ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

खटाव:-आ.महेश शिंदे यांच्या वडूज येथील जनता दरबारपूर्वीच होतय कौतुक,,,

पत्रकार अजित जगताप सातारा:-9922241299

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

पत्रकार अजित जगताप सातारा

आ. महेश शिंदे यांच्या वडूज येथील जनता दरबारपूर्वीच होतय कौतुक,,,

वडूज दि:
सातारा जिल्ह्यातील राजकारणात आपला दबदबा निर्माण करणारे शिवसेना शिंदे गटाचे कोरेगावचे आ. महेश शिंदे यांनी कोरेगाव मतदार संघात आपला राजकीय ठसा उमटवला आहे. सातारा, कोरेगाव, खटाव या तीन तालुक्याचे आमदार असणाऱ्या आ. शिंदे यांनी गुरुवार दिनांक १९ मे रोजी खटाव पंचायत समितीच्या वडूज येथील बचत भवन या ठिकाणी जनता दरबार आयोजित केला आहे. त्यापूर्वीच सर्वत्र कौतुक होत आहे.
याबाबत माहिती अशी की, कोरेगाव मतदार संघासाठी सातारा कोरेगाव व खटाव तालुक्यातील काही भाग मिळून एक मतदार संघ झालेला आहे. या मतदारसंघातील प्रश्न सोडवण्यासाठी आ. महेश शिंदे हे सोशल मीडिया व प्रसिद्धी माध्यमातून अलिप्त असतात. त्यामुळे त्यांच्या कार्याची दखल ही विकास कामे पाहूनच केली जाते. खटाव तालुक्यातील काही भाग हा त्यांच्या मतदारसंघात येतो. विशेष म्हणजे खटाव तालुक्यासाठी तीन आमदार असून गेल्या काही वर्षात तिन्ही आमदारांनी खरं म्हणजे आमसभा घेण्याचे धाडस दाखवले नाही. त्यामध्ये भाजपचे आ. जयकुमार गोरे, राष्ट्रवादीचे आ. बाळासाहेब पाटील व शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे हे तीन आमदार आहेत. परंतु आ. महेश शिंदे यांनी गुरुवारी खटाव तालुक्याचे ठिकाण असलेल्या वडूज नगरीमध्ये जनता दरबार आयोजित करून सर्वसामान्य खटाव तालुक्यातील मतदार व जनतेला दिलासा देण्याचे काम केले आहे. त्याचे खऱ्या अर्थाने कौतुक होत आहे.
खटाव तालुक्याचा इतिहास पाहिला तर हुतात्म्याची नगरी म्हणून हा तालुका ओळखला जातो. क्रांतिकारक लोकांनी या ठिकाणी क्रांती करून आपल्या न्याय हक्कासाठी लढा दिला होता. अलीकडच्या काळामध्ये अन्याय सहन करण्याची मर्यादा वाढलेली आहे. लोकांना आंदोलन करणे व रस्त्यावर उतरणे याचा विसर पडल्याचा गैरफायदा भ्रष्ट अधिकारी व संपर्क साधण्याचा कंटाळा असलेले लोकप्रतिनिधी घेत आहेत. अशी टीका होते. त्याला व्यापक प्रमाणात प्रसिध्दी मिळू नये. याची वरिष्ठ पातळीवर काळजी घेण्यासाठी रसद पुरवठा केला जातो. असे ही बोलले जाते.
काही छोट्या-मोठ्या संघटना या एकदिवसीय का होईना आंदोलन करून प्रश्नाला वाचा फोडतात. त्याला बगल देण्याचे ही काम होते. हे सुद्धा उघड्या डोळ्यांनी पहावे लागत आहे. या सर्व निराशवादातून आशेचा किरण म्हणून गुरुवारी होणाऱ्या जनता दरबाराकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. या जनता दरबार मध्ये प्रामुख्याने जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी खरा प्रयत्न व्हावा. अशी माफक अपेक्षा आहे. कारण, महाराष्ट्राचा विचार करता आम सभा व जनता दरबार म्हणजे कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी व कार्यकर्त्यांचे प्रश्न सोडवणे. असा एक हुकम झालेला आहे. त्याला फाटा देण्याचे काम आ. महेश शिंदे निश्चितच करतील. अशी त्यांच्या कामकाजावरून स्थिती वाटत आहे.
खटाव तालुक्यातील महसूल, पोलीस, महिला व बालकल्याण, भूमी अभिलेख, वीज वितरण कंपनी, सार्वजनिक बांधकाम विभाग, कृषी विभाग, वन विभाग ,पुरवठा विभाग, एस. टी. महामंडळ, आरोग्य विभाग, समाज कल्याण विभाग, तहसील व पंचायत समिती कार्यालय, लघु पाटबंधारे ,पाटबंधारे, क्रीडा विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, बांधकाम विभाग अशा अनेक गोष्टींकडे कामकाजासाठी जनतेची रीघ लागते. टक्के वारी ची प्रयोग शाळा असलेल्या या विभागात हेडमास्तर पासून साधा लिपिक निपक्षपातीपणे कामकाज करण्यास तयार असतात. परंतु सर्वांचीच कामे होत नाहीत. हे त्रिवार सत्य आहे. निदान एक दिवस तरी लोकशाही ला साजेस कामकाज पहाण्यास मिळेल असे वाटू लागले आहे.
एरवी पोलीस ठाण्यात वरिष्ठांचा किंवा काही लोकप्रतिनिधीचा संबधितांना फोन आल्याशिवाय खटाव तालुक्यात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होत नाही. केलेल्या गुन्ह्याची योग्यरित्या तपास होत नाही. यासाठी सक्षम अधिकाऱ्याची नियुक्तीच केली जात नाही. हे सुद्धा उघड झालेले आहे. अनेक प्रकरण हे बाहेरच्या बाहेर मिटवण्यामध्ये धन्यता मानली जाते. युवा पिढीला बरबाद करणाऱ्या व्यसनापासून खूप मोठा धोका आहे. परंतु, अन्न व औषध प्रशासन किंवा स्थानिक प्रशासन सुद्धा याकडे लक्ष देत नाही. एक वेळ पोस्टाची तिकीट मिळणार नाही किंवा कोर्ट फी तिकीट मिळणार नाही. पण मावा, गुटखा त्वरित उपलब्ध होतो. अशी परिस्थिती शासकीय कार्यालयाच्या अवतीभोवती दिसत आहे. इतर ठिकाणचा तो विचार न केलेला बरा त्यामुळे युवा पिढी व्यसनी बनलेली आहे. याकडे आ. महेश शिंदे यांनी जाणीवपूर्वक लक्ष घालून याबाबत उपाययोजना करावी अशी मागणी पालक वर्गाने केली आहे.
दरम्यान ,या जनता दरबारासाठी सर्व शासकीय अधिकारी उपस्थित राहतील व एक दिवस का होईना जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आपले कर्तव्य बजावतील अशी अशा व्यक्त केली जात आहे. खटाव तालुक्यातील नागरिकांनी यापूर्वी शासकीय कार्यालयात केलेला अर्ज व नवीन अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे सत्य प्रत सोबत जोडून आपली व्यथा मांडली पाहिजे. असे सूचित करण्यात आले आहे.
_____________________________________
फोटो _शिवसेना आ. महेश शिंदे

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button