वैजापूर:-गोदावरीवरी पुलाच्या भरावाचे काम अडकले लाल फितीत – जलसमाधी आंदोलनाचा संघटनांचा इशारा.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
गोदावरीवरी पुलाच्या भरावाचे काम अडकले लाल फितीत – जलसमाधी आंदोलनाचा संघटनांचा इशारा.
गोदावरी नदीवरील तालुक्यातील महांकाळ वाडगाव ते नागमठान ( ता वैजापुर ) यांना जोडणाऱ्या अर्धवट अवस्थेतेतील पुलाच्या भरावाचे काम सरकारी लाल फितीत अडकले असून ते तत्काळ सुरु न केल्यास १० फेब्रुवारी रोजी त्याच पुलावरून स्वतंत्र भारत पक्ष ‘ शेतकरी संघटनेचे पदाधिकारी गोदावरी नदीत जलसमाधी आंदोलन करणार आहे या संदर्भात जिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांना नुकतेच निवेदन देण्यात आले . की गोदावरी नदीवरील अहिल्यानगर व छत्रपती संभाजी नगर या दोन जिल्हांना जोडणाऱ्या पुलाच्या भरावाचे काम गेल्या ४ वर्षांपासून सरकारी दफ्तर दिरंगाईमुळे रखडले आहे शासनाने पुलासाठी २० कोटी रुपये खर्च करून पुलास जोडणारे दोन्ही जिल्हाचे बाजुचे भराव व जोडरस्ते न केल्याने पूल असून अडचण नसून खोळंबा झाला आहे . या पुलाचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग छत्रपत्री संभाजीनगर मार्फत केले आहे . त्यांनी महांकाळ वडगाव बाजुने काम रखडले आहे जिल्हा अधिकारीऱ्यांनी दोन्ही जिल्हातील विभागांमध्ये समन्वय साधवा व तातडीने या अर्धवर पुलाचे काम सुरू करावे . अशी विनंती केली आहे . अन्यथा १० फेब्रुवारी रोजी त्याच अर्धवट अवस्थेतील पुलावरून गोदावरी नदीत जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा स्वतंत्र भारत पक्ष शेतकरी संघटना शेतकरी संघटना महिला आघाडीकडून दिला आहे . निवेदनात स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष निलेश शेडगे . उपाध्यक्ष नवनाथ दिघे . महिला आघाडीच्या अध्यक्षा सुनिता वानखेडे . शितल पोकळे ‘ शिला वानखेडे तालुकाध्यक्ष प्रकाश जाधव ‘ मधुकर काकड नामदेव घोगरे . श्रीराम त्रिवेदी . विष्णु भनगडे . भानुदास चोरमल . सुभाष घोगरे . गोकुळ खुरुद . राजेंद्र आढाव . युवा आघाडीचे मयूर भनगडे आदी शेतकऱ्यांच्या सह्या आहे.