आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र
राहता:-तथागत बुद्ध जगाला विनाशापासून वाचवू शकतील= तेलतुंबडे
पत्रकार प्रतिनिधी कोंडीराम नेहे अहमदनगर:-7507469042

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
पत्रकार प्रतिनिधी कोंडीराम नेहे अहमदनगर
लोहगाव( प्रतिनिधी) तथागत बुद्ध आधुनिक जगाची गरज असून तेच जगाला विनाशाच्या खाईतून वाचू शकतील, असे प्रतिपादन आचार्य सत्येंद्र तेलतुंबडे यांनी केले .ते सम्यक साधना संघ यांनी संकल्प मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या व्याख्यानात बोलत होते. अध्यक्षस्थान प्रा. संदीप तपासे यांनी भुषवले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर संतोष उबाळे ,पाहुण्यांचा परिचय नंदकुमार कदम सर ,सूत्रसंचालन नरेंद्र पवार यांनी करून प्रा.राजू मोरे यांनी आभार मानले .
प्रारंभी लोणीचे मा. सरपंच जनार्दन घोगरे पाटील यांचे हस्ते तथागत बुद्ध, राजर्षी शाहू महाराज ,बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर आदी महामानवांचे प्रतिमा पूजन करण्यात आले .सर्वांनी सामुदायिक वंदना म्हटली.
बुद्धांचा विचार- काळाची गरज या विषयावर व्याख्यान देताना आचार्य तेलतुंबडे पुढे म्हणाले की ,बुद्धांचा विचार या देशातून संपवण्याचा दुष्ट हितसंबंधीयांनी प्रयत्न केला मात्र तो संपला नाही .संत तुकोबाराय ,संत कबीर , वारकरी संप्रदायांनी तो जिवंत ठेवला .छत्रपती शिवरायांनी कर्मकांड नाकारत बुद्धांचे विचार आचरणात आणले. चुकीचा इतिहास सांगणाऱ्यापासून आपण सावध राहिले पाहिजे. राजमाता जिजाऊनी रामकृष्णांच्या गोष्टी सांगून शिवरायांना घडविले नाही. तसे असते तर शिवरायांनी श्रीकृष्णाचा आदर्श घेत आपल्या गडावर राणीवसा उभारला असता .कोणाचेही ऐकून आपल्या राणीला परित्यक्ता बनवले असते. पण शिवरायांनी बुद्धांनी सांगितलेल्या पंचशीलावर आपले रयतेचे राज्य उभा केले .आवश्यक तेथेच शत्रूचे शिरकाण केले. त्यात स्वराज्याच्या आड येणाऱ्या ब्राह्मणांचीही हयगय केली नाही. राजर्षी शाहू महाराजांनी ज्योतिषाला थोतांड ठरवले. बुद्धांचा विचारा अंमलात आणला .आज अण्वस्र युगात बुद्धांनी पेरलेले विचार विसरल्यास जगाचा क्षणात नाश होईल .बोधिसत्व , भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी खराखुरा बुद्ध विचार आपल्यापर्यंत पोहोचवला आहे .बुद्ध बीजरूपाने प्रत्येकात वसलेले आहेत. डॉ.आ.ह. साळुंखे यांच्या भाषेत सांगायचे म्हणजे बुद्ध आपलेच विकसित रूप आहे. काया,वाचा ,मन शुद्ध ठेवण्याचे विचार आचरणात आणायचे आहे .संत गाडगेबाबांनी सांगितलेली खरी देवपूजा आणि रोकडा धर्म हाच खरा बुद्धांचा विचार आहे .
आज न्यायालयात न्याय मिळण्यासाठी प्रचंड खटल्यांचा मारा होत आहे. हा मारा बुद्धांचा विचार विसरल्यामुळे झाला आहे .ठिकठिकाणी होत असलेले कलह बुद्धांनी सांग सांगितलेल्या पंचशील अष्टांग मार्ग आणि दहा पारमिता पालनानेच मिटणार आहेत.भारतात बुद्धांचे पुनरागमन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी जोरदार घडवले.मनुष्यमात्रांना पूर्णत्वास नेण्याचा तेवढाच एकमेव मार्ग आहे.
कार्यक्रमात पोलीस कॉन्स्टेबल म्हणून निवड झालेल्या आरती बापूसाहेब गायकवाड, एन एम एम एस शिष्यवृत्ती मिळवलेल्या प्रणिता सिध्दार्थ साबळे या युवतींचा,”भ.बुद्ध आणि त्यांचा धम्म” ,राजर्षी शाहू महाराजांचे चरित्र आणि अंधश्रद्धा निर्मूलन मासिक देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमासाठी संकल्प मंगल कार्यालय मोफत उपलब्ध करून संतोष ब्राह्मणे यांनी सक्रिय योगदान दिले .कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. सुनील काळेबाग प्रा. सतीश मनतोडे, शशिकांत साबळे ,दिनेश ब्राह्मणे, साहेबराव निकम, उत्तम पारखे,सुधाकर वाकचौरे,दिनकर साठे,सुमेध ब्राह्मणे,इंजि.सुधाकर साठे,विजय तांबे, संध्या जाधव. विद्या ब्राह्मणे, मंजुश्री उबाळे,कल्पना तपासे,साप्ताहिक वंदना संघ यांनी परिश्रम घेतले .आरोही मन्तोडे या बालिकेने राजर्षी शाहू महाराजांवर भाषण करून श्रोत्यांची मने जिंकली .सर्वांनी भोजनाचा स्वाद घेत वैचारिक बुद्ध पौर्णिमा साजरी करण्यात आली.