कृषी व व्यापारताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाई:- गाळपायोग्य ऊस खाजगी कारखान्यांला व भूतकांडी मात्र किसनवीर कारखान्याला.

संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.

नी!! भूतकांड्यांचा धनी… किसनवीर कारखाना !!*
राजकीय ईप्सित जोपासण्यासाठी खंडाळा सहकारी साखर कारखाना गेल्या वर्षी चालू करणे शक्य असताना विशिष्ट हेतू डोळ्यासमोर ठेवून तो जाणीवपूर्वक बंद ठेवला. तो कारखाना ३.५ महिन्यापूर्वी राणा भीमदेवी थाटात शंखनाद करत चालू केला, गतवर्षी बंद असणारा कारखाना चालू झाल्याचा आनंद शेतकरी वर्ग साजरा करू लागला पाठोपाठ साधारण एक महिन्याने किसनवीर सह. साखर कारखानाही चालू झाला परंतु ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या दुर्दैवाने गेली १०- १५ वर्षे वाई तालुक्याच्या जननायक आमदार साहेबांनी किसनवीर कार्यक्षेत्रात जे पेरलं तेच सध्या उगवत असल्याचे दिसत आहे, आमदारांचे कट्टर समर्थक कार्यकर्ते, गावोगावचे बिनीचे शिलेदारच दस्तूरखुद्द नेत्यांचा आदेश डावलून स्वतःचा ऊस जरंडेश्वर व शरयू या खाजगी कारखान्यांना गाळपासाठी पाठवत असल्याचे चित्र तालुका कार्यक्षेत्रामध्ये दिसत आहे. वाई तालुका सोडला तर कार्यक्षेत्रातील इतर तालुक्यातील शेतकरी आपला ऊस शेजारील इतर कारखाने व खाजगी कारखान्यांना घालत आहेत, कमी दिवसांचा, अपरिपक्व राहिलेला, खराब, वाळलेला, जसा मिळेल तसा, ज्या ऊस उत्पादकांना कोणी वाली नाही अशा शेतकऱ्यांचा ऊस अपरिहार्यतेमुळे किसनवीर कारखान्याकडे गाळपासाठी जात आहे ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे चांगला ऊस खाजगी कारखान्यांला व भूतकांडी किसनवीरला अशी खुमासदार चर्चा सध्या शेतकरी वर्गात ऐकायला मिळत आहे अशी प्रतिक्रिया वाई तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष श्री कल्याण पिसाळ-देशमुख यांनी दिली.
वाई तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागचे शुक्लकाष्ठ काही थांबायचे नाव घेत नाही, एक तर चालू वर्षी पश्चिम महाराष्ट्रातील सर्व कारखान्यांकडे ऊसतोड यंत्रणा व कामगारांची वाणवा आहे प्रत्येक कारखान्याकडे तुलनेने गरजेपेक्षा कमी यंत्रणा आहे तिच अवस्था किसनवीरची सुद्धा आहे सोबतीला कर्तृत्वसंपन्न आमदार गटाची पूर्वपुण्याई आहेच, गेल्या अनेक वर्षात आमदार साहेबांनी दिलेल्या शिकवणुकीचे काटेकोर व तंतोतंत पालन त्यांचे कट्टर समर्थक करत आहेत, फक्त थोडाफार नावापुरता ऊस किसनवीरला व बहुतांश ऊस खाजगी कारखान्यांनकडे गाळपासाठी पाठवत आहेत त्यातही जिल्हा बँकेतील, कारखान्यातील व इतर संबंधित संस्थांमध्ये काम करणारे कर्मचारी आहेत, अशांचाच काही प्रमाणात ऊस गाळपासाठी किसनवीर कारखान्याकडे येत आहे, राजकीय दबावामुळे त्यांना ऊस किसनवीर कारखान्याला पाठवणे क्रमप्राप्त आहे. इतर कारखान्यांच्या तुलनेत टनाला ३०० ते ४०० रुपये कमी दर घेण्याची शेतकऱ्यांची मानसिकता बिल्कुल नाही त्यातूनही ऊस पाठवलातर पैसे मिळतीलच याची ठोस खात्री नाही, सुरुवातीला ऊस मिळवण्याकरता एक-दोन बिलं मिळतीलही. कारखाना बचाव मोहिमेअंतर्गत ऊस उत्पादक शेतकऱ्यांची खिसे मोकळे करणाऱ्या या कारभाऱ्यांवर लोकांचा विश्वास राहिला