मानखुर्द :- महाराष्ट्रनगर आणि समतानगरला जाणाऱ्या भुयारी मार्गाची दुरावस्था – महानगरपालिकेचे दुर्लक्ष.
संपादक:-प्रल्हाद चव्हाण:-8208717483

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
मानखुर्द :- महाराष्ट्रनगर आणि समतानगरला जाणाऱ्या भुयारी मार्गाची दुरावस्था – महानगरपालिकेचे दुर्लक्ष.
मुंबई- मानखुर्द :- महाराष्ट्रनगर आणि समतानगरला जाणाऱ्या भुयारी मार्गाची अत्यंत दुरावस्था झालेली आहे. या भुयारी मार्गामध्ये ठिकठिकाणी खड्ड्यांनी आपले स्थान निर्माण केले आहे. या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. बऱ्याच ठिकाणी गटारीवरचे झाकण निखळलेल्या अवस्थेमध्ये आहे. रोज येणाऱ्या जाणाऱ्या वाहन चालकांना अक्षरशः मनस्ताप सहन करावा लागत आहे. दरवर्षी या भुयारी मार्गामध्ये पाणी भरले जाते. त्यामुळे महाराष्ट्रनगर आणि समतानगरला पायी जाणाऱ्या लोकांना रेल्वे पटरी क्रॉस करून आपला जीव मुठीत घेऊन ये-जा करावी लागते. अशावेळी मोठा अपघात होऊ शकतो. हा अपघात टाळण्यासाठी महानगरपालिकेने तातडीने काहीतरी निर्णय घेऊन त्याला पर्यायी व्यवस्था काढावी आणि भुयारी मार्गातील रस्त्याची झालेली दुरावस्था, पडलेले खड्डे बुजवून पक्क्या स्वरूपाचे काम करावे अशी मागणी लोकांमधून होत आहे. चालू असलेल्या मेट्रोच्या कामामुळे संध्याकाळच्या वेळेमध्ये वाहनांची नुसती रेलचेल होऊन जाते. एवढे ट्रॅफिक होत असताना सुद्धा एकही ट्राफिक पोलीस या ठिकाणी उपस्थित दिसून येत नाही. आज या ठिकाणी लाखो लोकांचे वास्तव्य महाराष्ट्रनगर आणि समतानगर मध्ये झालेले आहे. त्यावर स्थानिक लोकप्रतिनिधींनी ही लक्ष देण्याची गरज आहे. अशा प्रकारची चर्चा जनता करत आहे. लोकांमधून आणि वाहनचालकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
महानगरपालिका हे काम कधी पूर्ण करते याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. बरीच वर्ष झाली भुयारी मार्गामध्ये भरपूर पाणी साठवून रस्ता बंद होतो. यामुळे रेल्वे पटरी क्रॉस करून जाताना मोठा अपघात होऊ शकतो याकडे महानगरपालिकेचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झालेले दिसते.