वाई:-मोबाईलमुळे सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ – मा. संदीप गडिया.
प्रतिनिधी वैष्णवी शिंदे;-9146802009

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
मोबाईलमुळे सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ – मा. संदीप गडिया.
जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयातील वाणिज्य व व्यवस्थापन विभागाने आयोजित केलेल्या “सायबर सेक्युरिटी” या व्याख्यानात प्रमुख वक्ते म्हणून मा. संदीप गडिया हे बोलत होते. त्यांनी मोबाईलमुळे सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ होते असे प्रतिपादन करून सायबर गुन्हे आणि त्यांची भयानक वास्तवता विद्यार्थ्यांना समजावून सांगितली.
मा. संदीप गडिया यांनी आजच्या विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर करताना आभासी दुनियेपासून कसे दूर राहावे व सोशल मिडीयाचा योग्य वापर कसा करावा यासोबत हॅकिंग, स्मिशिंग, फिशिंग, विशिंग, स्पुफिंग, ज्यूस जॅकिंग, या संकल्पनांची माहिती अगदी सोप्या पद्धतीने विद्यार्थ्यांना करुन दिली. यापासून सावध कसे रहायचे त्यासाठी कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत आणि कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत हे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.
यावेळी मा. सविता मॅडम यांनी भारत महासत्ता बनविण्यासाठी सर्वांत आधी एक चांगला माणुस घडविणे महत्त्वाचे आहे आणि त्यासाठी आजची पिढी सुसंस्कृत व संस्कारक्षम घडविली पाहिजे असे मत व्यक्त केले. यावेळी युवा उद्योजक श्री. नंदकुमार जाधव देखील उपस्थित होते. त्यांनी आपल्या मनोगतामध्ये विद्यार्थ्यांना भावनिक आव्हान करित, त्यांना एखादी गोष्ट मिळविण्यासाठी जिद्द, चिकाटी, मेहनत, सकारात्मक दृष्टीकोन तसेच अपमान सहन करण्याची तयारी ठेवावी असा बहुमोल सल्ला दिला. पालक बनुन मुले घडविणे हे अत्यंत कठीण काम आहे. त्यासाठी आई-वडिलांचा आदर राखा, तसेच या जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही असे ते म्हणाले.
तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य आणि वाणिज्य व व्यवस्थापन विभागाचे प्रमुख डॉ. गुरुनाथ फगरे यांनी अध्यक्षीय समारोपात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी सोशल मिडीयाचा वापर योग्य ठिकाणी व काळजीपूर्वक करावा असे आवाहन केले. मोबाईल-कॉम्प्युटर वरुन आक्षेपार्ह संदेश, व्हिडीओ, चॅटिंग करण्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. मोबाईल-कॉम्प्युटरवरून पाठविलेला संदेश पुरावा म्हणून वापरला जातो व त्या आधारे गुन्हा सिध्द होतो. अशा गुन्ह्यात कोणतीही पळवाट काढता येत नाही. त्यामुळे संबंधित गुन्हेगारास निश्चितपणे शिक्षा होते.
विद्यार्थ्यांना याबाबत सजग करून असे गुन्हे त्यांचेकडून होणार नाहीत यासाठी सायबर सेक्युरिटी आणि गुन्हे अन्वेशन क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन व्हावे यासाठी असे विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. त्याच विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले.
या कार्यक्रमासाठी वाणिज्य व व्यवस्थापन विभागाचे उपप्राचार्य प्रो. डॉ. विनोद वीर, कला शाखेचे उपप्राचार्य प्रा. डॉ. सुनिल सावंत, विज्ञान शाखेचे उपप्राचार्य प्रा. डॉ. ज्ञानदेव झांबरे, मानसशास्त्र विभाग प्रमुख डॉ. आनंद घोरपडे, माजी प्राणीशास्त्र विभागप्रमुख डॉ. रविंद्र बकरे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीप पातुगडे, स्वागत व परिचय स्वाती देशमाने यांनी केला. तसेच सुत्रसंचालन दिपाली चव्हाण व दिपाली किर्वे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विभागातील जयवंत पवार, रविंद्र जमदाडे, मिनाक्षी चौथमहाल, चंद्रिका साबळे यांनी परिश्रम घेतले.