सातारा सार्वजनिक बांधकाम विभागात मॅनेजने ठराविक ठेकेदारांनाच लागती लॉटरी….
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
सातारा सार्वजनिक बांधकाम विभागात मॅनेजने ठराविक ठेकेदारांनाच लागती लॉटरी….
सातारा दि: सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजे दळणवळणाचे प्रमुख साधन निर्मिती करणारा विभाग आहे. या विभागामध्ये विकास कामे देताना मॅनेज पद्धतीने अगोदर कामे वाटली जातात. आणि त्याच्यानंतर चिठ्ठी टाकली जाते. असा गैरप्रकार सुरू आहे. या लॉटरी पद्धतीने कुणाचे रोकड व सोना चांदी होते. हे ठराविक पुढारी व त्यांचे चेले यांना चांगलेच माहिती आहे. या प्रकारामुळे बिचारे प्रामाणिक सुशिक्षित बेरोजगार अभियंता व संघटना अखेर चमत्काराची वाट पाहत आहे. कारण, रीतसर लिखित तक्रार नसल्याने सातारा जिल्ह्यातील लाच लुचपत प्रतिबंधक विभागालाही आता या ठिकाणी हात घालताना मर्यादा आलेले आहे. हे सुद्धा स्पष्ट झाले आहे.
याबाबत माहिती अशी की, सध्या मार्च एंडिंग ची धावपळ सुरू आहे. त्यामुळे अधिकारी वर्गांना सार्वजनिक बांधकाम विभागातील किती टक्के कामे झाले ? किती टक्के कामे पूर्ण होणार ? किती टक्के काम शिल्लक आहेत ?आणि किती टक्के खर्च झाले आहेत ?या सर्व टक्केवारीचे गणित सोडवताना अनेकांना कॅल्क्युलेटर घ्यावे लागते. काहींना अभ्यास करावा लागतो. तर काही जणांनी आपण विकास केलेल्या अर्थकारणामुळे आपल्या नेमका किती फायदा या कामात झालाय ? याचा हिशोब मांडावा लागतो. स्वतःची कधीकधी एम. बी. उतरावी लागते.याची आता धावपळ सुरू झालेली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री रवींद्र चव्हाण हे सातारला दौऱ्यानिमित्त आले होते. त्यावेळी त्यांचं जंगी स्वागत करण्यात आले. काही ठेकेदारांनी तर चक्क बॅनरबाजी करून त्यांना आपली ताकद दाखवून दिली होती. एवढेच नव्हे तर सार्वजनिक बांधकाम विभागात रक्तदान शिबिर झाले. हे खरं म्हणजे सामाजिक जाणीव ठेवून केलेले काम आहे .त्याचे अनेकांनी कौतुक केले. पण काहींनी स्वतःचे रक्त न आठवता जो मलिदा लाटलेला आहे. त्याबाबत मात्र कधीच चर्चा होताना दिसत नाही.
प्रसिद्ध लेखक यांचे कोण म्हणतं टक्का दिला ? हे गाजलेले पुस्तक आहे. पण या सार्वजनिक बांधकाम विभागात कोण घेत नाही टक्का ?असं म्हणण्याची वेळ आलेली आहे.आज सार्वजनिक बांधकाम विभाग हा जरी प्रशांत महासागरासारखा शांत वाटत असला तरी इतरांच्या पाणबुडी देखरेखीमुळे अनेकांना बुडवण्याची ताकद आहे. त्यामुळे सुशिक्षित बेरोजगार ठेकेदार घाबरून असतात.
दे दान सुटे गिरण या वाक्य प्रमाणे आपल्या मागे गिरण लागू नये. म्हणून काहींना सुट नव्हे तर पाकीट बंद लिपापे द्यावे लागतात. आणि ही यंत्रणा नियमित कार्यरत आहे. लोकप्रतिनिधी बाबत खोके सरकार बोलले जाते पण सार्वजनिक बांधकाम विभागात दोन सराईत बोके आहेत . उघड्या डोळ्यांनी दोन बोके दुधासोबत मटणावर सुद्धा ताव मारत आहेत.
सातारा जिल्ह्यातील खासदार, आमदार व अनेक लोकप्रतिनिधी यांचे व ठेकेदारांचे एवढे हितसंबंध चांगले आहेत की ठेकेदारातूनच काही आमदारांनी मुकादम नेमलेले आहेत. हेच मुकादम कामवाटप समितीच्या माध्यमातून काही गरीब ठेकेदारांना मुका दम देत असतात. तर जे सराईत व भ्रष्टाचारांमध्ये काम करून दुधाची साई आपल्याकडे ओरबडून घेऊन जातात. त्यानंतर त्याची खावा बर्फी तयार केली जाते. या बर्फीचा आस्वाद अनेकांना मिळतो.
पूर्वी ठराविक ठेकेदार हे काम करत होते. पण, आता राजकारणामध्ये जर पुढे जायचे असेल तर ठेकेदारीतून दोस्ती आणि दोस्तीतून पैसा…. या दृष्ट चक्रात सातारा जिल्हा अडकून पडलेला आहे. ही सातारची बुगडी सांडली असून ती शोधण्याचा प्रयत्न कोणी करत नाहीत .हीच मोठी खंत आहे.
मार्च एंडिंग म्हटलं की सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अगदी अहमदनगर, संगमनेर, पुणे ,जालना, बीड, उस्मानाबाद ,लातूर या ठिकाणी काम करून आलेल्या अधिकाऱ्याच्या मागे काही जण हात घेऊन लागतात. कारण, जिथे पिकते तिथेच काढणी मोडणीला मजा येते. अशी आता नवीन प्रथा सुरू झालेली आहे. या सर्व गोष्टीचा आता विचार फक्त करायचा कारण कृती काहीच होत नाही.
त्यामुळे सातारा जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम म्हणजे सब भूमी गोपाळ की अशी झाली आहे. याला आता पायबंद घालण्यासाठी भ्रष्ट अधिकारी वर्गाच्या सेवानिवृत्तीचीच काही प्रामाणिक सुशिक्षित बेरोजगार अभियंता वाट पाहावी लागणार आहे. हे मात्र खरे…