राहता:-नांदूर्खी बु.गावात ग्रामपंचायतच्या जमिनीवर बाहेरील प्लॉट खरेदी केलेल्या व्यक्तिचे अतिक्रमण.तरीही ग्रामपंचायतचे झोपेचे सोंग घेऊन बघ्याची भूमिका..
प्रतिनिधी वसंत काळे अहमदनगर:-9767653309

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
आपल्या नांदुर्खी बु.गावात पाटाच्या कडेला ग्रामपंचायतची दोन एकर जागा आहे.तरी या जागेतुन आपल्या गावातील नागरिकांसाठी जाण्याकरीता एक तत्पुरता रस्ता आहे.तरी या रस्त्यच्या दोन्ही बाजूने गावच्या मालकीची जमीन पडीत आहे.या जमिनी शेजारी प्लॉटिंग पडलेली आहे.बाहेरच्या व्यक्तींनी प्लॉट खरेदी करून घरे बांधलेली आहेत.ती प्लॉटिंगची त्यांच्या मालकी हक्काची आपली जागा सोडून काही बाहेरील व्यक्तीनी ग्रामपंचायतच्या जमिनीवर झाडे व कम्पाउंड करून जागा काबीज केली आहे.सर्व तिथून ये जा करतात.पण आजपर्यंत कोणीही त्यावर काही बोलल नाही.ग्रामपंचायतही पाहून न पाहिल्या सारखी भूमिका घेते.मग प्रश्न हा पडतो कि ग्रामपंचायत मध्ये जे अधिकारी ,सरपंच,सदस्य यांनी का यावर आजपर्यंत कारवाई केली नाही.या अशा थोड्या थोड्या गोष्टींमूळे गावाची गावठाण जमीन संपली,आता पाटाच्या कडेच्या जमिनीलाही शेज लागले आहे.मग मला ग्रामपंचायतला आणि गावच्या पुढारी लोकांना एक प्रश्न विचारायचा आहे कि एकदा तुम्ही जाहीर तरी करून टाका कि आमच्या गावात कोणी पण या आणि फ्री मध्ये अतिक्रमने करा.म्हणजे कोणाच्या मनात काही शंकाच राहणार नाही आणि आम्हीही एखाद दोन एकरवर् गावचा नागरिक म्हणून अतिक्रमण करू.ग्रामपंचायतने तशी नोटीस तरी एकदाची काढा.म्हणजे कोणी येईल आणि या गावात ठाण मांडून बसेल.फक्त सत्तेत येण्यासाठीच आणि असे नको असलेले उद्योग करण्यासाठीच राजकारण करायचं असत का.लोक गावची प्रॉपर्टी व्यवस्थित सांभाळावी व गावचा विकास करावा यासाठी सत्तेत बसवत असतात.गाव भकास व्हावं यासाठी अजिबात नाही.ग्रामपंचायतने लवकरात लवकर त्या व्यक्तीला ती कोणीही असो नोटीस काढून ते कम्पाउंड व अतिक्रमण काढायला सांगावे.आणि नाही काढले तर ग्रामपंचायतने त्यांना दंड आकारुन काढन्याचा सर्व खर्च त्यांच्याकडून घेऊन कारवाई करावी हि सर्व ग्रामस्थांची ग्रामपंचायतीकडे मागणी आहे.तरी लवकरात लवकर कारवाई करावी.गाव म्हणजे आपल एक कुटुंबच आहे याप्रमाणे गावचा कारभार झाला पाहिजे…