सातारा:-कर्नाटक राज्यात पराभव झाल्यानंतर भाजपला आठवतो अब्दुल्ला, सोशल मीडियावर टीका.
पत्रकार अजित जगताप सातारा:-9922241299

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
पत्रकार अजित जगताप सातारा
कर्नाटक राज्यात पराभव झाल्यानंतर भाजपला आठवतो अब्दुल्ला, सोशल मीडियावर टीका.
सातारा दि: महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये परिणाम करणाऱ्या कर्नाटक राज्याचा निकाल लागला असून राष्ट्रीय पक्ष म्हणून काँग्रेसला चांगली संधी मिळाली आहे.१३६ विधानसभेच्या जागा जिंकून काँग्रेसने ””””’नफरत का बाजार बंद! मोहब्बत की दुकान खोली”” अशा शब्दात त्याचे वर्णन केले आहे. तर महाराष्ट्रातील काँग्रेस कार्यकर्त्यांना उद्देशून बेगामी शादी मे अब्दुल्ला दिवाना अशा शब्दात अब्दुल्लाची आठवण भाजपने करून दिली. हा काँग्रेसचा नैतिक विजय आहे. अशा शब्दात काँग्रेस कार्यकर्त्यांनी मत व्यक्त केले आहे .
कर्नाटक विधानसभेच्या२२४ जागांसाठी झालेल्या मतदानाचा कौल लागला असून बजरंग बली की जय असे म्हणत दस्तुरखुद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंदुत्वाचा नारा दिला. परंतु , धर्माच्या पलिकडे सुज्ञ व देशहिताचा निर्णय घेणाऱ्या मतदारांनी हा नारा धुडकावत बजरंग दलाची गदाच भाजपवर मारून कमळाच्या चिंधड्या केलेले आहेत. हे निकालावरून स्पष्ट झाले आहे. गेली ३८ वर्ष एकाच पक्षाकडे दोनदा सत्ता सोपवण्याची कामगिरी कर्नाटकचे मतदार करू शकतात. हा विश्वास भारतीय राजकीय घडामोडीला एक नवीन दिशा देणारे ठरणार आहे. सीमा भागातही काँग्रेसने मारलेली मुसंडी ही महाराष्ट्रातील भाजपला समज देणारी ठरलेली आहे.४० टक्के कमिशन वाले भाजप कर्नाटक सरकार तसेच पाच वर्षात दलित- मुस्लिम- लिंगायत या समाजाची झालेली दिशाभूल ही भाजपच्या पराभवाची प्रमुख कारणे आहेत .हे आता स्पष्ट झालेले आहे.
जी.डी.एस.ला १९ जागा तर इतरांना चार जागेवर समाधान मानत असताना भाजपला फक्त ६५ जागा मिळालेले आहेत .त्यामध्ये भाजपचे ३९ स्थानिक पराभूत झालेले आहेत. तर काँग्रेसचे ५६ नवीन चेहरे निवडून आलेले आहेत. सिद्धरामय्या व शिवकुमार यांनी हा शिव धनुष्य उचलून दाखवलेले आहे. त्यांना ज्येष्ठ नेते राहुल गांधी प्रियंका गांधी व मलिकार्जुन खरगे तसेच असंख्य कार्यकर्त्यांची मोलाची साथ लाभलेली आहे .
या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे दक्षिण भारतामध्ये सर्वाधिक मंदिरे आहेत. सर्वाधिक हिंदू बांधव राहतात परंतु आता भाजपला दक्षिण भारतातील दार पूर्ण बंद झालेले आहे .धर्मावर फार काळ राजकारण करता येत नाही असाच संदेश यानिमित्त दिला असला तरी महाराष्ट्र एकीकरण समितीला झालेला पराभव हा सुद्धा मराठी माणसासाठी धोक्याची सूचना वाटत आहे .हे विसरून चालणार नाही. दरवेळी महाराष्ट्र कर्नाटक सीमा लढ्याबाबत चर्चा होतील ठराव घेतली जातात बैठकी होतात पण कृती शून्य असल्यामुळे मतदारांनी महाराष्ट्र एकीकरण समितीला बाजूला केल्याचे चित्र दिसत आहे .
