फलटण:-दक्षिण काशी फलटण येथे श्री चक्रपाणी प्रभू नवशताब्दी अवतरण दिन सोहळा उत्साहात.
प्रतिनिधी आशितोष चव्हाण महाराष्ट्र:-8208717483

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
दक्षिण काशी फलटण येथे श्री चक्रपाणी प्रभू नवशताब्दी अवतरण दिन सोहळा उत्साहात :
धर्मसभेचे आयोजन
फलटण :
श्री चक्रपाणी प्रभू अवतरण दिना निमित्ताने आज श्री क्षेत्र फलटण येथे सेवा समर्पण ग्रुप, श्री चक्रपाणी महानुभाव मठ व श्री कृष्ण देवस्थान ट्रस्ट फलटण व मुक्तिपथ अध्यात्मिक सेवा संस्थान व अनर्घ फाउंडेशनविविध यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
श्री चक्रपाणी प्रभूंच्या जन्मस्थळी पहाटे ५ वाजता आधिष्ठाणाला महाअभिषेक करण्यात आला.जन्मकाळ झाल्यानंतर विधिवत पूजाआर्चा , गंधअक्षदा, पुष्पहार ,विडाअवसर समर्पित करून महाआरती नंतर श्री चक्रपाणी स्तोत्राचे पठण करण्यात आले. या नंतर धर्मसभेचे आयोजन करण्यात आले.
देवभूमी म्हणून ओळखला जाणारा भारत देश त्यातील काही अंशाने नाही तर पूर्णतः आध्यात्मिक वारसा असणारा महाराष्ट्र प्रदेश, अनेक अवतार अनेक संतांच्या पवित्र चरणांनी पावन झालेला महाराष्ट्र,या महाराष्ट्रात महानुभाव पंथाची संस्थापना करणारे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू , हे कलियुगातील पाचवे कृष्ण आहेत.महानुभाव संप्रदायात पंचकृष्णला महत्व दिल्या गेलेले आहे. या मार्गाला श्री दत्तात्रेय प्रभू हे आद्यगुरू म्हणून मानले गेले आहे.महानुभाव संप्रदाय हा दत्त संप्रदाय आहे.पंथामध्ये गुरुपरंपरा ही महत्वपूर्ण आहे.पंचकृष्णा पैकी कलियुगातील तिसरे अवतार श्री चक्रपाणी प्रभू .अकराव्या बाराव्या शतकातील महानुभाव पंथाची परंपरा दत्त प्रणित आहे.पंथीय कल्पने नुसार तिसरे पण ऐतिहासिक दृष्टिकोनातून कलियुगातील ते पहिले कृष्ण ठरतात.
यावेळी अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष व श्री कृष्ण देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष कविश्वर कुळाचार्य प पू महंत विद्वांस बाबा शास्त्रीजी व समवेत महंत सुदामराज बाबा महंत महेंद्र शास्त्री म मुकुंदराज बाबा बिडकर व सेवा संमर्पण ग्रूप चे सर्व पदाधिकारी म मुकुंदराज बाबा म परशराज बाबा म.अर्जुनराज म. भरतराज म.श्यामदादा म.अभिजित मुनी म.अक्षयराज म. श्रीनिवास म.अमितराज म मंगेशराज म.गौरवराज म. चक्रधरदास म.शहाजीदादा व अजित जाधव अनेक मान्यवर या वेळी उपस्थित होते यावेळी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्र संचालन म.राहुलमुनी यांनी केले या वेळी म.गोविंदराज लांडगे म.प्रकाशमुनीजी विद्वांस यांनी मौलिक विचार व्यक्त केले.या प्रसंगी या संपूर्ण सोहळ्याचे आभार म.हरिराज शास्त्रीजी यांनी केले