औरंगाबाद:- पुलवामा हल्यात शहीद झालेल्या जवानांना
प्रतिनिधी बाळासाहेब सरोदे औरंगाबाद:-9022552792

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
दि. 14/02/2023…
औरंगाबाद.
पुलवामा हल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली.
14 फेब्रुवारी 2019 रोजी जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे CRPF जवानांच्या ताफ्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याची आज पुण्यतिथी आहे. प्रत्येक वर्षी 14 फेब्रुवारी च्या दहशतवादी हल्ल्यात सैनिकांनी केलेला त्याग, परिश्रमाला वंदना देण्यासाठी श्रद्धांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम श्री गजानन वर्कफोर्स प्रा. लि च्या मुख्य कार्यालयात करण्यात येतो. दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री गजानन वर्कफोर्स प्रा. लि. च्या मुख्य कार्यालयात पुलवामा हल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यांचे शौर्य आणि सर्वोच्च बलिदान प्रत्येक भारतीयाला मजबूत आणि समृद्ध देशासाठी काम करण्यास प्रेरित करते. त्यांचे सर्वोच्च बलिदान भारताच्या कायम स्मरणात राहिल”.
सैनिकाच्या प्रती जेव्हा-जेव्हा दुख:द प्रसंग येतो, तेव्हा सर्व नागरिक त्या दुःखात सहभागी असतात, ही अभिमानाची बाब आहे. परंतु यानंतर परिवारास भविष्यात अडचणीसाठी फारसी मदत होत नाही, असे चित्र दिसते. सर्व आजी, माजी सैनिक आणि वीर पत्नी यांना प्रशासकीय व इतर अडचणींमध्ये समाजातील सर्वांनी मदत करावी व सैनिकांचे मनोबल उंचवावे, अशी मनोगत सैनिकांच्या तथा माजी सैनिकांच्या हितार्थ निस्वार्थसेवा करणारे पूर्व भारतीय सैनिक श्री गजानन पिंपळे यांनी व्यक्त केले. तसेच या वेळी सर्व आजी-माजी सैनिक उपस्थित होते. यामध्ये सुभेदार मेजर सुखदेव बन, टी आर गवई, एन.एस.जी. कमांडो कोल्ते सर, बोर्डे गुरुजी, लक्ष्मण अंडारे, बाबूजी जाधव, एस.पी.आय. चे अधिकारी प्रकाश कुलकर्णी, विष्णु गोराडे, प्रकाश देशपांडे, रावसाहेब गोंधळे, तसेच औरंगाबाद पोलीस दामिनी पथकाचे पोलीस निरीक्षक आम्रपाली तायडे मॅडम, निर्मला निंभोरे, लता जाधव, संगीता परळकर, दिलीप आगळे, प्रियंका भिवसने, प्राप्ती पिंपळे, कविता शेजवळ, नाचनवेल गावचे आनंदराव शिंदे, शरद शिंदे, दिपक थोरात, श्री गजानन वर्कफोर्स प्रा. लि चे पदाधिकारी प्रफुल तिळवे, योगेश सोनटक्के, मारोती भोसले उपस्थित होते. तसेच कार्यक्रम यशस्वी पार पडण्यासाठी मनोज पाटील, कैलास नवघरे, गणेश बरथरे, धनंजय कुलकर्णी, राजू भाले आदींनी परिश्रम घेतले. प्राप्ती योगा ग्रुप चे बालगोपाल तनिषा मोरे, राधिका बोरसे, रूद्र पंडित, स्वराज बिचारे, प्रीती बिचारे आदी बालगोपालांनी देशभक्ती पोस्टर हातात घेऊन देशभक्ती चा नवीन संदेश देण्यात आला व परिसरातील इतर देशभक्त नागरिक सुद्धा कार्यक्रमाला उपस्थित होते.