खटाव :-वडूज आगारातील मुक्काम फेऱ्या बंद झाल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान.
प्रतिनिधी प्रा.दिलीप पुस्तके सातारा:-9890318605

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.
वडूज आगारातील मुक्काम फेऱ्या बंद झाल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान.
मायणी प्रतिनिधी____खटाव तालुक्यातील प्रवासाची जबाबदारी घेतलेल्या वडूज आकारातील मुक्काम फेऱ्या बंद केल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहेत परंतु बस नसल्याने विद्यार्थ्यांना खाजगी प्रवासी
वाहनाने प्रवास करावा लागतो याबाबत अधिक माहिती अशी की रविवारी सुट्टी असल्याने शनिवारी मुक्कामाच्या गाड्या मुक्कामी जात नाहीत आणि शनिवारी मात्र माध्यमिक शाळा दुपारच्या भारतात दुपारी चार वाजता शाळा सुटल्यानंतर या विद्यार्थ्यांना घरी जाण्यासाठी बसची सुविधा नसते मुक्कामाच्या बसेस शनिवारी रविवारी बंद केल्यामुळे विद्यार्थ्यांना
खाजगी वाहनाने प्रवास करावा लागतो जर एसटी आगार विद्यार्थ्यांचे पूर्ण महिन्याचे पैसे पास स्वरूपात घेत असेल तर विद्यार्थ्यांना घरी पोहोचवण्याची जबाबदारी एसटी महामंडळावर आहे तरी मुक्कामाच्या बसेस सुरू करून विद्यार्थ्यांची सोय करावी अशी मागणी पालक संघटनेने केली आहे