फलटण:- (मिरगाव) -गुणवत्ता हिच मालमत्ता – श्री.दिगंबर गायकवाड.
राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS
फलटण:- (मिरगाव) -गुणवत्ता हिच मालमत्ता – श्री.दिगंबर गायकवाड.
जून २०१९ रोजी मी बदलीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मिरगाव केंद्र- फरांदवाडी येथे हजर झालो. पूर्वीपासून पहिली ते पाचवीच्या शाळेवरच मी काम केलेले आणि द्वि-शिक्षकी शाळेवर कामकाज करण्याचा अनुभव असल्याने उच्च प्राथमिक शाळेवर काम करण्याचे मला दडपण आले होते.
मूळचा खेळ, चित्रकला, तसेच विविध गुणदर्शन इ.आवड असणारा मी शाळेवर हजर होताच इयत्ता पाचवीच्या वर्गाची जबाबदारी माझ्यावर सोपविण्यात आली.
तुम्ही तरुण आहात, इंग्रजी ,गणित तयारी चांगली आहे. त्यामुळे तुम्ही शिष्यवृत्ती तयारी चांगली घेऊ शकाल अशी वरून मिळालेली जबाबदारी रूपी प्रबलन .आदरणीय बरकडे सर यांचा माझेरी पॅटर्न माझ्यासमोर असताना माझा मित्र रवी परमाळे यांनी शिष्यवृत्ती मध्ये केलेली धमाकेदार कामगिरी मला खूप प्रेरणा देऊन गेली.त्यामुळे रवींद्र परमाळे यांच्याशी वारंवार शैक्षणिक काम, वेगवेगळे प्रयोग, अप्रगत मुलांच्या शिक्षणाची धडपड, याविषयी चर्चा होत होती.
यातून प्रथमच इयत्ता पाचवीचे विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी बसवले.कोणतीही दिशा नव्हती,मित्राची प्रेरणा, पत्नीची साथ ,वरिष्ठ अधिकारी यांचे मार्गदर्शन हे मी माझ्यासाठी महत्वाचे समजतो.मी अनोळखी क्षेत्रात उडी मारलीच होती.
मिरगाव हे लाल मातीचे गाव, कुस्तीची परंपरा,मनगटात रग,पण बुद्धी, गुणवत्ता यामध्ये विशेष रस नाही.पालक गुणवत्तेसाठी जास्त आग्रह नव्हते. अशामध्ये जे काही करायचं ते स्वतः अशी मनाची खून गाठ बांधून माझा प्रवास सुरू झाला.
शिष्यवृत्ती मध्ये प्रथमच एक विद्यार्थी 190 मार्कापर्यंत पोहोचला. इतर विद्यार्थी 150 चे वर राहिले. परंतु पात्र टक्केवारी 60 टक्के राहिली असल्याने यामध्ये भक्कम पाय रोवून उभे राहायचे ठरवलं. शाळेतील स्टाफ, मुख्याध्यापक यांनीही माझं योगदान बघून मला वरील गट ६ वी ते ८वी वर काम करण्याची संधी दिली.त्यामुळे माझ्यामध्ये नव्याने चैतन्य निर्माण झालं. परंतु निसर्गाला हे मान्य नव्हतं आणि संपूर्ण जगात कोरोनाचा हाहाकार झाला होता. शाळा बंद झाल्या.माझं शिष्यवृत्तीचे स्वप्न अपूर्ण राहत असल्याचे दिसू लागले. इयत्ता सहावी व सातवीचे अर्धा सत्र सुमारे दीड वर्षे घरी राहिले. मला मार्ग सुचत नव्हता. मग माझ्या तंत्रस्नेही मित्राच्या मदतीने मी ऑनलाईन अध्यापनाचे नियोजन केले. मुलांची अध्ययनाची सृंखला पुढे चालू ठेवली.मुलेही प्रत्यक्ष फोन करून शंका विचारू लागले.आणि आमचा प्रवास सुरू राहिला.
नोव्हेंबरला कोरोनाच्या हाहाकारा नंतर शाळा सुरू झाल्या आणि माझी मुले आनंदी झाली. पहिल्याच दिवशी सर्व मुलांना शिष्यवृत्ती मार्गदर्शिका खरेदी करून दिल्या. इयत्ता सातवी मध्ये इयत्ता आठवीचे सर्व गणित घटक शिकून पूर्ण झाले. मार्गदर्शिका सोडवून घेतली. त्यासाठी शाळेचा वेळ कमी पडू लागला. मग सकाळी साडेसातला ज्यादा तास सुरू केले व शिष्यवृत्तीचे काम जोमाने सुरू केले. इयत्ता आठवी गणित व इतर घटक कठीण होते.एके दिवशी मला सहज NMMS शिष्यवृत्ती विषयी माझ्या एका क्लासमेट कडून माहिती मिळाली NMMS मध्ये मिळणाऱ्या ६०हजार शिष्यवृत्तीने माझ्या वर्गातील गरीब, मुलांना एक आर्थिक मदत होऊन पुढील शिक्षणासाठी मदत होऊ शकते. हे लक्षात आले मुलांनाही यातून आर्थिक मदत मिळेल म्हणून मी माझा मोर्चा NMMS च्या बाजूने वळवला. बऱ्यापैकी या दोन्ही परीक्षांचा अभ्यासक्रम एकच होता. मग ठरवलं यामध्ये आपण काम करायचं,मुलांना आर्थिक आधार मिळवून द्यायचा. मग महाराष्ट्रात NMMS व शिष्यवृत्ती यावर काम करणाऱ्या शिक्षकांचे मार्गदर्शन घ्यायचं ठरवले व त्यां शिक्षकांना भेटण्यासाठी व मार्गदर्शन मिळवण्यासाठी रात्रीचा दिवस केला. सर्व प्रकारची साहित्य स्वखर्चाने मुलांसाठी उपलब्ध करून देऊ लागलो.
