खटाव/चोराडे:-आगामी निवडणुकांसाठी सज्ज राहिले पाहिजे :आ.बाळासाहेब पाटील.
प्रतिनिधी नितीन कुलकर्णी:-9307293406

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
आगामी निवडणुकांसाठी सज्ज राहिले पाहिजे :आ.बाळासाहेब पाटील.
सत्तेवर आलेल्यांनी राज्यातील प्रत्येकाला न्याय देण्याचे काम केले पाहिजे.या सरकारच्या माध्यमातून लोकशाही कोणत्या मार्गाने चालली आहे याचा आपण विचार केला पाहिजे. येणाऱ्या काळातील निवडणुकांसाठी सर्वांनी सज्ज राहिले पाहिजे. मंत्रिमंडळाचा विस्तार नसल्यामुळे कोणत्याही विभागाला सध्या न्याय मिळत नाही. मंत्रिमंडळ विस्तार केल्यावर नाराजी पसरली तर सरकारला धोका आहे याच कारणासाठी मंत्रिमंडळ मंत्रिमंडळ विस्तार होत नाही असे मत माजी पालकमंत्री ,आ.बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केले.
चोराडे(ता.खटाव)येथे विविध विकासकामांचे भूमीपूजन व उदघाटन,सोसायटी अध्यक्ष,उपाध्यक्ष,संचालकांचा सत्कार अशा संयुक्त कार्यक्रमात ते बोलत होते.
कार्यक्रमास राज्याचे राष्ट्रवादी आय.टी.सेलचे प्रमुख सारंगबाबा पाटील,जितेंद्र पवार,सुरेंद्र गुदगे,सुहास पिसाळ,सरपंच कृष्णत पिसाळ,उपसरपंच सुधाकर कुंभार,चेअरमन नारायण पिसाळ,
बबनराव कदम,संगिता साळुंखे,संतोष घार्गे,सुर्यकांत कदम यांची प्रमुखं उपस्थिती होती.
आ.पाटील म्हणाले महाविकास आघाडीच्या सरकारने जी विकास कामे केली त्यांना स्थगिती देण्याचे काम सध्याच्या सरकारने केले.अशा पद्धतीचे वागणे लोकशाहीला मारक आहे.यामुळे राज्याचे फार मोठे नुकसान होत आहे.हे सरकार सर्वसामान्यांचा द्वेष करणारे आहे.
सारंगबाबा पाटील म्हणाले,कोणत्याही क्षेत्रात काम करा.त्या-त्या क्षेत्रातील अभ्यास हा चिरंतर ठेवावा लागतो. मतदारांच्या विकास कामाच्या कितीही अपेक्षा वाढल्या तरी त्या पूर्ण करण्यास खासदार व आमदार कधीही मागे हटणार नाहीत.सहा महिन्यापूर्वी घडलेले सत्ता नाट्य मतदारांना आवडलेले नाही.कराड उत्तर मतदार संघाने नेहमीच लोकसभा व विधानसभेत चांगल्या विचारांची पाठ राखण केली आहे.
कार्यक्रमास नितीन कुलकर्णी,आबासो काशीद,कृष्णतशेठ पिसाळ,प्रथमेश पिसाळ,अनिल पिसाळ,सुदाम पिसाळ
कार्यकर्ते,ग्रामस्थ व महिला उपस्थित होते.प्रास्ताविक सुहास पिसाळ तर आभार दिग्विजय पिसाळ यांनी मानले.
फोटो- चोराडे ता.खटाव विकासकामांचे उद्घाटन करताना आ.बाळासाहेब पाटील,सारंगबाबा पाटील व मान्यवर