खटाव:- वडूज तहसीलदार श्री जमदाडे यांच्या तत्परतेने नागरिकांना मिळू लागला न्याय ,,,
पत्रकार अजित जगताप सातारा:-9922241299

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
- पत्रकार अजित जगताप सातारा
खटाव तहसीलदार श्री जमदाडे यांच्या तत्परतेने नागरिकांना मिळू लागला न्याय ,,,
वडूज दि:
सध्या उन्हाळ्याची तीव्रता वाढत असून लोकांना घराबाहेर पडणे अशक्य झाले आहे. अशा वेळेला हमखास महसूल विभागातील कामकाज गतीने व्हावे अपेक्षा ठेवून आलेल्या नागरिकांना दिलासा देण्याचे काम करावे लागते. खटावचे तहसीलदार किरण जमदाडे हे स्वतः तत्परतेने प्रत्येक नागरिकांची भेट देवून त्यांची बाजू समजून घेत आहेत. त्याबाबत सर्वत्र समाधान व्यक्त केले जात आहे.
याबाबत माहिती अशी की, दुष्काळी भाग म्हणून गणल्या गेलेल्या खटाव तालुक्यामध्ये १४० गावे व वाड्या- वस्ती असून अनेक ठिकाणी मंडल अधिकारी, तलाठी वर्ग अशी बरीच पदे रिक्त असून त्याचा महसूल विभागात परिणाम होतो. तरी अनेकांची कामे सुद्धा होत आहेत. ही समाधानकारक बाब ठरली आहे. तालुक्याचे ठिकाण असलेल्या वडूज ता. खटाव येथील खटाव तहसील कार्यालयामध्ये दररोज किमान शे दोनशे ग्रामस्थ व नागरिक जमिनीच्या संदर्भात या कार्यालयाला भेट देतात. त्यामुळे या कार्यालयामध्ये नेहमीच गर्दी असते. पुणे, मुंबई नव्हे तर थेट दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, आंध्र प्रदेश येथीलही मूळचे खटावकर जमिनीच्या कामासाठी या कार्यालयात येत असतात. त्यामुळे अशा वेळेला शासकीय बैठकाव्यतिरिक्तही जमिनीच्या कामाबाबत ग्रामस्थांना वेळ द्यावा लागतो. खटाव तालुक्यातील अनेक विकास कामे सुरू आहेत. तसेच महामार्ग ही निघत असून जमिनी विषयी निवाडा, विविध प्रकारचे दाखले, शिधापत्रिकेतील फेरफार व नवीन शिधापत्रिका, पत्ता बदलणे, संजय गांधी निराधार योजना, इतर लाभाच्या योजना कार्यान्वित करणे त्याचबरोबर गावठाणातील जमिनीबाबत तसेच सर्वे नंबर मधील जमिनी बाबत वाटप, अतिक्रमण, गौण खनिजबाबत तक्रारी ,लिलाव व इतर तक्रारी या संदर्भात काळजीपूर्वक शहनिशा करून योग्य मार्ग काढणे. यामध्ये तहसीलदार किरण जमदाडे यांनी नावलौकिक प्राप्त केलेले आहे. ज्यांची सत्य बाजू आहे. ती पडताळणी करून कुणावरही अन्याय होऊ नये. याची काळजी घेतली जाते. घाई गडबडीत घेतलेले निर्णय चुकीचे झाले तर त्याचा त्रास जनतेला होतो. हे मनाशी पक्क ठेवून तपासणी करून आदेश पारित करतात. सध्या दंडाधिकारी असल्यामुळे त्यांच्याकडे जमिनी संदर्भात आलेल्या दाव्याचेही पाहणी करावी लागते.
याबाबत कोणावरही अन्याय होऊ नये. तसेच अपील करण्यासाठी संधी मिळावी याचीही काळजी घेतली जाते. सामाजिक प्रश्नांवर सामाजिक जाणीव ठेवून अनेकांनाही मदत करण्या मध्ये ते अग्रेसर असतात. महसूल विभागातील कायद्या व सुव्यवस्थेबाबत अनेकांना त्याची माहिती नसते. अशा वेळेला विना वकील त्याची समजूत काढणे. एखाद्या कायद्याबाबत समजून सांगणे. असाही मानवतावादी दृष्टिकोन ठेवून तहसीलदार श्री जमदाडे यांना वागावे लागते. एक संयमी समंजस व मानवतावादी भावनेतून लोकांना मदत करणारे अधिकारी म्हणून ते महसूल विभागात परिचित झालेले आहेत. काही काम करत असताना कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कठोर निर्णय घ्यावा लागतो. अशा निर्णयामुळे काहीजण नाराज होतात. ते स्वभाविक आहे. परंतु, व्यक्तिगत नाराजी पेक्षाही भारतीय राज्यघटना व महसूल कायद्याचे अंमलबजावणी करणे. यासाठीच आपली नेमणूक झालेली आहे. असे म्हणून ते काम करतात. त्यामुळे त्यांच्याबद्दलचा आदरभाव वाढीस लागला आहे.याची साक्ष अनेक जण देवू लागले आहे.
______________________________________
फोटो – खटाव तहसिलदार कार्यालयात ग्रामस्थांचे म्हणणे समजून घेताना तहसिलदार श्री किरण जमदाडे (छाया- निनाद जगताप, वडूज)