कराड:-महाविद्यालयीन जीवनातच सर्जनशील लेखनाची पायाभरणी करा : प्रा. संतोष बोंगाळे
प्रतिनिधी प्रा.संतोष बोंगाळे कराड:-9923900840

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-८२०८७१७४८३.
महाविद्यालयीन जीवनातच सर्जनशील लेखनाची पायाभरणी करा : प्रा. संतोष बोंगाळे
कराड : (दि. 13 प्रतिनिधी) “विद्यार्थीदशेमध्येच आपल्या आयुष्याची पायाभरणी होत असते. सर्जनशील लेखन हे विद्यार्थी दशेमध्येच घडत असते. या वयामध्ये जेवढ्या मोठ्या प्रमाणात सर्जनशील लेखन कराल तेवढ्या लवकर तुमचे करिअर तयार होईल. युवकच कथा, कविता, कादंबरी, नाटक, तसेच चित्रपट पटकथा व सिरीयल लेखन करत असतात. त्यासाठी आत्तापासूनच गांभीर्याने या लेखनाकडे लक्ष दिले तर आपणास अर्थार्जनाच्या अनेक संधी उपलब्ध होतील. “असे प्रतिपाद वेणूताई चव्हाण कॉलेजचे प्रा. संतोष बोंगाळे यांनी केले. ते ग्रामीण विकास शिक्षण संस्थेचे कला व वाणिज्य महाविद्यालय, उंडाळे येथे मराठी विभाग आयोजित कार्यक्रमात ‘सर्जनशील लेखनातून रोजगाराच्या संधी’ या विषयावर बोलत होते.
प्रा. संतोष बोंगाळे पुढे म्हणाले की, “आयुष्यामध्ये करिअरचा कोणता मार्ग निवडायचा हे महाविद्यालयीन जीवनामध्येच ठरवले तर युवक त्या करिअरच्या मार्गाने वाटचाल करू शकेल व जीवनामध्ये त्याला लवकर यश प्राप्त होऊ शकते. हे आजपर्यंत ज्या लोकांनी विविध क्षेत्रांमध्ये आपला नावलौकिक कमावला आहे त्यांच्या जीवनाकडे पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येते. म्हणून विद्यार्थी दशेपासूनच आपण आपले करिअर निवडणे हे काळाची गरज आहे”.
तसेच त्यांनी सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर, राजन गवस, जे के रोलिंग अशा विविध क्षेत्रांमध्ये आपले नाव कमावलेल्या लोकांनी आपल्या करिअरची दिशा लवकर ओळखून ते साध्य करण्यासाठी युवा वयातच प्रयत्न सुरू केले होते, म्हणूनच ते जीवनामध्ये यशस्वी झाले. तसेच आजच्या युवकांनीही आपली करिअरची दिशा तरुण वयातच ठरवून करिअर घडवण्यासाठी प्रयत्न केले तर त्यांच्या आयुष्यामध्ये यश लवकर प्राप्त होईल” असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. सुषमा सुर्वे होत्या. या कार्यक्रमाचे नियोजन व प्रास्ताविक मराठी विभागप्रमुख प्रा. प्रदीप चोपडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. वैष्णवी कटारे यांनी केले तर आभार प्रा. सुधा मोहिते यांनी मानले. सदर कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होत्या.