कृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

वाई:-!! वन टू का फोर (१+२=४)- किसनवीर कारखाना !!

संपादक प्रल्हाद चव्हाण:- 8208717483

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

!! वन टू का फोर (१+२=४)- किसनवीर कारखाना !!
सर्वसामान्यांच्या, शेतकऱ्यांच्या आर्थिक वर्षातील सर्वात कसोटीचा काळ म्हणजे मार्च महिना, या महिन्यात वर्षभरात केलेल्या शेतीमशागतीची उधारी, खते, औषधांची देणी, सहकारी व इतर बँकेची कर्जे तसेच विकास सेवा सोसायट्या या सर्वांचा शेतकऱ्याच्या मागे ससेमीरा असतो, वेळेवर जरी कर्ज परत करता येत नसले तरी कर्ज प्रामाणिकपणे फेडण्याची शेतकऱ्यांची मानसिकता असते ही गोष्ट खरी आहे. यावर्षी शेतकऱ्यांना मार्च महिन्यातला प्रत्येक दिवस म्हणजे एक वर्षासारखा वाटतोय, देणेकरी आणि विविध बँकांच्या कर्जवसुली पथकांच्या दणक्याने शेतकरी विशिष्ट प्रकारच्या प्रसूतीकळांचा अनुभव घेतोय, महागाईचा आगडोंब उसळलेला आहे प्रदीर्घ कोरोना काळातील थकलेली देणे यामुळे शेतकरी वर्ग पुरता त्रस्त आहे, शेतकऱ्याला उसाचे पैसे वर्ष दीड वर्षातून एकदा मिळतात आजमीतिला किसनवीर कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकऱ्याला पैशाची प्रचंड गरज आहे परंतु ऊस कारखान्याला घालून तीन महिन्यापेक्षा अधिकचा काळ लोटला तरी कारखान्याच्या माननीय अध्यक्षांना घाम फुटत नाही, सध्या तालुक्यात मूकनायकांच्या लग्न, समारंभातील व इतर कार्यक्रमातील गाठीभेटी जरी कमी झाल्या असल्या तरी चालू हंगामात कसातरी एकदाचा ऊस किसनवीर कारखान्याला शेतकऱ्यांनी पाठवला व गळीत हंगाम पार पडला त्यामुळे ते चिंतामुक्त आहेत “ये जी ओ जी मैं हू मनमौजी” च्या गुळण्या करत आहेत अशी प्रतिक्रिया वाई तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष श्री कल्याण पिसाळ-देशमुख यांनी दिली आहे
कारखान्याकडून थोडीफार ऊस बिले आली बँकेत जमा झाली की पहिले विकास सेवा सोसायटी काढून घेतात जिल्ह्यातील वि.से.सोसायट्यांचा उद्देश पूर्वीपासून चांगलाच आहे, त्याची लोकांना मदत झाली आहे परंतु बँकेतील प्रस्थापित राजकारणी विकास सेवा सोसायट्यांचा फायदा घेऊन त्यांच्या सोयीनुसार त्यांचा वापर करतात, जिल्हा बँक सोसायट्यां मार्फत शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करतात गाव पातळीवर सोसायट्या जवळपास १००% कर्ज वसुली करतात, कारखान्याकडून जिल्हा बँकेमार्फत पैसे परस्पर सोसायटीकडे वर्ग होतात पर्यायाने सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा अधिकांश व्यवसाय सोसायट्यां मार्फत चालतो, जिल्हा बँकेची वसुली अगदी सहजरीत्या होते, कारखाना बिलातून सोसायटी देण्यास शेतकऱ्यांची हरकत नाही परंतु सुरुवातीला पीक कर्ज भरून घेणे, ते निरंक करणे गरजेचे असताना सोसायटी सचिव मात्र ते पैसे मध्यम मुदत कर्जात घेतात त्यामुळे पीककर्ज थकीत राहते. सचिव मंडळींना जिल्हा बँकेकडून पगार मिळत असल्यागत तेही बँकेच्या हिताचे काम करत असतात. स्थानिक राजकारणामुळे सोसायटीतील बहुतेक सदस्य हे अज्ञानी, अशिक्षित असतात, सचिव व गावटगे सांगेल त्याप्रमाणे मान डोलवणारे असतात एकंदरीत शेतकरी त्याला मिळणाऱ्या पैशाचे नियोजन तो स्वतः करू शकत नाही. कारखान्याकडे ऊस गेल्यानंतर एक महिन्यात पैसे मिळणे अपेक्षित असताना ३-३.५ महिने झाले तरी किसनवीर कारखान्याने पैसे दिलेले नाहीत,हे साखर सम्राट प्रत्यक्ष साखर व इतर उपपदार्थ तयार होण्याअगोदर बाजारातून त्यावर आगाऊ पैसे उचल असतात, फॉरवर्ड ट्रेडिंग करतात तरी ३-३.५ महिने व्यवस्थापन पैसे देऊ शकत नाही, बहुतेक चालू हंगामातील ऊसबिले वेळेवर काढली तर शेतकरी मागील ५७ कोटी थकीत ऊसबिलाला तगादा लावतील असा यांचा विचार असावा, स्वतःहून मागील थकीत ऊसबिलाबद्दल एक अवाक्षरही काढले जात नाही, सभासदांना त्यांच्या कार्डावरील साखर देण्याचीही कारखान्याची परिस्थिती नाही परंतु कारखाना कार्यस्थळावर नेत्यांच्या जयंत्या व इतर कार्यक्रम मात्र अगदी डोळे दिपतील अशा पद्धतीने साजरे केले जातात हे विशेष: कामगारांना तर कुणीच वाली नाही “मुकी बिचारी कशीही हाकावी” अशी त्यांची अवस्था झाली आहे पूर्वीची २६ महिन्यांची पगारबाकी देणे आहे, चालू हंगामातील ५.५ महिन्याचा पगार दिला नाही कर्ज फेडणे राहिले बाजूलाच जगणे सुद्धा कामगारांना मुश्किल झाले आहे पर्याय नसल्याने तेही हतबल आहेत.
मार्च महिना असो अन्यथा काही असो कारखाना व्यवस्थापनाची शेतकऱ्यांना पैसे देण्याची मानसिकता बिल्कुल नाही, जोपर्यंत शेतकरी सोसतोय, शांत बसतोय तोपर्यंत हे चालढकल करत राहणार. कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष आमदार साहेबांचे व माजी अध्यक्ष श्री मदनराव भोसले यांचे संबंध अगदी सलोख्याचे तसेच मैत्रीपूर्ण राहिलेले आहेत हे कार्यक्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांना माहीत आहे त्यामुळे “मैने जो किया वो तुम भी करो जी” वन टू का फोर (१+२=४) असा कानमंत्र श्री मदन भोसले यांनी कारखान्याच्या अध्यक्षांना दिलाय की काय अशी ही चर्चा कार्यक्षेत्रामध्ये आहे असे श्री कल्याण पिसाळ-देशमुख यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
श्री कल्याण पिसाळ देशमुख ओझर्डे
उपाध्यक्ष – वाई तालुका काँग्रेस कमिटी
फोन- ९८५०४१२९०९

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button