वाई दि.6 किसन वीर आबा राष्ट्राच्या विकासासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढले-डॉ. राजेंद्र देशमुख
पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा PRR:-9146190215

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा PRR:-9146190215
वाई दि.6
किसन वीर आबा राष्ट्राच्या विकासासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढले-डॉ. राजेंद्र देशमुख
आबासाहेब वीर थोर क्रांतिकारक होते. त्यांचे जीवनकार्य हेच प्रखर राष्ट्रप्रेम होते. किसन वीर आबा राष्ट्राच्या विकासासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढले असे उदगार मा. डॉ. राजेंद्र देशमुख यांनी काढले.
येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयात किसन वीर आबांच्या ११८ व्या जयंती निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. मदनदादा भोसले हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी संस्थेचे संचालक श्री. सुरेश यादव, सचिव डॉ. जयवंत चौधरी, खजिनदार प्रा. नारायण चौधरी व माजी प्रभारी प्राचार्य व यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ वाई केंद्राचे समन्वयक प्रा. रमेश डुबल व प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे डॉ. देशमुख म्हणाले, आबांची जयंती श्रीकृष्ण जन्माष्टमी दिनी तिथीनुसार साजरी केली जाते. आबासाहेबांची कौटुंबिक परिस्थिती अत्यंत बेताची होती परंतु त्यांनी त्याकडे लक्ष न देता केवळ स्वातंत्र्यासाठी संपूर्ण जीवन व्यतीत केले. आबांचे शिक्षण हे फारसे झाले नसले तरी त्यांना शिक्षणाविषयी प्रचंड आवड होती. स्वातंत्र्याच्या संग्रामामध्ये भूमिगत राहून चळवळ चालू ठेवली. आबांना त्यांच्या गुरूंनी क्रांतीकारकांची चरित्रे वाचण्यासाठी दिली. पुरंदरच्या किल्ल्यावरती देशातील दोन नंबरचा दारुगोळा असल्याने तो स्वातंत्र्याच्या संग्रामासाठी मिळवण्याचे त्यांनी ठरविले होते. महात्मा गांधींच्या विचाराने प्रेरीत होऊन आबांनी सविनय कायदेभंग चळवळ सुरू केली. आबांचे नेतृत्व हे सर्वमान्य असल्याने अनेकजण स्वातंत्र्याच्या संग्रामामध्ये सामील झाले. ही चळवळ आबांनी तळागाळापर्यंत पोहोचवली. आबांना येरवड्याच्या तुरूंगामध्ये ठेवल्यानंतर ते सहकाऱ्यांच्या मदतीने तुरूंग फोडून बाहेर पडले व भूमिगत राहून कार्य करू लागले. यासंदर्भात यशवंतराव चव्हाण यांनी म्हटले होते, “जेव्हा १९४२ च्या स्वातंत्रसंग्रामाचा इतिहास लिहला जाईल त्यावेळी आबांच्या येरवडा तुरूंगावरून मारलेल्या ऊडीची इतिहासाला दखल घ्यावी लागेल.” किसन वीर यांचे नांव इंग्रजांना कळू नये म्हणून त्यांचे मित्र त्यांना आबा या नावाने संबोधित होते. स्वातंत्र्याच्या संग्रामामध्ये योगदान देणाऱ्या आबांना सामाजिक व शैक्षणिक कार्यामध्येदेखील मोठे योगदान दिले आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना मा. मदनदादा भोसले यांनी महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण व देशभक्त किसन वीर यांच्यातील मैत्री व स्नेहभाव यांवर प्रकाश टाकला. यशवंतराव चव्हाण यांचा दाखला देवून दादा म्हणाले की, यशवंतराव नेहमी म्हणायचे महाराष्ट्राचा नेता म्हणून राज्यात व देशात मला मान्यता असली तरी साताऱ्यामध्ये आलो की माझा नेता आबाच!. वक्तशीरपणा, घेतलेला निर्णय तडीस नेण्याची हिम्मत आबांच्याकडे होती. त्यांचे राहणीमान स्वच्छ व टापटीप होते. आबांचा करारीबाणा, व्यायाम करण्याची सवय, बाहेर जाताना कसे जावे? याचे प्रशिक्षण अप्रत्यक्षपणे त्यांच्या सहवासातून मला मिळाले. येथील गोरगरीब जनतेसाठी महाविद्यालय, जिल्हा बँक व साखर कारखाना यांची स्थापना आबांनी केली. ते दूरदृष्टीचे होते. मा. प्रतापराव भाऊंचा व किसन वीर आबांचा स्नेह मी जवळून बघितला आहे म्हणून मी स्वत:ला भाग्यवान समजतो.
कार्यक्रमाच्या सुरूवातीस प्राचार्य डॉ. गुरूनाथ फगरे यांनी उपस्थितांचे स्वागत करून कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. डॉ. अंबादास सकट यांनी सूत्रसंचालन केले. विवेक सुपेकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. चंद्रकांत कांबळे, जितेंद्र चव्हाण, ऋृषिकेश शिंदे, विकास जाधव, सचिन भोसले, मनोज पवार व चेतन भोसले यांनी परिश्रम घेतले. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षक, प्रशासकीय कर्मचारी व सेवक बहुसंख्येने उपस्थित होते.