खटाव:-वडूज आगाराचा गलथान कारभार प्रवासी त्रस्त.
प्रतिनिधी प्रा दिलीप पुस्तके सातारा:-9890318605

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
वडूज आगाराचा गलथान कारभार प्रवासी त्रस्त. मायणी प्रतिनिधी__गेल्या तीन दशकाहून अधिक काळ कार्यरत असणाऱ्या वडू.ज. आगाराच्या गलथान कारभारामुळे प्रवासी त्रस्त झालेले आहे या आगाराचा गलथानकारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे याबाबत अधिक माहिती अशी की राच्या लांब पल्ल्याच्या गाड्या वेळेवर सुटत नाही वेळेपेक्षा तास दीड तास लेट सुटतात तसेच वडूज सातारा दर अर्ध्या तासाला . बस सेवा सुरु केली आहे समजा पहिली गाडी नादुरुस्त झाली तर एका मागे एक मोकळ्या गाड्या धावत असतात प्रवासी मात्र गाड्यात एक दोनच असतात वडूज सांगली जास्त उत्पन्न देणाऱ्या गाड्या बंद केल्याने प्रवासी जनतेची गैरसोय झाली आहे तसेच मायणी येथून वडूज दहिवडी पुन्हा वडूज पुन्हा पुणे अशी विचित्र गाडी सुरू करून आपल्या अजब कारभाराचा नमुना प्रवासी जनतेला दाखवलेला आहे आगारातून बस सुटल्यानंतर एक दोन किलोमीटरवर बंद पडलेल्या असतात अधिक चौकशी केली असता अधिकाऱ्यांनी सांगितले की आमच्याकडे भंगार जुन्या गाड्या आहेत त्यांची अवस्था दयनीय आहे त्यामुळे नियोजन करता येत नाही यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनीलक्ष देणे.
गरजेचे आहे वाहतूक नियंत्रक महाडिक सो यांनी गंभीर दखल घेऊन वडूज आगार सुरळीत करावा अशी मागणी प्रवासी जनतेतून होत आहे.