नाही ही गोष्ट खरी आहे या भीतीपोटी गावागावातील राष्ट्रवादीचे बहुतांश कट्टर समर्थक खाजगी कारखान्यांना ऊस पाठवत आहेत, किसनवीर कारखाना पूर्ण क्षमतेने चालला नाही तर अखेरीस संचित तोटा वाढत जाणार असे या क्षेत्रातील तज्ञ लोकांचे मत आहे. बऱ्याच वेळा खंडाळा कारखाना नो – केन अवस्थेमध्ये असतो थोड्याफार फरकाने किसनवीरचीही अवस्था तशीच आहे, कारखान्यावर गाळपासाठी केनयार्डात वाहने ऊस गाळपासाठी उभी असल्याचे चित्र फार क्वचित पाहायला मिळते. अलीकडेच काही दिवसांपूर्वी कामगारांचा पगार दिला नसल्याने खंडाळा कारखाना कामगारांनी बंद ठेवल्याची खाजगीत चर्चा आहे. सुरुवातीला जरंडेश्वर कारखान्याच्या टोळ्या सालाबादप्रमाणे वाई तालुक्यामध्ये आल्या होत्या परंतु शेजारील दोन्ही शरयू व जरंडेश्वर हे दोन्ही कारखाने राष्ट्रवादीच्या जागृत देवस्थानाच्या मालकीचे आहेत, त्यामुळे त्यांच्याशी संगनमत करून जननायक आमदारांच्या व जिल्हा बँकेच्या अध्यक्षांच्या आदेशावरून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जरंडेश्वरच्या टोळ्या येथे उतरून दिल्या नाहीत बहुतांश यंत्रणा जबरदस्तीने परत पाठवली जी थोडीफार यंत्रणा राहिली त्या टोळ्यांनी सत्ताधारी गटातील गावटग्यांचा ऊस जरंडेश्वरला पाठवण्याचे काम इमानेइतबारे केले, ज्या विरोधकांना कोणी वालीच उरला नाही कोणी, दखल घेत नाही अशा शेतकऱ्यांना नाईलाजास्तव ऊस गाळपसाठी किसनवीरला पाठवावा लागत आहे, गतवर्षी ऊस तोडी करता ज्या विरोधक शेतकऱ्यांना आत्ताच्या सत्ताधाऱ्यांनी नाडले, नागवले त्यांच्याच पुण्याईवर किसनवीर कारखान्याचे पेटते धुराडे आज दिसते आहे, ५ तालुक्याचे कार्यक्षेत्र असूनही फक्त वाई तालुक्यातील शेतकरी हतबल होऊन किसनवीरला ऊस पाठवीत आहेत असे सध्याचे चित्र आहे.
माजी अध्यक्ष श्री मदन भोसले किसनवीर कारखान्याच्या जोखडातून मुक्त झाल्यामुळे मस्त – मौला जीवनाचा आनंद घेत आहेत, त्यांना ना शेतकऱ्यांच्या उसाची काळजी, ना मागील थकीत ५७ कोटी ऊस बिलाची ददाद, ना त्या पूर्वीच्या प्रति टन ३५० रुपये चे काही देणे घेणे, मागील वर्षाच्या ऊस तोडी विना उभ्या असणाऱ्या ऊसाची नुकसान भरपाई मिळणे बाजूलाच त्यातीलच काही ऊस अजूनही तोडणी विना शेतात तसाच उभा आहे. आमदार साहेबांनी अशीच गेली १० – १५ वर्षे मूकनायकाची भूमिका घेऊन संधीची वाट बघत राहिले व योग्य वेळ येताच कारखान्यावर झडप घातली तीच भूमिका सध्या श्री मदन भोसले पार पाडत आहे, आजी-माजी सत्ताधाऱ्यांचे हे शेतकऱ्यांविषयीचे प्रेम म्हणजे मगरीचे अश्रू आहेत, भविष्यकाळात तालुक्यातील हे दोन्ही बब्बर शेर – ढेर केल्याशिवाय, दोघांचंही चांगभलं केल्याशिवाय वाई तालुक्यातील मायबाप शेतकऱ्याचं , कष्टकऱ्यांच भलं होणार नाही.
वाई तालुक्यातील शेतकरी सोशिक आहे परंतु हतबल व अडाणी मुळीच नाही,योग्य वेळ येताच सर्वसामान्य शेतकरी यांची दखल घेतील, दोघांचाही यथोचित न्याय करतील व त्यांना धडा शिकवतील असा आशावाद करण्यास हरकत नाही असे श्री कल्याण पिसाळ-देशमुख यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकार म्हटले आहे.
श्री कल्याण पिसाळ- देशमुख, ओझर्डे
फोन न. ९८५०४१२९०९.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button