खटाव:-मायणी परिसरात संततधार पावसामुळे खरीप हंगाम वाया जाण्याची भीती.
प्रतिनिधी प्रा.दिलीप पुस्तके सातारा:-9890318605

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.
मायणी परिसरात संततधार पावसामुळे खरीप हंगाम वाया जाण्याची भीती.
मायणी प्रतिनिधी___30 ऑगस्ट पासून सुरू झालेला संततधार पाऊस अद्यापही न थांबल्यामुळे खरीप हंगाम वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे याबाबत अधिक माहिती अशी की खरीप हंगामात मका उडीद वाघा घेवडा मुग इत्यादी आर्थिक बळ देणारी पिके घेतली जातात सुरुवातीच्या रिमझिम पावसावर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या सध्याही पिके काढणीच्या मार्गावर आली आली आहेत परंतु या संततधार
पावसाने पिकांना लागलेल्या शेंगा कुजून गेलयाआहेत थोडीही उघडीत नसल्याने काढलेल्या पिकात ओलावा राहतो त्यामुळे व्यापारी माल** घेत नाहीत तसेच जर भर पावसात घेवडा पीक काढले आणि हे पीक उन्हात वाळवण्यास टाकले असता हे पीक तांबडे पडते त्यामुळे तांबडा माल व्यापारी घेत नाहीत सध्या घेवड्याची दर अकरा हजार रुपये क्विंटल उडदाचे दर सहा हजार रुपये क्विंटल तर मुगाचे दर सात हजार रुपये क्विंटल एवढे उच्चांक किदर असूनही शेतकऱ्याच्या पदरात काहीही नाही त्यामुळे शेतकऱ्याच्या मनात या संततदार पावसाची भीती निर्माण झाली आहे