खटाव:-खटाव तालुक्यात द्राक्ष 25 रुपये किलो तर रद्दी 50 रुपये किलो.
प्रतिनिधी प्रा.दिलीप पुस्तके सातारा:-9890318605

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
खटाव तालुक्यात द्राक्ष 25 रुपये किलो तर रद्दी 50 रुपये किलो.
मायणी प्रतिनिधी___खटाव तालुक्याच्या दक्षिण पूर्व भागात अनेक प्रगतिशील शेतकऱ्यांनी द्राक्ष बागा लावलेल्या आहेत सध्या द्राक्षाचा दर शंभर रुपयाला चार किलो पेटी म्हणजे 25 रुपये किलो तर द्राक्ष पॅकिंग साठी लागणारी रद्दी मात्र पन्नास रुपये किलो अशी विचित्र अवस्था द्राक्ष बागायतदारांची झाली आहे. खरे तर हवामान खात्याच्या अंदाजावर द्राक्ष बागायतदार द्राक्षाच्या बागेवर फवारणी करतात विचित्र हवामान असल्यास द्राक्षावर सतत फवारणी करावी लागते. परिणामी छाटणी द्राक्षाचे घड बुडवणे यासारखी कामे लांबणीवर पडतात त्यामुळे द्राक्षाच्या मण्यातील साखर उलट माघारी जाते व द्राक्षाची गोडी कमी होते त्यामुळे दर पडतात सध्या परदेशी जाणाऱ्या द्राक्षाचा दर 170 रुपये ला चार किलो असून पॅकिंग चा खर्च शेतकऱ्याला करावा लागतो व बिल मात्र तीन महिन्यांनी मिळते. म्हणून द्राक्ष बागायतदार जागेवरच शंभर रुपये ला चार किलो याप्रमाणे द्राक्ष विकतात सध्या या दरामुळे द्राक्ष उत्पादन खर्चही निघत नाही. याबाबत कृषी अधिकारी एम एन जाधव यांनी सांगितले की शेतकऱ्यांनी निसर्गाची परिस्थिती हवामान खात्याचा अंदाज यांचा मेळ घालून औषधाची फवारणी करावी कारण हवामान खात्याचे अंदाज 90% चुकलेले असतात त्यामुळे शेतकऱ्यांची निराशा होते तरी शेतकऱ्यांनी वेळोवेळी तज्ञ मार्गदर्शकाचा सल्ला घ्यावा व आपल्या उत्पन्ना उत्पादनात वाढ करावी असे सांगितले.