वास्तविक तसं पाहिलं तर भाजपचा हा पराभव हा दिवाळ लागणे योग्यच आहे .कारण सर्व ठिकाणी विजय मिळवल्यानंतर धक्कादायक पराभव सहन करण्याची ताकद भाजपमध्ये राहिलेली नाही. त्याचे कारण उत्साही भाजप कार्यकर्ते त्यामुळेच आज महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी काँग्रेसच्या विजयाबद्दल ज्यांचा या निवडणुकीच्या निकालाबाबत प्रचारांमध्ये काडीमात्र संबंध नाही. अशी मंडळी विजय आपल्यामुळे झाले अशा अविर्भावात फटाक्याची आतिषबाजी व जिलेबी पेढे वाटप करून स्वतःची हास्य करून घेत आहेत. विजयाला सर्व साक्षीदार बनतात पण पराभवाला मात्र कुणीही वाली राहत नाही. याचा आता अनुभव भाजप घेत असले तरी ज्या ठिकाणी ५६ जागा भाजपने घेतलेले आहेत .त्या ठिकाणी काँग्रेसचा झालेला पराभव हा मोठ्या मनाने स्वीकारण्याची दानत महाराष्ट्रातील स्थानिक काँग्रेसला नसावी .त्यामुळे बहुदा बेगामी शादी मे अब्दुल्ला दिवाना अशा मोजक्याच पण मार्मिक शब्दात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली टीका ही दुर्लक्षित करून चालणार नाही. शेवटी काही का असेना पण कट्टर हिंदुत्ववादी म्हणणाऱ्या पक्षाला अखेर अब्दुल्लाची आठवण करून देण्यात आलेली आहे हे एका अर्थाने बरेच झालेले आहे.
मुस्लिम द्वेष नसा नसात भरलेले भाजपचे काही समर्थक हे मुस्लिम सण असो किंवा एखाद्या मुस्लिम कार्यकर्त्यांचा गौरव असो अशा कट्टर धर्मांध लोक कपाळावर अट्या पाडूनच बोलत होते. त्यांना चांगलीच चपराक मिळालेली आहे. खऱ्या अर्थाने उपेक्षित असलेल्या व हिंदुत्वाच्या नावाने गळ चिप्पी चाललेल्या दलित व लिंगायत व इतर अल्पसंख्याक समाजाला सामावून घेतल्याशिवाय भविष्यात राष्ट्रीय काँग्रेसला विजय मिळणार नाही. हे अधोरेखित करण्यात आलेले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वैचारिक बांधिलकी पेक्षा जातीचे समीकरण आतल्या गाठीतून घट्ट बांधलेले आहे. ती गाठ जर सोडवली तरच भविष्यात राष्ट्रवादी राष्ट्रीय काँग्रेस व सत्तेसाठी धडपडणाऱ्या पक्षांना यश मिळणार आहे. अन्यथा हिंदुत्ववादी विचारसरणी व त्याच्या जोडीला अन्याय झालेले अल्प समाज व दलित हे जर महाराष्ट्रात शिंदे गट व भाजपकडे झुकल्यास उरली सुरली काँग्रेस व राष्ट्रवादी सुद्धा संपण्याचा धोका आहे. सध्या तरी कर्नाटकच्या निकालाने आशा पल्लवीत झालेले आहेत. तसं पाहिले तर सबका साथ सबका विकास हे भाजपने कधीही अनुकरण केलेले नाही. पण जशा पद्धतीने राष्ट्रीय काँग्रेसने गरिबी हटवणारा नारा दिला पण त्याचा कधीही वापर केला नाही. त्यामुळे गरीबो को हटाव सबका साथ अपना विकास हे धोरण बदलले पाहिजे. हा संदेश देण्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठित व महत्वाचं ठरली आहे.
_______________________________________
फोटो