खटाव:-स.प. च्या श्री शिवाजी बनसोडे यांच्या ‘नारळ’ चिन्ह वडूज शेती उत्पन्न बाजार समितीत गाजू लागले.
प्रतिनिधी अजित जगताप सातारा:-9922241299

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
प्रतिनिधी अजित जगताप सातारा
स.प. च्या श्री शिवाजी बनसोडे यांच्या ‘नारळ’ चिन्ह वडूज शेती उत्पन्न बाजार समितीत गाजू लागले
वडूज दि: सर्वसामान्य शेतकऱ्यांनी शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्याच्या हिताचा निर्णय घ्यावा. अशी संकल्पना होती. त्याला तिलांजली देण्याचे काम खटाव तालुक्यात होत असल्याने राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार श्री. शिवाजी बनसोडे यांनी सर्वसाधारण मतदारसंघातून आपली उमेदवारी केली असून प्रचारामध्ये उदंड प्रतिसाद लाभत आहे. त्यांच्या ‘ नारळ’ या चिन्हाने सर्वांचे लक्ष वेधून घेतलेले आहे.
‘ नारळ’ हे शुभकार्याचे प्रतीक असून संयम व शेतकऱ्यांच्या हिताची भाषणे होत असल्याने त्यांच्या कोपरा प्रचार सभेला गर्दी होत आहे. राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून सामाजिक कार्याची जाणीव असलेल्या श्री शिवाजी बनसोडे यांनी वडूज ग्राम विकास सोसायटीचे व्हा. चेअरमन डांभेवाडी विकास सेवा सोसायटी, संचालक व अनेक सामाजिक कार्यामध्ये सहभागी घेतलेला आहे .त्यामुळे त्यांच्या उमेदवारीला वाढता पाठिंबा मिळत आहे. सर्वसाधारण सोसायटी मतदारसंघातील एक धाडसी व स्वाभिमानी उमेदवार अशी त्यांची प्रतिमा झाल्यामुळे त्यांच्या नारळ या चिन्हाला भरघोस मताने निवडून द्या. अशा शब्दात ज्येष्ठ मार्गदर्शक कृष्णाराव बनसोडे ,अंकुश राऊत, साहेबराव गोडसे, संभाजी गोडसे, अनंतराव फडतरे, दिलीप भुजबळ, पंढरीनाथ राऊत ,विश्वास फडतरे, सचिन इंगळे, शिवाजीराव रणदिवे, विश्वास इंगळे आधी कार्यकर्ते निस्वार्थीपणाने सांगत आहेत. खटाव तालुक्यातील मांजरवाडी ते तरस वाडी परिसरात प्रत्येक मतदारसंघाच्या मनामध्ये ” चिन्ह पोहचले आहे. विरोधकांचे तीन तेरा वाजविण्यासाठी
मतपत्रिकेत श्री बनसोडे यांचा तेरा क्रमांक आहे. वडूज, पुसेगाव, मायणी या ठिकाणी मतदान प्रक्रिया शांततेत होणार आहे. असा विश्वास रा स प कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.
राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते व माण खटावचे भूमिपुत्र आ. महादेव जानकर यांच्या विचारानुसार व जिल्हा रा. स. प. जिल्हा अध्यक्ष श्रीकांत देवकर, डॉ विनोद खाडे, महादेव तुपे यांच्या मार्गदर्शनाखाली रा.स.प.ने शेतकऱ्यांच्या हितासाठी उभारलेला लढा ऐतिहासिक ठरणार आहे .या मतदारसंघांमध्ये सर्व समाजातून वाढता पाठिंबा मिळत असून त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. सात मते देण्याचा अधिकार मतदारांना आहे. रविवारी दि.३०एप्रिल रोजी मतदान असून सर्व मतदारांशी संपर्क साधला असल्याची माहिती सर्व प्रकाशकांनी दिली आहे.
————————————————————
श्री शिवाजी बनसोडे फोटो