सातारा:-साताऱ्यातील वंचितच्या जाहीर सभेचे नियोजन करणारे जिल्हाध्यक्ष बनले बहुजनांच्या गळ्यातील ताईत.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
साताऱ्यातील वंचितच्या जाहीर सभेचे नियोजन करणारे जिल्हाध्यक्ष बनले बहुजनांच्या गळ्यातील ताईत.
सातारा दि: छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे प्राथमिक शिक्षण झालेल्या प्रतापसिंह हायस्कूल या भूमीत वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांची शनिवार दिनांक 7 ऑक्टोबर रोजी ना भूतो ना भविष्यती अशी जाहीर सभा झालेली आहे. या जाहीर सभेचे नियोजन करणारे वंचित बहुजन आघाडीचे सातारा जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण देसाई हे आता बहुजनांच्या गळ्यातील टाईप बनलेले आहेत. आज दिवसभर त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत होता. मुळातच मितभाषी असलेल्या बाळकृष्ण देसाई यांनी आपली जीवनशैली ही शिक्षकेपेक्षातून सुरू केलेली आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेमधून शिक्षक म्हणून सेवानिवृत्ती स्वीकारल्यानंतर ॲड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर व चंद्रकांत खंडाईत, गणेश कारंडे यांच्या सानिध्यात ते आले आणि वंचित घटकाच्या न्याय हक्कासाठी त्यांनी वंचितची कास धरली.
यापूर्वी त्यांनी भारतीय रिपब्लिकन पक्ष बहुजन महासंघ या पक्षाच्या माध्यमातून किनवट अकोला, विदर्भ या भागात भारिप बहुजन महासंघाच्या माध्यमातून पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न केला. किनवट मधील भीमराव केराम , मखाराम पवार तसेच अकोला लोकसभा मतदार संघातून ॲड.आंबेडकर यांना निवडून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले.
२०१४ रोजी सातारा तालुक्यातील शेरेवाडी शाळेतून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी पूर्ण वेळ वंचित बहुजन आघाडीचे काम करण्याचा निर्धार केला. २०१८ रोजी त्यांनी ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्यासमोर जाहीर सभेत विचार व्यक्त केले व लाख मोलाची मदत केली. तेव्हापासून बाळकृष्ण देसाई हे बहुजनांच्या चळवळीतील मुख्य वारकरी ठरलेले आहेत.
पक्षाने आदेश दिला म्हणून कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून त्यांनी २०१९ रोजी निवडणूक लढवून दाखवली. गर्दी पेक्षा दर्दी कार्यकर्ते जवळ असणे हे नुकसानकारक नसते. कारण, अलीकडे पक्ष वाढीस लागल्यानंतर दोन्ही दगडीवर हात ठेवून असणारे त्या पक्षामध्ये येतात आणि पुन्हा खळ मोकळे झाले की निघून जातात. परंतु, बाळकृष्ण देसाई यांनी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून चांगले काम करत असताना त्यांना कौटुंबिक ही मोठा आधार लाभलेला आहे.
कराड तालुक्यातील तालुका गावचे सुपुत्र असलेले बाळकृष्ण देसाई यांची पत्नी मुलं , सूना विद्या विभूषित आहेत .त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे सकारात्मक विचार त्यांच्या रक्तात भिनलेले आहे. सातारा शहरातील गांधी मैदानावर प्रस्थापित व्यवस्थेची जाहीर सभा होते. त्यावेळेला पॅकेज देऊन व वाहने पाठवून माणसा आणावे लागतात. परंतु शनिवारी सात ऑक्टोबर रोजी संपूर्ण दिवस व अर्धी रात्र वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेऊन वंचित बहुजन आघाडीचा मळा फुलवला आहे. या मळ्याचे देखभाल करणारे बाळकृष्ण देसाई आज बहुजन समाजाच्या गळ्यातील ताईत बनलेले आहेत. वयाने ज्येष्ठ असले तरी आपल्या नातवंडांच्या वयाचे बहुजन आघाडीचे युवक पदाधिकारी अमोल गंगावणे मिलिंद कांबळे, सिद्धार्थ कांबळे, सिद्धार्थ खरात, संदीप कांबळे, मुन्ना शेख, अकबर पठाण ,तुषार बैले अशा नव्या फळीच्या कार्यकर्त्यांसोबत त्यांनी खूप मोठी मजल मारलेली आहे.
आज खऱ्या अर्थाने वंचित बहुजन आघाडीची मोट त्यांनी बांधलेली आहे. या त्यांच्या कार्याचा गौरव बहुजन समाजातील विविध जाती धर्मातील लोकांनी केलेला असून आज राजकीय पटलावर बाळकृष्ण देसाई हा एक नवीन तारा चमकून गेला आहे. याचा विशेष आनंद वाटत असल्याची प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे महासचिव गणेश भिसे, रिपब्लिकन पक्ष गवई गटाचे जिल्हाध्यक्ष संजय गाडे, विशाल कांबळे,प्रकाश वायदंडे, जावेद खान, शोभा पाटील, सुरेश बोतालजी, मरहबा मोमीन, मुन्ना मुल्ला, अरबाज खान, रफिक बागवान, ॲड.विलास वहागावकर व छाया खरात, प्रिया गंगावणे यांनी दिल्या आहेत.
————-&———————————-
फोटो -वंचित बहुजन आघाडीचे धुवाधार नेते बाळकृष्ण देसाई