श्रीरामपूर नाऊर येथील आंबेडकर वसाहतमध्ये ग्रामपंचायत जल कुंभातून हजारो लिटर पाण्याची गळती.
प्रतिनिधी देविदास गायकवाड श्रीरामपूर तालुका संघटक:-9921435437

संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
प्रतिनिधी देविदास गायकवाड श्रीरामपूर तालुका संघटक
दिनांक- 02/05/2023
श्रीरामपूर नाऊर येथील आंबेडकर वसाहत मध्ये पिण्याचे पाणी साठवण करणारे जलकुंभ ८ दिवसापासून लिकेज होत असून ऐन उन्हाळ्याच्या प्रसंगी पाण्याच्या टाकीला छिद्र पडून हजारो लिटर पाणी वाया जात असून हया गोष्टीकडे गाव पातळीवरील अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झालेले चित्र दिसत आहे. वर्षा भरापूर्वी ह्याच जलकुंभाचे लिकेज काढले होते. पण आठ दिवसापासून हया टाकीचे पाण्याची गळती दिसून येत आहे.ते पाणी रस्त्यावर वाहत आहे कदाचीत आणखी लिकेज वाढले तर जिवीत हाणी होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. टाकी शेजारी 1 किराणा दुकान व पिठाची गिरणी आहे. या ठिकाणी सदैव माणसांची येजा चालू असते. त्यामुळे हया गोष्टी कडे दुर्लक्ष न करता दुरुस्ती करावे ही ग्रामपचायत नाऊर या कार्यालयास गावकऱ्यांनी विनंती केली आहे.