ग्रामीण भाग, गरीब,अशिक्षित पालक वर्ग, पालकांची उदासीनता,मुलांना असलेली घरची कामे यामधून मार्ग काढायचे ठरवलं तुम्हाला आवडणारे काम करा व तुम्ही हे करू शकता असे माझी पत्नी पूनम हिने दिलेली प्रेरणा व मुलांसाठी ज्यादा वेळ देण्यासाठी घरच्या वेळेतून दिलेली मोकळी मला अधिकच प्रेरणा देऊन गेली.
मग शाळेची वेळ सकाळी साडेसात ते संध्याकाळी सहा झाली. मुले रमू लागली.अभ्यासावर आणि आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करु लागली. अभ्यासक्रमात येणाऱ्या अडचणीवर रोजच मित्र रवी यांच्याशी चर्चा व्हायची आणि दुसऱ्या दिवशीच नियोजन व्हायचं. मुलांनीही खूप प्रतिसाद दिला.
सकाळी पहाटे सेल्फी उपक्रम चालू केला. या अंतर्गत मुले साडेचारला उठून अभ्यासाला बसून वर्ग ग्रुपवर सेल्फी टाकत, मुलांना अभ्यासाचे नियोजन करून दिले. प्रत्येकाची वैयक्तिक अडचण,चांगल्या बाबी समजून घेऊन त्यांच्या पालकांशी संवाद साधला ही वाढत्या वयाची मुले पूर्ण अभ्यासावर आणि आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करू लागली.सकाळी ध्यान करताना यशाची काल्पनिक स्वप्ने पाहू लागली व ती सत्यात उतरवण्यासाठी झटू लागली.मुलांच्या सर्व संकल्पना स्पष्ट झाल्या सर्व अभ्यासक्रम मी ऑगस्टपूर्वी पूर्ण केला.
मुलांना लागणारी सर्व मार्गदर्शिका, प्रश्नसंच वेगळ्या व इतर साहित्य स्वखर्चाने उपलब्ध करून दिले. मुलांचे एकूण 72 शिष्यवृत्ती परीक्षा सराव घेतले व अवघड, न समजणाऱ्या बाबीवर वर्गात चर्चा घडवून घेऊ लागले.
परीक्षेसाठी बसलेल्या दहा मुलांपैकी सहा मुले पात्र होतील. याचा अंदाज आला परंतु या निकालावर जास्त लक्षणे न देता. पुढील आठवी शिष्यवृत्ती कामावर फोकस केला. त्यामध्ये माझा एके दिवशी अपघात झाला. हात फॅक्चर झाला. सर्व मुलांना हे माहीत झाल्यावर संपूर्ण वर्ग रडू लागला. त्यामुळे मी घरी राहू शकत नव्हतो. मग त्याच दिवशी हाताला प्लास्टर करून शाळेत हजर झालो. त्यामध्ये मुख्याध्यापकांनी मला खूप पाठबळ दिले. रोज मला घरून घेऊन शाळेत येत व परत घरी सोडत . सर्वच स्टाप ने नेहमीच खूप मनोबल वाढवले आणि तो दिवस उजाडला NMMS परीक्षेचा निकाल लागला.मिरीट लिस्ट आली माझा विद्यार्थी रोहन आनंदा सरक हा जिल्हात एन.टी. प्रवर्गातून साताऱ्यातून प्रथम व संस्कृती दत्तू सरक जिल्ह्यात सहावी आली.
त्याचबरोबर दहा मुलांपैकी आठ मुले पात्र झाली. ग्रामीण भागातील गरीब गरजू मुलांना प्रत्येकी 60,000 शिष्यवृत्ती मिळाली याचा मला आनंद झाला.लगेचच इयत्ता आठवी शिष्यवृत्ती निकाल जाहीर झाला.आणि माझ्या वर्गातील चार मुले 220 गुणापेक्षा जास्त गुण मिळवून शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत आली. त्यांनाही शिष्यवृत्ती मिळाली आणि स्वप्नाच्या शोधासाठी या प्रवासातील एक पाऊल पुढे पडले …. ते आता न थांबण्यासाठी….
श्री.दिगंबर गायकवाड
(प्राथमिक शिक्षक )
शाळा- जि.प.प्राथ.शाळा मिरगाव