ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार , आदरणीय बाळासाहेब ठाकरे ,काँग्रेसचे राजीव गांधी अशा रथी महारथी विचाराची बांधिलकी सोडून हिंदुत्ववादी विचाराची नाळ जोडणाऱ्या प्रवृत्तीला धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीचे घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, राष्ट्रीय काँग्रेस व शिवसेना (उभाठा) यांनी संयुक्तरित्या प्रचार मोहीम आखून प्रचारामध्ये सकारात्मक दृष्टिकोन ठेवला आहे.
विशेष बाब म्हणजे या प्रचार यंत्रणेमध्ये महिला बचत गट, सर्वसामान्य महिलांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या अनेक रणरागिणी व महिला पदाधिकारी यांचे खूप मोठे योगदान लाभणार आहे. आज मणिपूर सारख्या राज्यामध्ये महिलांची नग्न धिंड काढूनही एका शब्दाने जाब न विचारणारे खऱ्या अर्थाने महिला म्हणून निदान त्यांनी राजकीय मतभेद विसरून रस्त्यावर आले पाहिजे होते. पण, दुर्दैवाने आज महिलांना स्वातंत्र्य नाही.
राजकीय पक्षाच्या नको त्या गोष्टीबाबत रस्त्यावर उतरून शो करणे एवढेच आता काही महिला यांनी कार्यक्रम हाती घेतले आहेत. अशा महिलांचे परिवर्तन करणे .त्यांना वस्तुनिष्ठ माहिती देणे. हे काम आता ग्रामीण भागातील महिलांनी हाती घेतलेला आहे. वाढती बेरोजगारी, वाढती महागाई लोकशाही धोक्यात आली आहे.
व्यक्तीनिष्ठ राजकारणी यांना धडा शिकवण्यासाठी २०२४ ची ही लोकसभा निवडणूक म्हणजे खऱ्या अर्थाने दुसऱ्या स्वातंत्र्यासाठी एक अभिमानाने स्वातंत्र्य सैनिक बनावे. असे युवा पिढीला आवाहन करण्यात आले आहे. सदर रणनीती आखण्यासाठी समाजातील विविध स्तरातील विचारवंत ,ज्येष्ठ नागरिक, महिलावर्ग व राजकारणामध्ये स्वच्छ चरित्र असणारी मंडळी आज सहभाग घेत आहे.
आज राष्ट्रवादी भवन मध्ये राजकीय रणनीती आखताना राष्ट्रवादीचे सरचिटणीस राजकुमार पाटील काँग्रेसचे सरचिटणीस नरेश देसाई ॲड. दत्ता धनवडे, शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मोहिते, इम्रान बागवान यांच्यासह समिंद्रा जाधव कुसुम भोसले तेजस्विनी केसरकर अंजली शिंदे प्रज्ञा गायकवाड नलिनी जाधव उषा जाधव नुपूर नारनवर भाग्यश्री निगडे महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आज सत्तेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात भाजपने निधी गोळा केलेले आहे. हा निधी पुन्हा जनतेपर्यंत जाताना त्याचं मूल्यमापन वेगळ्या पद्धतीने केले जाणार आहे .
स्वाभिमानाची चटणी भाकरी ही कुणीतरी भीक म्हणून दिलेल्या बिर्याणी पेक्षाही श्रेष्ठ असते हे सातारा जिल्हा दाखवून देणार आहे अशा शब्दात महिला वर्गाने आपल्या भावना व्यक्त केल्या. आज व्यक्तिगत पातळीवर भारत सरकार ऐवजी मोदी सरकार असा जाणीवपूर्वक उल्लेख करून मोदींनी दिलेल्या खोट्या आश्वासनाची आठवण यानिमित्त करून दिली जात आहे. या मोदी सरकार या शब्दामुळे खऱ्या अर्थाने महाविकास आघाडीचा चांगलाच प्रचार खेड्यापाड्यात पोहोचलेला आहे. आता या मोदी सरकारचे करायचे काय खाली डोकं वर पाय …अशा आता ग्रामीण भागात घोषणा सुरू झालेले आहेत.
———————————————-
फोटो -सातारा राष्ट्रवादी काँग्रेस भवन मध्ये महाविकास आघाडी बाबत रणनीती ठरवताना आघाडीचे नेते व महिलावर्ग (छाया- अजित जगताप ,सातारा)