खटाव:-बाजार समितीला ऊर्जेतावस्थेत आणण्यासाठी खटाव विकास आघाडीची’ ब्लू प्रिंट’ तयार.
प्रतिनिधी अजित जगताप सातारा:-9922241299

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
प्रतिनिधी अजित जगताप सातारा
बाजार समितीला ऊर्जेतावस्थेत आणण्यासाठी खटाव विकास आघाडीची’ ब्लू प्रिंट’ तयार.
पुसेगाव दि: वडूज शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची प्रचाराची फेरी संपत आलेली आहे. आतापर्यंत उमेदवारांनी प्रत्येक मतदारांच्या दोन वेळा गाठीभेटी घेतलेली आहेत. सर्वत्र उदंड प्रतिसाद मिळत असून शेती उत्पन्न बाजार समितीला उर्जिता वस्थेत आणण्यासाठी खटाव विकास आघाडीची ‘ब्ल्यू प्रिंट’ तयार करण्यात आलेली आहे. त्यामुळे विजय निश्चितच झाल्याचे मानण्यात येत आहे.
खटाव तालुक्यासाठी वरदायिनी ठरलेल्या शेती उत्पन्न बाजार समितीची स्थापना १९६७ साली आदरणीय तात्कालीन आमदार केशवराव पाटील यांनी केली. त्यांना बुध ता. खटाव येथील संभाजीराव घाडगे व निमसोड ता. खटाव येथील ध्येयशिल देशमुख व अनेक मान्यवरांची मोलाची साथ लाभलेली होती. आज पुन्हा एकदा शेती उत्पन्न बाजार समितीला गत वैभव प्राप्त करून देण्यासाठी पक्षविरहित मान्यवर मंडळींनी खटाव विकास आघाडीची स्थापना केलेली आहे.
विकास कामासाठी संपूर्ण खटाव तालुका एकत्र येऊ शकतो हा आत्मविश्वास सभासद व मतदारांपर्यंत पोहोचलेला आहे .खरं म्हणजे दूरदृष्टी ठेवून जुन्या जाणत्या नेत्यांनी पुसेगाव, वडूज या ठिकाणी प्रत्येकी सात एकर व पुसेसावळी या ठिकाणी पाच एकर जमीन खरेदी करून ठेवली होती. आज त्या जमिनीमध्ये शेती उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवण्यात येणार आहे. वडूज नगरीमध्ये भाजीपाला व जनावरांचा मोठा बाजार त्याचबरोबर पुसेगाव या ठिकाणी आले ,कांदा, बटाटा अशा जीवनावश्यक वस्तूंची खरेदी विक्री करण्यासाठी कटिबद्ध राहणार आहे .
शेतकऱ्याच्या शेतीमालाला योग्य भाव मिळावा तसेच त्यांना शेती उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून सन्मानपूर्वक वागणूक मिळावी. या दृष्टीने खटाव विकास आघाडी कटिबद्ध आहे .सदरची जागा ही मोक्याचे असल्यामुळे या ठिकाणी व्यापारी गाळे बांधताना स्थानिक भूमिपुत्रांना प्राधान्य देण्यात येणार आहे .शेवटी प्रत्येक विकास कामासाठी निधीची आवश्यकता असते. सुदैवाने खटाव विकास आघाडीच्या माध्यमातून सत्ताधारी कर्तबगार दोन आमदार जयकुमार गोरे ,आमदार महेश शिंदे यांची मोलाची साथ लाभलेली असल्याने केंद्र व राज्य सरकारच्या शेतीपूरक योजना राबविण्यात कोणती अडचण येणार नाही .तसेच योगायोग म्हणजे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक म्हणून माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्या नेतृत्वाखाली सर्वजण एकत्र आलेले आहेत .आज प्रत्येक भागात किंबहुना खटाव तालुक्यातील उमदे नेतृत्व म्हणून पाहिले जाणारे रणजीत भैया देशमुख, धैर्यशील कदम डॉ. दिलीप येळगावकर डॉ. महेश गुरव ,राहुल पाटील, विक्रमसिंह कदम, विक्रम रोमण, हिंमत माने, राजू मुलाणी, सचिन माळी, कुणाल गडांकुश, महेश नलवडे, मानाजी घाडगे, अजय सानप, सुनिल घोरपडे ,संजीव साळुंखे, धनाजी फडतरे, मंगेश फडतरे, मोहन देशमुख, हनुमंत भोसले, धनाजी चव्हाण, विशाल बागल, यांच्यासह स्थानिक पातळीवरील सोसायटी मधील चेअरमन, व्हा. चेअरमन सभासद संचालक तसेच ग्रामपंचायत सरपंच- उपसरपंच, सदस्य आणि विशेष म्हणजे व्यापारी, हमाल, मापाडी यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.
निवडणूक प्रक्रिया ही औपचारिकता राहिलेली असून हा खटाव विकास आघाडीने विजय नम्रपणे स्वीकारण्यासाठी खटाव विकास आघाडीचे सर्व उमेदवार संयमाने प्रचार यंत्रणा राबवत असल्याबद्दल सभासदांनी त्यांचे मनःपूर्वक आभार मानलेले आहेत. ट्रॅक्टरने मशागत करून या सर्व जमिनीची उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी ट्रॅक्टरच उपयुक्त आहे. असे ग्रामीण भागामध्ये चर्चा सुरू झालेली आहे.
————————————–&&&———-&—-
फोटो-खटाव विकास आघाडीचे नेते मा. आ. प्रभाकर घार्गे यांच्याशी चर्चा करताना मान्यवर (छाया – सूरज पोतदार, वडूज)