ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विजेच्या पोल तारा चे भू भाडे संदर्भात सूनावनी ९०दिवसात घेऊन निर्णय देण्याचा बीड जिल्हाधिकारी यांना औरंगाबाद उच्च न्यायालयाने दिला आदेश: शेख अजिमोद्दीन.

प्रतिनिधी- सिराज शेख आष्टी :-9405829012

विजेच्या पोल तारा चे भू भाडे संदर्भात सूनावनी ९०दिवसात घेऊन निर्णय देण्याचा बीड जिल्हाधिकारी यांना औरंगाबाद उच्च न्यायालयाने दिला आदेश: शेख अजिमोद्दीन.

आष्टी/ प्रतिनिधी…शेख सिराज
महावितरण कंपनीने शेतकऱ्यांना विजबील वसूली साठी वेठीस धरून सक्तीची वीज बील वसूली केली. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ब्रम्हदेव आले तरी विज बील भरावेच लागेल असे सांगितले. शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मा.रधूनाथ दादा पाटील यांनी शेतकरी विज बील देणे लागत नाही आणि शेतकरी वीज बील भरणार नाहीत अशी जाहीर भूमिका घेत कर कर्जा नहीं देंगे बीजलीका बील भी नहीं देंगे हा नारा दिला. शेतकरी महावितरणचे देणे लागत नाही उलट शेतकऱ्यांना महावितरणकडून येणे आहे ठणकावून सांगितले होते.
महावीतरण कंपनी ने विजेच्या तारा ,पोल,ताण ,रोहीत्र शेतकर्यांच्या संमतीशिवाय नेले . ज्या शेतकऱ्यांच्या जमीनीतून पोल तारा , ताण व रोहित्र आहे त्यांना त्या क्षेत्राचे भू भाडे मिळाले पाहिजे .असा कायदा आहे ,परंतु अद्याप कूणी ते मागीतले नाही व महावीतरणने कुणालाही दिले नाही . शेतकरयांना विजेच्या पोलचे ,तारा ,ताण ,डीपी चे भाडे मिळाले पाहिजे यासाठी शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष ॲड . अजित काळे (औरंगाबाद हायक़ोर्ट) यांनी शेतकर्यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे भूभाडे मिळण्यासाठी अर्ज करण्याचें आव्हान केले होते त्याला प्रतीसाद देत शेतकरी संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष शेख अजिमोद्दीन यांनी पिंम्पळा व दौलावडगाव येथील शेतकर्यांचे अर्ज स्वतः जमा करून बीड जिल्हाधिकारी कार्यालयात १४/३/२०२२रोजी जमा केले व रितसर पोहच घेण्यात आली. परंतु बीड जिल्हाधिकारी यांनी कसलीही दखल घेतली नाही .
सदर प्रकरणी जिल्हाध्यक्ष शेख अजिमोद्दीन यांनी ॲड.अजीत काळे यांची तक्रारदार शेतकर्यांसह भेट घेतली व या प्रकरणी ॲड.अजित काळे यांच्या मार्फत औरंगाबाद उच्च न्यायालयात याचिका क्रमांक 8108/2022 दाखल करण्यात आली त्या याचीकेची आज दिनांक ५ऑगस्ट२२रोजी मा न्याय मूर्ती रवींद्र घुगे व मा न्यायमूर्ती अरुण पेडणेकर यांच्या खंडपीठा समोर सूनावनी होऊन मा कोर्टाने बीड जिल्हाधिकारी यांनी ९०दिवसात शेतकर्यांच्या अर्जावर सुनावणी घेऊन निकाल देण्यात यावा असे आदेश दिले .विजेच्या तारा,पोल यांचे भूभाडे मिळावे यासाठी महाराष्ट्रातील हे पहीलेच प्रकरण आहे. शेतकरी संघटनेतर्फे तर्फे शेतकऱ्यांना भूभाडे मिळाले पाहिजे म्हणून शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष ॲड.अजित काळे यांनी हा लढा उभारला आहे त्याला प्रतीसाद देत शेतकरी संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष शेख अजिमोद्दीन यांनी सदर विषयी न्यायालयीन लढाई सुरू केली व त्याला आज यश मिळाले आहे.
या न्यायालयीन लढ्यात पिंम्पळा येथील शेतकरी चंदू भागीनाथ शेंडगे, महादेव सूर्यभान सूंबे,चांदबेग बाबूबेग .मयूर महादेव सूंबे,भामाबाई शेंडगे,संपत शेंडगे, सूशिला मूळे यांनी भूभाडे मागणी साठी जिल्हाधिकारी, कार्यकारी अभियंता,व अधिक्षक अभियंता बीड यांना अर्ज दाखल केले होते.
या निकालामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळेल अशी आशा आहे.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button