खटाव:-वडूज नगरीत पंचायत समिती मार्फत शिव स्वराज्य दिन मोठ्या उत्साहात साजरा.
पत्रकार अजित जगताप सातारा:-9922241299

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार अजित जगताप सातारा
वडूज नगरीत पंचायत समिती मार्फत शिव स्वराज्य दिन मोठ्या उत्साहात साजरा
वडूज दि: देशाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी रयतेचे राज्य निर्माण केले. या गोष्टीला साडेतीनशे वर्षे पूर्ण होत आहेत .त्याचे औचित्य साधून खटाव पंचायत समितीच्या वडूज येथील मुख्यालयासमोर शिव स्वराज्य दिन सहाय्यक गटविकास अधिकारी श्रीकांत गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कर्मचाऱ्यांनी साजरा केला. शिव शक राजदांडवर भगवा स्वराज्य ध्वज यावेळी श्री गोसावी यांच्या हस्ते फडकवण्यात आला .
या वेळेला छत्रपती शिवराय महाराजांच्या विचाराशी अभिप्रेत असलेला भगवा ध्वज लावण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा भारत देशाच्या सर्वसामान्य जनतेचा स्वाभिमान जागा करणारा उत्सव आहे. हा हिंदुस्थानच्या इतिहासातील महत्त्वाचा क्षण असून राज्याभिषेक हा धार्मिक विधी ज्येष्ठ शुद्ध चतुर्थी म्हणजे दि २९ मे १९७४ पासून ते ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी म्हणजे दि ६ जून १६७४ पर्यंत चालला होता. येणे प्रमाणे राजा सिंहासन रूढ झाले या सर्व पृथ्वीवर बादशहा मराठा ही गोष्ट सामान्य झाली नाही. असे त्याचे इतिहासात वर्णन केलेले आहे.
महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्मलेल्या छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे स्वाभिमान आहे. त्या स्वाभिमानाची आठवण म्हणून राज्य सरकारने हा दिन साजरा करण्याचा जो ऐतिहासिक निर्णय घेतला. त्यामुळे तमाम मराठी माणूस सुखावला आहे. सतराव्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी जी नैतिकता दाखवली. त्या काळातील मराठा समाजाचे शक्ती आहे. प्रजेमध्ये ऐक्य निर्मितीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी जीवनभर प्रयत्न केले त्यातूनच घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाची निर्मिती केलेली आहे .आजही खऱ्या अर्थाने छत्रपतींच्या विचारानुसार राज्य करताना ज्या काही वाईट गोष्टी आहेत त्याला शासन करण्याचाही अभिवचन भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रत्येक कृती ही युवा पिढीसाठी प्रेरणादायक आहे. अखंड प्रेरणा देणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा भारतीय अस्मितेचा अविष्कार आहे. शिवाजी राजेंनी रायगडावर राज्याभिषेक केला. या घटनेचे वर्णन अनेकांनी केले असले तरी वेदशास्त्र संपन्न गागाभट यांनी पुरोहित केले. शिवाजी महाराज हे ३२ मण सोन्याच्या सिंहासनावर बसले. या राज्याभिषेकासाठी त्याकाळी १ कोटी ४२ लक्ष खर्च आला. खऱ्या अर्थाने आजच्या युगात शिव स्वराज्य दिन राज्याभिषेक म्हणजे खऱ्या अर्थाने सर्वांसाठी अभिमानास्पद बाब आहे. या राज्याभिषेकासाठी अकरा हजार लोक आपल्या परिवारासह रायगड जमले होते. असे दप्तरांमध्ये नोंद आहे.
खरं म्हणजे राज्यश्री शिवाजी राजे भोसले सिंहासनावर अरुढ होणे म्हणजे मराठ्यांचा मराठी बाणा याचेच दर्शन झाले. याची आठवण सर्व धर्मीय लोक आजही काढत आहेत.
आज खटाव तालुक्यातील वडूज पंचायत समितीच्या आवारात हुतात्म्यांना अभिवादन करून जय जय महाराष्ट्र माझा,,,,, गर्जे महाराष्ट्र माझा तसेच महाराष्ट्र गीत सादर करून खटाव पंचायत समितीच्या सर्व कर्मचाऱ्यांनी शिव स्वराज्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. या कार्यक्रमाला सहाय्यक गट विकास अधिकारी श्रीकांत गोसावी, गटशिक्षणाधिकारी प्रतिभा भराडे, शुभम वाघमारे, के. बी उदमले एस. के. झेंडे, टी. वाय. पवार, के. टी. गायकवाड, शिंदे, प्रमोद शेलार, अधिकारी यांच्यासह सर्व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन तुकाराम खाडे यांनी केले. यावेळेला भर उन्हातही छत्रपती शिवरायांबद्दल असलेला स्वाभिमान व अभिमान पंचायत समितीच्या सर्व कर्मचाऱ्यांनी दाखवून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराप्रमाणेच रयतेचे म्हणजे लोकशाहीमध्ये जनतेचे निस्वार्थीपणाने काम करण्याची जबाबदारी पूर्ण केली जाईल असे आश्वासन दिले. या कार्यक्रमाचे स्वाती राऊत, श्रीमती ओमासे, भुजबळ, विभुते, माळी, राजमाने, रीना जावळे व मंदार मोहिते, दशरथ शिंगाडे, अनेक मान्यवरांनी कौतुक केले आहे
______________________________________
छाया- खटाव पंचायत समितीच्या आवारात शिव स्वराज्य दिन साजरा करताना स. गटविकास अधिकारी श्रीकांत गोसावी व सर्व अधिकारी कर्मचारी वृंद (छाया -अजित जगताप ,सातारा)