राहता:-प्रहारचे राहाता तालुका संघटक व RPS प्रेस पत्रकार श्री.वसंतराव पा.काळे यांची नांदूर्खी बु.गावात कायमस्वरूपी तलाठी व ग्रामसेवक यांची नेमणूक व्हावी यासाठी ग्रामपंचायतने पाठपुरावा करण्याची मागणी.
प्रतिनिधी वसंतराव काळे अहमदनगर:-9767653309

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
नांदूर्खी बु.गावात गेल्या काही वर्षापासुन गावासाठी कायमस्वरूपी ग्रामसेवक नाही कि तलाठी नाही.तरी ग्रामपंचायतचे मागील असो किव्हा आताचे असो अजिबात लक्ष देत नाही.सरपंच असेल किव्हा सदस्य त्यांच्या त्यांच्या वयक्तिक कार्यात कार्यरत आहेत.त्यांनी आता नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविता कशा येतील याकडे लक्ष देऊन कार्य करणे गरजेचे आहे.त्या प्रमाणे लक्ष घालून आपल्या नांदूर्खी बु.गावात कायमस्वरुपी ग्रामसेवक व तलाठी यांची लवकरात लवकर व्यवस्था करावी यासाठी पाठपुरावा करणे गरजेचे असताना कोणताही सदस्य किव्हा सरपंच किव्हा विरोधी यावर बोलायला तयार नाही.मग गावात लोकांची कामे वेळेवर कशी होणार.अनेक वेळा खूप लोक तलाठी कार्यालयाबाहेर काहीना काही कामासाठी दिवसभर पायर्यावर येऊन बसलेले बघायला मिळतात.फोन केला तर कोणी फोन उचलत नाही.बाहेर येणार कि नाही हा बोर्डही लावलेला नसतो.काहींना दाखले हवे असतात तर काहींना महत्वाच्या कामासाठी उतारे हवे असतात.ते वेळेवर मिळत नाही.लोकांना खूप दिवसापासून खूप अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.तशीच अवस्था ग्रामपंचायतमधे ग्रामसेवक गावाला कायमस्वरूपी नसल्यामुळे झाली आहे. महत्वाच्या दाखल्यासाठी लोकांना तीन तीन दिवस ग्रामसेवक नसल्यामुळे वाट बघावी लागते.काहींना खुप अर्जंट दाखल्याची गरज असतानाही फक्त सही वेळेवर होत नसल्यामुळे देवासारखी तीन तीन दिवस वाट बघावी लागते.त्यामुळे काहींचे वेळ निघून गेल्यामुळे महत्वाची कामे अडकली जातात व त्यामुळे नागरिकांचे खूप मोठे नोकरीच्या कामाचे असो किव्हा आणखी इतर काही कामे असतील खूप मोठे नुकसान होत असते. त्यामुळे ग्रामपंचायतने लोकांच्या अडीअडचणी लक्षात घेऊन याचा मा.तहसीलदार साहेब व मा.गटविकास अधिकारी यांच्याकडे लवकरात लवकर पाठपुरावा करून गावाला कायमस्वरूपी तलाठी व ग्रामसेवक उपलब्ध करून गावाच्या विकासाला व हातभार लावावा हि गावातील सर्व नागरिकांची ग्रामपंचायतकडे मागणी आहे.लोकांच्या या मागणीचा जर ग्रामपंचायतने लवकरात लवकर पाठपुरावा केला नाही तर सरपंच यांच्या खुर्चीला पुष्पहार घालून व इतर अनेक प्रकारे आंदोलन करून निषेध करण्यात येईल याची ग्रामपंचायतने नोंद घ्यावी.