खटाव:-स्वादिष्ट पदार्थ सह कापडी पिशवीच्या”””’ मेजवानी””’ने वडूज नगरीत पर्यावरणाचा संदेश,,,,
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा:-9922241299

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
स्वादिष्ट पदार्थ सह कापडी पिशवीच्या”””’ मेजवानी””’ने वडूज नगरीत पर्यावरणाचा संदेश,,,,
वडूज दि: पर्यावरणाचा धोका थांबवण्यासाठी काही नैसर्गिक नियम पाळणे आवश्यक झाले आहे. हा संदेश देण्यासाठी वडूज नगरी मधील हॉटेल मेजवानी संचालकांनी पुढाकार घेतला असून खाद्यपदार्थ घरपोच देण्यासाठी कापडी पिशवीचा वापर सुरू केला आहे. त्याच्या सर्वत्र कौतुक होत आहे.
याबाबत माहिती अशी की, खटाव तालुक्यातील तालुक्याचे ठिकाण असलेल्या वडूज नगरीत सध्या मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्यांचा वापर होतो. नगरपंचायतीच्या माध्यमातून तात्पुरत्या स्वरूपात जनजागृती केले जाते. परंतु, अद्यापही कडक कारवाई होत नसल्याने प्लास्टिकचा सरास वापर होतो. यावर स्वयंशिस्त पाळणे गरजेचे आहे. याची जाणीव ठेवून हॉटेल मेजवानी यांनी दमदार पाऊल टाकलेले आहे. खाद्यपदार्थ घरपोच देण्यासाठी कापडी पिशवीचा वापर होत असल्याने काही प्रमाणात प्लास्टिकचा कचरा थांबवण्यास मदत झालेली आहे .
सातारा -पुसेगाव रस्त्यावरील मेजवानी हॉटेलचे विजय विलास फडतरे व महेश जाधव यांनी सांगितले की, हॉटेल व्यवसायामध्ये घरपोच पदार्थ देण्यासाठी यापूर्वी प्लास्टिकचा वापर केला जात आहे. पूर्वी प्लास्टिक पिशव्यांचा वापर केला जात होता परंतु आता हलक्या व चांगल्या दर्जाच्या कापडी पिशव्यांचा वापर करून जनजागृती सुरू केलेले आहे. त्याला ग्राहक वर्गानेही उदंड प्रतिसाद दिलेला आहे. आत्तापर्यंत घरपोच खाद्यपदार्थ देण्यासाठी सुमारे ५०० कापडी पिशव्या वितरित करण्यात आलेले आहेत. हे काम विनाशुल्क केले जात असून त्याचे अनुकरण इतर हॉटेल व्यवसायिकांनी करावे अशी माफक अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सध्या वडूज नगरीमध्ये किमान छोटी मोठी हॉटेल असून सरस प्लास्टिकचा वापर केला जातो. यावर निर्बंध आणण्यासाठी सामाजिक संस्थेने पुढाकार घेणे गरजेचे आहे. जिलेबी विक्रेत्यांनी ही कागदी पिशव्या वितरित करण्यास धन्यता मानली आहे. कागदी किंवा कापडी पिशव्या वितरित करण्यासाठी व्यवसायिकांनी पुढाकार घ्यावा तसेच अशा मालकांची संयुक्त बैठक घेऊन जनजागृती केली जावी. तरच खऱ्या अर्थाने हुतात्म्या नगरीमध्ये प्लास्टिकचा कचरा मुक्त गाव अशी नवी ओळख होणार आहे. प्रशासनाने ही प्लास्टिकचा वापर करणारा वर कडक कारवाईचे धोरण अवलंबले नाही तर भविष्यात प्लास्टिक युक्त गाव अशी ओळख होऊ नये. अशी शंका घेतली जात आहे.
सोशल मीडिया वर राजकीय दृष्ट्या संवेदनशील मत व्यक्त केले जाते. राजकीय पक्ष व संघटना यांनी त्याऐवजी पूर्वी सारखे कापडी फलक लावून सहभाग नोंदवला तर बरे होईल. असे जुन्या आठवणींना उजाळा देवून लोक सांगत आहेत. त्यांचा ही मान राखला जावा. कारण, आज प्रदूषण रोखण्यासाठी प्लास्टिक रोखणे काळाची गरज आहे. प्लास्टिक पिशव्यांमुळे मुक्या जनावरांना अन्न सेवन करताना त्रास होत आहे. हे अनेकदा सिद्ध झाले आहे. त्यामुळे हॉटेल मेजवानी चे विजय फडतरे व महेश जाधव यांनी कापडी पिशव्यांचा वापर करून जनजागृती करण्यास हातभार लावल्याबद्दल वडूज ता. खटाव येथील प्रयास सामाजिक संघटना व विविध मान्यवरांनी विशेष बाब म्हणून कौतुक केले आहे. दरम्यान, सर्वच प्लास्टिक पिशव्यांचा वर बंदी नसून त्याचे धोरण ठरविले आहे. त्यानुसार योग्य व चांगल्या दर्जाच्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणे गैर नाही. असे ही सुचित करण्यात आले आहे.
—————————————————————
प्लास्टिक पिशव्यांच्या ऐवजी कापडी पिशव्यांचे वितरण करताना हॉटेल मेजवानी चे व्यवस्थापन,,, (छाया -सूरज पोतदार, वडूज)