ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

खटाव:-वडूज बाजार समितीच्या एकत्रित कारणामुळे भाजप कार्यकर्त्यांनी खाल्ली जिलेबी.

पत्रकार अजित जगताप सातारा:-9922241299

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717453

पत्रकार अजित जगताप सातारा

वडूज बाजार समितीच्या एकत्रित कारणामुळे भाजप कार्यकर्त्यांनी खाल्ली जिलेबी.

वडूज दि: सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात
वडूज शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत खटाव विकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रीय काँग्रेस व भाजप यांची आघाडी माजी आ. प्रभाकर घार्गे यांच्या नेतृत्वाखाली युती झाली होती. तो धागा पकडून वडूज ता. खटाव येथे कर्नाटकच्या विजयामुळे काँग्रेसने जिलेबी वाटप केले होती. भाजप कार्यकर्त्यांनी बाजार समितीच्या निवडणुकीत एकत्रितकरण झाले होते. ते डोळ्यासमोर ठेवून भाजप कार्यकर्त्यांनी जिलेबी खाल्ली. त्याची चर्चा आता सुरू झालेली आहे.
कर्नाटक राज्यात सत्ताधारी भाजपला पायउतार व्हावे लागले. काँग्रेस पक्षाने कर्नाटक मध्ये सत्ता स्थापन केलेली आहे. त्याचा आनंद साजरा करण्यासाठी खटाव तालुक्यातील राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने वडूज येथील छत्रपती शिवाजी चौकामध्ये फटाक्याची आतिषबाजी व जिलेबी वाटप करण्यात आली. या वेळेला राष्ट्रीय काँग्रेस प्रांतिक सदस्य रणजीत देशमुख, तालुका अध्यक्ष डॉ. संतोष गोडसे, डॉ. महेश गुरव, अमरजित कांबळे, इम्रान बागवान ,राहुल सजगणे, ज्ञानेश्वर इंगवले, अभयकुमार देशमुख, विजयकुमार शिंदे, श्रीराम कुलकर्णी, निलेश घार्गे आदी मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते.
वडूज चौकात फटाक्याची आतिषबाजी झाल्यानंतर जिलेबी वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. या वेळेला भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते तथा ठेकेदार धनंजय चव्हाण( पेढा) हे आपल्या नियोजित कार्यक्रमानुसार मोटर सायकलने घरी निघाले असताना त्यांना थांबवून त्यांना जिलेबी भरविण्यात आली. खरं म्हणजे गेल्याच महिन्यात वडूज शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व स्वाभिमानी शेतकरी संघटना तर दुसऱ्या बाजूला भाजप, राष्ट्रीय काँग्रेस व माजी आमदार प्रभाकर घार्गे यांचा गट अशी तुल्यबळ लढत झाली होती. यावेळी खटाव विकास आघाडीने १३ जागा तर राष्ट्रवादी व स्वाभिमानी संघटनेने ५ जागा जिंकल्या होत्या. हा इतिहास ताजा असतानाच कर्नाटक राज्यात झालेल्या निवडणुकीचा धागा पकडून भाजप कार्यकर्त्याला जिलेबी देण्याचा प्रकार झाला? हा कोणताही राजकारणाचा भाग नसून एकामेकांबद्दल असणारी व्यक्तीगत मैत्री ही कारणीभूत आहे. त्यामुळे श्री. चव्हाण यांना दिलेली जिलेबी ही बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप राष्ट्रीय काँग्रेसची झालेली युती त्यातील गोडवा आजही कायम असल्याचे दिसून आले आहे.
राजकारणामध्ये फार काळ कुणी कुणाचे मित्र अथवा शत्रू नसतात हे अधोरेखित करण्यात आलेले आहे. शेवटी मतदार कौल देतात त्याप्रमाणे निकाल लागतो. हा निकाल तसा आश्चर्यकारक नसला तरी कर्नाटक राज्यांमध्ये सत्ता स्थापन करताना कोणालाही दुसऱ्यांदा सत्ता आलेली नाही. हा इतिहास मात्र कायम राखला गेला आहे .त्यामुळे भविष्यात भाजपने निराश न होता एक चांगला विरोधी पक्ष म्हणून कामकाज केले तर भविष्यात पुढील पाच वर्षे त्यांची सत्ता येऊ शकते. दरम्यान, आज भर उन्हामध्ये राष्ट्रीय काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतिषबाजी व जिलेबी वाटप करून एक आनंद उत्सव साजरा केला. अशीच संधी सातारा जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत मिळवण्यासाठी कार्यकर्त्यांनी सर्वधर्मसमभाव व विकासाकडे लक्ष द्यावे. असे सुचित करण्यात आले आहे.
—————————————————+———-
फोटो – कर्नाटक राज्यातील निकाल झाल्यानंतर जिलेबी वाटून आनंद उत्सव साजरा करताना कार्यकर्ते (छाया – अजित जगताप, वडूज)

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button