कराड:-आधुनिक शेती बरोबर शेतीपूरक व्यवसाय करा – कृषिभूषण मा. श्री. मनोहर साळुंखे
प्रतिनिधी प्रा.संतोष भोंगाळे कराड:-9923900840

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
आधुनिक शेती बरोबर शेतीपूरक व्यवसाय करा
– कृषिभूषण मा. श्री. मनोहर साळुंखे
कराड: (दि. 23, प्रतिनिधी)विज्ञान “तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे काळ बदललेला आहे. शेतीमध्ये उत्पन्न व उत्पादनाच्या मर्यादा वाढलेल्या आहेत, पण शेतमालाला भाव मिळत नाही, समाजाकडून शेतकरी व शेतीला प्रतिष्ठा दिली जात नाही. त्यामुळे शेती व शेतकरी यांची अवस्था दयनीय आहे व त्यांच्या समस्यात वाढच होत आहे, अशावेळी शेतकऱ्यांनी स्वतःची व कुटुंबाची प्रगती करण्यासाठी आधुनिक शेतीचा मंत्र जपत शेतीपूरक व्यवसाय करणे अत्यंत आवश्यक आहे”, असे मत कृषीभूषण मा. श्री. मनोहर साळुंखे यांनी व्यक्त केले. ते वेणूताई चव्हाण कॉलेज, कराडच्या वरिष्ठ विभागातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या वडोली निळेश्वर येथे आयोजित विशेष श्रमसंस्कार शिबिरामध्ये प्रबोधनपर कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
आपल्या मार्गदर्शनात श्री. साळुंखे पुढे म्हणाले की, “80 टक्के कृषी क्षेत्रावर असलेल्या भारत देशात औद्योगिकीकरणामुळे व शेतीबद्दल असलेली सामाजिक अनास्था यामुळे फक्त 65 टक्के लोकच सध्या शेती करत आहेत. पारंपारिक पद्धतीने शेती करणे सध्याच्या काळात शक्य नाही, त्यामुळे हवामान व पाण्याचा अंदाज, नवीन रोपे व बियाणांची माहिती, पिकांची व्यवस्थित माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हंगामानुसार होणारे बदल, सेंद्रिय शेतीचे ज्ञान, इत्यादी माहिती घेऊन शेतकऱ्यांनी प्रगतशील शेती करणे गरजेचे आहे. शेती नियोजन पद्धतीने अभ्यासपूर्वक केली तर नोकरी व व्यवसायापेक्षा जास्त उत्पन्न शेतीमध्ये मिळून कुटुंबाची व वैयक्तिक प्रगती सहजपणे होऊ शकते. आजच्या सुशिक्षित पिढीने शेतीबाबत जागरूक विचार करणे गरजेचे आहे. युवा पिढीने मोबाईलचा वापर गरजेपुरता करणे आवश्यक आहे.”
या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून श्री बापूसो पवार (अध्यक्ष, तंटामुक्ती समिती) उपस्थित होते तर ग्रामस्थांच्या वतीने श्री अशोक पवार, उपाध्यक्ष तंटामुक्ती समिती यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रमुख पाहुण्यांचे स्वागत कार्यक्रम अधिकारी प्रा. आर .पी. पवार यांनी व प्रास्ताविक प्रा. सौ. एस. आर. पाटील यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय कु. श्रीकांत कुलकर्णी यांनी करून दिला, आभार श्री गणेश मिसाळ यांनी व्यक्त केले तर सूत्रसंचालन कु. साईश्वर सावंत यांनी केले.
या कार्यक्रमास वडोली निळेश्वर येथील सरपंच श्री. भिमराव मदने, उपसरपंच सौ. अर्चना वाघमारे, ग्रामपंचायत सदस्य, श्री. संभाजी पवार, सौ. सविता पवार, सौ. अंजना पवार, श्री. हनुमंत पवार, श्री. प्रकाश पवार, श्री. अशोक पवार
कार्यक्रम अधिकारी प्रा. सौ. एस. पी. पाटील, शिबिरार्थी विद्यार्थी, ग्रामस्थ शेतकरी, बहुसंख्येने उपस्थित होते.